शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

पंचगंगा प्रदूषित करणाऱ्या उद्योगांना टाळे ठोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:20 IST

मुंबई/कोल्हापूर : नियमांचे उल्लंघन करून नदी प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या उद्योगांना थेट टाळे ठोका, असे आदेश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ...

मुंबई/कोल्हापूर : नियमांचे उल्लंघन करून नदी प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या उद्योगांना थेट टाळे ठोका, असे आदेश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मंगळवारी दिले.

पंचगंगा प्रदूषण उपाययोजनांबाबत मुंबईत वर्षा निवासस्थानी बैठक झाली. यावेळी अनेक महत्त्वाचे निर्णय झाले. बैठकीस नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र पाटील - यड्रावकर, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आबीटकर, माजी आमदार उल्हास पाटील, सुजित मिणचेकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय महेता, अप्पर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे उपस्थित होते.

ठाकरे म्हणाले, प्रदूषणासाठी कारणीभूत असणाऱ्या, सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया न करता ते पंचगंगेत सोडणाऱ्या, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उद्योगांवर कारवाई करण्यात यावी, त्यांना थेट टाळे लावण्यात यावे व त्यांनी नियमांची पूर्तता केल्यानंतरच टाळे उघडण्यात यावे. यासाठी शासन कार्यवाही करेलच, पण ज्यांच्यामुळे प्रदूषण होते, त्यांच्यावरही जबाबदारी निश्चित करणे गरजेचे आहे. नदी परिसरातील कोल्हापूर महापालिका, इतर नगरपालिका, गावे, इचलकरंजीतील वस्त्रोद्योग युनिटस्, एमआयडीसी आदी ठिकाणांवरून नदीचे होत असलेले प्रदूषण रोखण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजनांसंदर्भातील सविस्तर आराखडा सादर करण्यात यावा.

आदित्य ठाकरे म्हणाले, पंचगंगा प्रदूषणासंदर्भात थर्ड पार्टी ऑडिट करणे आवश्यक आहे. पर्यावरण विभागाने दर महिन्याला नियमित बैठका घेऊन प्रगतीचा आढावा ५ तारखेपर्यंत मुख्यमंत्र्यांना सादर करावा.

राज्यमंत्री यड्रावकर म्हणाले, नदी प्रदूषण नियंत्रण, सांडपाणी व्यवस्थापन आदींसाठी गावांमध्ये ज्या यंत्रणा बसविणे नियोजित केले जाईल, त्यांचा देखभाल, दुरुस्तीचा किंवा वीजबिलाचा बोजा संबंधित गावांवर पडू नये.

बैठकीला पर्यावरण विभागाच्या मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अशोक शिनगारे, मुरलीधर जाधव आणि कोल्हापूर येथून जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी रविंद्र आंधळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, प्रियदर्शिनी मोरे, उदय गायकवाड उपस्थित होते.

चौकट

घेण्यात आलेले निर्णय...

१ प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक निधीची उपलब्धता करून दिली जाईल.

२ महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ यांची समन्वय समिती स्थापन

३ जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सादर केलेला २२० कोटींचा आराखडा. गाव, शहरनिहाय स्वतंत्र आराखडे तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

चौकट

गुन्हे मागे घेणार

प्रदूषण रोखण्यासाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्यासंदर्भात सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

थर्ड पार्टी ऑडिट

सांडपाणी नदीत सोडणाऱ्या कारखान्यांवर जेव्हा प्रदूषण नियंत्रण मंडळ कारवाई करते, तेव्हा हे सांडपाणी तात्पुरते बंद करण्यात येते. परंतु अधिकारी कारवाई करून परतल्यानंतर पुन्हा पाणी सोडले जाते, असा विषय यावेळी चर्चेत आला. यावर पर्यावरणमंत्री ठाकरे यांनी, जर असे होत असेल तर थर्ड पार्टी ऑडिट करून तिऱ्हाईत यंत्रणेवर ती जबाबदारी देण्याची सूचना केली.

चौकट

अपेक्षा वाढल्या

खासदार माने यांनी थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना याप्रश्नी बैठक लावण्याची विनंती केल्यानंतर, ठाकरे यांनी अतिशय कडक अशी भूमिका या बैठकीत घेतली. त्यामुळे थेट मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घातल्यामुळे गेली अनेक वर्षे सुरू असलेले चर्चेचे गुऱ्हाळ संपून याबाबत ठोस कारवाई आणि कार्यवाही होईल, अशी अपेक्षा आहे.

०५०१२०२१ कोल पंचगंगा ०१

पंचगंगा नदी प्रदूषणाबाबत उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मुंबई येथे वर्षा निवासस्थानी बैठक झाली. यावेळी मंत्री एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे, राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यासह शिवसेनेचे मुरलीधर जाधव, आमदार प्रकाश आबिटकर, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने उपस्थित होते.