शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक

By admin | Updated: February 23, 2016 00:47 IST

इचलकरंजी नगरपालिका सभा : अनधिकृत धार्मिक स्थळांचा निर्णय जिल्हास्तरीय समितीने घेण्याचा प्रस्ताव

इचलकरंजी : शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांवरील करावयाच्या कारवाईसंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी बोलविण्यात आलेल्या नगरपालिकेच्या विशेष सभेमध्ये कॉँग्रेसमधीलच नगरसेवकांमध्ये वारंवार उडणारे खटके, प्रशासनावर होणारा प्रश्नांचा भडिमार आणि त्यातून उडणारा गोंधळ अशा घडामोडींमुळे सोमवारची सभा गाजली. दरम्यान, धार्मिक स्थळांबाबत सर्वोच्च न्यायालयात अद्याप सुनावणी सुरू असल्यामुळे जिल्हास्तरीय समितीने निर्णय घ्यावा, अशा आशयाचा प्रस्ताव या सभेमध्ये मंजूर केला. अनधिकृत धार्मिक स्थळे व शहरातील भुयारी गटार योजनेकडील ५४.६४ लाख रुपयांच्या खर्चाचे नळ बदलणे, या विषयावर नगराध्यक्ष शुभांगी बिरंजे यांनी ही विशेष सभा आयोजित केली होती. सभेच्या सुरुवातीलाच कृष्णा नळ योजनेची गळती आणि पाणीटंचाई, बंद असलेला कचरा व्यवस्थापन प्रकल्प व वैयक्तिक शौचालये बांधण्याच्या अनुदान योजनेतील भ्रष्टाचार अशा तीन विषयांवर नगरसेवक शशांक बावचकर यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. कृष्णा नळ योजनेची दाबनलिका बदलण्याचे काम जीवन प्राधिकरणाकडे देण्यात आले असल्याबद्दल बावचकर यांनी टीका केली. तसेच गौड यांनी नगरपालिकेच्या कूपनलिकांवर ‘टायमर’ बसविण्याची मागणी केली. यावेळी योग्य ती उपाययोजना प्रशासनाकडून करण्यात येईल, असे आश्वासन मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी दिले. अनधिकृत धार्मिक स्थळांच्या विषयाबाबत बोलताना या विषयाला बावचकर, भीमराव अतिग्रे, विठ्ठल चोपडे, सयाजी चव्हाण, बाळासाहेब कलागते, रवी रजपुते, श्रीरंग खवरे, तेजश्री भोसले व भाऊसाहेब आवळे यांनी आक्षेप घेतला. धार्मिक स्थळे निष्कासित करण्याचा विषय अतिशय स्फोटक आहे. इचलकरंजी शहर हे संवेदनशील असताना हा विषय प्रशासनाकडून सर्वसाधारण सभेसमोर का ठेवला? असाही प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. यावर उत्तर देताना मुख्याधिकारी डॉ. रसाळ म्हणाले, शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे म्हणून एकूण १२८ स्थळांची यादी तयार करण्यात आली होती. मात्र, त्याची छाननी करून सर्व स्थळे नियमित करण्यासाठी हा विषय सर्वसाधारण सभेसमोर ठेवला आहे. त्यातील ७२ धार्मिकस्थळांबाबत योग्य असा निर्णय सभागृहाने घ्यावा. यावर चोपडे यांनी पुन्हा आक्षेप घेतला. ते म्हणाले, हा विषय सर्वोच्च न्यायालयासमोर अद्यापही सुनावणीकरिता आहे. याबाबत न्यायालयाकडून मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुधारित मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे न्यायालयाने सांगितले आहे. त्यामुळे दरम्यानच्या काळात या विषयावर जिल्हा समितीनेच निर्णय घ्यावा, असा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.