शहरं
Join us  
Trending Stories
1
Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
2
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
3
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
4
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
5
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
6
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
7
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
8
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
9
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती
10
बांगलादेशींना नोकरी देणाऱ्यांवर होणार कारवाई; राज्य सरकारच्या आदेशात काय?
11
"तरुण दिसण्यासाठी ती गेली ५ वर्ष.."; शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी केला मोठा खुलासा
12
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
13
खराब हवामानामुळे पिकाचे होणारे नुकसान टाळता येणार, नव्या टेक्नोलॉजीचा शेतकऱ्यांना फायदाच!
14
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
15
Shefali Jariwala Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
16
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
17
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
18
११वी प्रवेशाचा घोळ थांबेना, विद्यार्थ्यांची चिंता मिटेना; तांत्रिक अडचणींचे ग्रहण सुटणार कधी?
19
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
20
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?

छोटा बच्चा जानके इनको...

By admin | Updated: November 14, 2014 23:14 IST

रोजच्या कटकटींपेक्षा लहानपण बरं होतं. पण तसं पाहिलं तर आताच्या लहान मुलांचं जगणं पूर्वीसारखं राहिलेलं नाही. त्यांना खूप कमी वयातच खूप मोठ्या स्पर्धेला तोंड द्यावे लागत

नुकताच व्हॉटस्अ‍ॅपवर एक मेसेज आला होता. लहान असताना आपल्याला कोणी विचारलं की, कोण व्हायचंय? तर आपल्यासमोर अनेक पर्याय असायचे. बसने प्रवास करताना वाटायचं कंडक्टर व्हावं. बाजारात गेल्यावर वाटायचं आपणही मोठं होऊन दुकान काढायचं. कधी वाटायचं डॉक्टर व्हावं, तर कधी पायलट. जे समोर दिसेल ते आपण व्हावं, असं वाटायचं. पण, मोठं झाल्यानंतर कुणी प्रश्न विचारला की कोण व्हायचंय? तर सर्वसाधारणपणे उत्तर एकच येतं... पुन्हा लहान व्हायचंय. लहान असताना वाटायचं की भरपूर पैसे खर्च करता यावेत, यासाठी आपण लवकरात लवकर मोठं व्हायला हवं. पण मोठं झाल्यावर वाटतं की, रोजच्या कटकटींपेक्षा लहानपण बरं होतं. पण तसं पाहिलं तर आताच्या लहान मुलांचं जगणं पूर्वीसारखं राहिलेलं नाही. त्यांना खूप कमी वयातच खूप मोठ्या स्पर्धेला तोंड द्यावे लागत आहे आणि म्हणूनच ही लहान मुलं खूप स्मार्ट आहेत. नव्या जगाची परिभाषा असलेल्या अनेक गोष्टी त्यांनी लिलया आत्मसात केल्या आहेत आणि म्हणूनच ‘छोटा बच्चा जानके इनको’ कमी समजण्याची चूक करायला नको. तसं पाहिलं तर प्रत्येक गोष्टीलाच चांगली आणि वाईट बाजू असते. आताच्या मुलांना त्यांचं बालपण जगताच येत नाही, असा आक्षेप अनेक लोक घेतात. पण ते या मुलांची तुलना आपल्या लहानपणाशी करतात आणि आपण केलेलं तेच बरोबर असा सूर उमटायला लागतो. खरंही असेल कदाचित, की त्यावेळी मुलांना टी. व्ही., मोबाईल माहिती नव्हते, त्यामुळे त्यांची मैदानी खेळांशी जवळीक होती. आता ती तेवढी राहिलेली नाही. तेव्हाच्या मुलांकडे मैदानावर जाण्यासाठी वेळ होता. आता आपण आपल्या मुलांना मैदानावर जाऊन खेळण्यासाठी वेळ देतो का? सतत कुठल्या ना कुठल्या क्लासमध्ये असणाऱ्या मुलांकडून पुन्हा मैदानावर खेळायची अपेक्षा करणं अतिरेकाचं आहे. बरं आता आपण मोठ्या माणसांनीच मैदानं शिल्लक ठेवली आहेत का? जिकडे-तिकडे मोकळ्या जागांवर इमारती बांधायची हौस संपतच नाहीये. पालकांना स्वत:ला मुलाला वेळ देता येत नाही म्हणून टीव्हीची सवय वाढत चालली आहे. त्यात या पिढीचा काहीच दोष नाही. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आताच्या लहान मुलांना जितका अभ्यास करायला लागतो आणि ज्या पद्धतीचा अभ्यास करायला लागतो, तसा अभ्यास याआधीच्या पिढ्यांना नव्हता. या अभ्यासाचं स्वरूप खूप कठीण होत चाललंय. घरात कोणी नाही म्हणून एकटे राहण्याची किंवा नातेवाईकांकडे राहण्याची वेळ आल्यामुळे आई-वडिलांपासून मानसिकदृष्ट्या काहीशी दुरावत चाललेली ही पिढी किती मानसिक संघर्ष झेलत असेल, याची कल्पनाही आपल्याला येऊ शकत नाही. शाळेतल्या लहान-सहान गोष्टी, मारामाऱ्या, कौतुक, टीचरनी दिलेला रिमार्क यातलं काहीही ऐकण्यासाठी पालकांकडे वेळ नाही. त्यांच्या मानसिक क्षमतेपेक्षा अधिक ओझं त्यांच्यावर लादलं जातंय का, हे बघण्यासाठी आपल्याला वेळ नाही. तरीही ही पिढी तल्लख होत आहे. घरात नवीन आणलेल्या मोबाईलचा वापर कसा करायचा, हे शिकायला आपल्याला खूप वेळ लागतो. पण, घरातली लहान मुलं त्याबाबतची माहिती देतात. टी. व्ही.वरच्या जाहिराती पाहून मोबाईल, मोटरबाईक, चारचाकी गाड्या याबाबतची अतिशय चांगली माहिती त्यांच्याकडे असते. असंख्य संदर्भ (स्वत:शी निगडीत) ही मुले विसरत नाहीत. आई-वडिलांचं वागणं, त्यांच्या शिकवणुकीतील विसंवाद, त्यांचं इतरांशी असलेलं वागणं, यासारख्या अनेक गोष्टी त्यांच्याकडे ‘स्टोअर’ केलेल्या असतात. आता सर्वात चांगलं आणि ताजं उदाहरण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण आणि स्वच्छता मोहीम. कुठेही प्रवासाला जाताना गाडीत काहीतरी खायचं आणि खिडकीची काच खाली करून कागद बाहेर टाकून द्यायचे, हा आपल्या सर्वांचा आवडता उद्योग. पण, आता याला आवर घालायचं काम ही मुलंच करतात. मोदींनी सांगितलंय, रस्त्यावर कचरा करायचा नाही. कचरा सगळा एका पिशवीत भरून ठेवा. कचराकुंडी दिसली तरच त्यात टाका, असा सल्ला आता लहान मुले मोठ्यांना देऊ लागली आहेत. त्यांना चांगल्या गोष्टी कळतात. मुलांच्या माध्यमातून एखादी गोष्ट सहज अमलात येऊ शकते, हे मोदींचे विचार आता अनेक ठिकाणी प्रत्यक्षात येऊ लागले आहेत. आजची ही पिढी, त्यांच्याच भाषेत सांगायचं तर स्मार्ट आहे. नो उल्लू बनाविंग, हे त्यांचे ब्रीदवाक्य आहे. त्यांची निरीक्षण शक्ती खूप अफाट आहे. त्यांच्यासमोर बोलताना, वागताना जपून राहावं लागतं. अर्थात ही पिढी स्मार्ट आहे म्हणजे स्वयंपूर्ण नाही. या पिढीला सर्वात जास्त गरज कशाची असेल तर ती मानसिक आधाराची, संवादाची. त्यांच्या शाळेत दिवसभरात काय काय झालं, हे जेव्हा ती सांगतात ना तेव्हा काळजीपूर्वक ऐकायची. एवढं केलं तरी त्यांची वाढ निकोप आणि सुदृढ होईल, हे नक्की!--मनोज मुळ्ये