शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
4
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
5
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
6
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
7
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
8
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
9
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
10
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
11
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
12
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
13
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
14
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
15
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
17
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
18
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
19
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
20
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड

‘लॉकडाऊन’मुळे रोजी गेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:22 IST

समीर देशपांडे कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्यानुसार लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील ६५ ...

समीर देशपांडे

कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्यानुसार लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील ६५ हजारांहून अधिक नागरिकांना मोफत शिवभोजन थाळीचा लाभ होणार आहे.

ठाकरे सरकार सत्तेवर आल्यानंतर ही योजना जाहीर करण्यात आली होती. तिचा मोठा फायदा जिल्ह्यातील नागरिकांना हाेत असल्याचे चित्र आहे. सध्या जिल्ह्यात ३७ केंद्रे मंजूर आहेत. मात्र शिरोळ तालुक्यातील एक केंद्र बंद आहे. त्यामुळे ३६ केंद्रांवर रोज चार हजार थाळ्यांचे वितरण करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील या केंद्रांवरून रोज दुपारी ५० पासून २०० पर्यंत नागरिकांना ही थाळी पुरविली जाते. याआधी नागरिक डबे घेऊन येत होते. आता अनेक केंद्रातूनच पार्सल दिले जाते. लाभार्थ्याकडून पाच रुपये घेतले जातात. महाराष्ट्र शासन शहरी भागासाठी एका थाळीला ४५ रुपये; तर ग्रामीण भागात ३५ रुपये अनुदान देते.

चौकट

‘शिवभोजन’मध्ये हे दिले जाते...

३० ग्रॅमच्या दोन चपात्या

१०० ग्रॅम १ वाटी भाजी

१०० ग्रॅम १ वाटी वरण

१५० ग्रॅम १ मूद भात

चौकटी

जिल्ह्यातील शिवभोजन थाळी केंद्रे

३७

बंद १

दररोज कितीजण घेतात लाभ

४०००

अनुदान पद्धत

१ शहरी भागात शिवभोजन केंद्र चालविणाऱ्यास ४५ रुपये अनुदान शासन देते. लाभार्थ्याकडून पाच रुपये आकारण्यात येतात. अशी ही ५० रुपयांना थाळी दिली जाते.

२. ग्रामीण भागात शिवभोजन केंद्र चालविणाऱ्यास ३५ रुपये अनुदान शासन देते. लाभार्थ्यांकडून पाच रुपये आकारण्यात येतात. अशी ही ४० रुपयांना थाळी दिली जाते.

कोट

मी आझाद चौकातच राहते. लॉकडाऊनमुळे कामाची अडचण झाली आहे. त्यामुळे गेल्या वर्षीपासून याच ठिकाणी शिवभोजन थाळी घेते. ही सोय फक्त दुपारी आहे. रात्रीही ही थाळी सुरू करावी, अशी मागणी आहे. येथील जेवण चांगले आहे.

आझाद चौकातील ज्येष्ठ महिला

कोट

मी उद्यमनगरमध्ये कामगार आहे. त्यामुळे शिवभोजन थाळी सुरू झाल्यापासून मी रोज दुपारी या योजनेचा लाभ घेत आहे.

यादवनगरातील नागरिक

कोट

मी काही घरांमध्ये धुणीभांडी करते. मी एकटीच आहे. त्यामुळे जेव्हा गरज असेल तेव्हा येथून शिवभोजन थाळीचे जेवण घेते.

राजेंद्रनगर परिसर

१४०४२०२१ कोल शिवभोजन ०१

कोल्हापूर येथील उमा टॉकीज परिसरातील हे शिवभोजन केंद्र.

छाया : समीर देशपांडे