शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
3
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
5
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
6
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
7
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
8
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
9
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
10
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
11
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
12
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
13
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
14
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
15
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
16
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
17
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
18
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
19
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
20
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील २८ शाळांना कुलूप

By admin | Updated: February 26, 2016 01:23 IST

प्रस्ताव शासनाकडे : जूनपासून अंमलबजावणी; शिक्षक अतिरिक्त होणार

भीमगोंडा देसाई ल्ल कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील पाच पटसंख्या असलेल्या २८ द्विशिक्षकी शाळा पहिल्या टप्प्यात बंद होऊन त्यांना कुलूप लागणार आहे. या शाळा बंद झाल्यास ५४ शिक्षक अतिरक्त होणार आहेत. बंद शाळांतील विद्यार्थ्यांच्या मोफत वाहतुकीची सोय करून त्यांना जवळच्या शाळेत दाखल करण्यात येणार आहे. टप्प्याटप्प्याने २० पटांखालील ४०७ शाळा बंद करण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदेच्या एकूण २००५ शाळा आहेत. दरम्यान, नोकरी-व्यवसायानिमित्त शहरातील वास्तव्य, पालकांचा पाल्यास इंग्रजी शाळेत घालण्याचा वाढता कल, जिल्हा परिषदेच्या काही शाळांतील घसरलेली गुणवत्ता, प्राथमिक शिक्षकांचे शिकविण्यापेक्षा राजकारण व अन्य गोष्टींकडे विशेष लक्षामुळे अध्यापनाकडे होणारे दुर्लक्ष, आदी कारणांमुळे पटसंख्या घटते आहे. अनेक प्राथमिक शाळांतील शिक्षकांची मुलेही खासगी शाळांमध्ये जात आहेत. यामुळे पटसंख्या प्रत्येक वर्षी कमी होत आहे. मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून एक विद्यार्थी असलेल्या गावांत, वाड्या-वस्त्यांवर द्विशिक्षकी शाळा अनेक वर्षांपासून सुरू आहेत. दुर्गम, डोंगराळसह जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील प्रत्येक मुलास शिक्षण मिळावे, हा उद्देश असल्यामुळे शाळा सुरू आहेत. प्राथमिक शिक्षण प्रशासनाने घेतलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात ४०७ शाळांत २० पटाच्या आत विद्यार्थी आहेत. पाच पटसंख्येच्या आतील २७, दहा पटसंख्येच्या आतील १०२, पंधरा पटासंख्येच्या आतील २७७ शाळा असल्याचे स्पष्ट झाले आहे. पहिल्यांदा पाच पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय जाहीर केल्यानंतर विरोध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोपनीयपणे जिल्हा प्राथमिक शिक्षण विभागाकडून पाच पटसंख्येच्या आतील शाळांची माहिती घेऊन जूनमध्ये त्या शाळा बंद केल्या जाणार आहेत. वीस पटाखाली शाळाही बंद केल्यास तब्बल आठशे शिक्षक अतिरिक्त होणार आहेत. बंद होणाऱ्या सर्व शाळा वाड्या-वस्त्यांवरील असल्याने गरीब, सामान्य कुटुंबांतील मुलांना त्याचा फटका बसणार आहे. जवळच्या शाळेत जाण्या-येण्याची सोय केली तरी गावापासून लांब जावे लागणार असल्याचे शल्य पालकांमध्ये आहे.