शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

‘उत्तर-दक्षिण’ सुभ्यात ‘ताराराणी’च्याही जोडण्या

By admin | Updated: May 15, 2015 23:36 IST

महापालिका निवडणूक : काँग्रेसला बड्या नेत्यांतील अंतर्गत लाथाळ्यांचे ग्रहण; महाडिक कॉँग्रेसच्या परिघाबाहेरच

संतोष पाटील - कोल्हापूर -राष्ट्रीय काँग्रेसने कोल्हापूर महापालिका निवडणूक पक्षीय स्तरावर लढविण्याचा निर्णय घेतला असला तरी जिल्ह्यातील कॉँग्रेस नेत्यांतील राजकीय सख्य जगजाहीर आहे. उत्तर व दक्षिण शहर विधानसभा मतदारसंघनिहाय विभागणी करून उमेदवारी वाटपाचे अधिकार ज्या-त्या नेत्यांना दिले जाणार आहेत. जिल्ह्यातील कॉँग्रेसचे एकमेव आमदार महादेवराव महाडिक हे या सर्व प्रक्रियेपासूनच बाजूला असल्याने ‘ताराराणी आघाडी’ पुन्हा ताकदीने कामाला लागणार आहे. कॉँग्रेस कार्यकर्त्यांना उमेदवारीपेक्षा ऐन निवडणुकीत पक्षांतर्गत उडणाऱ्या या लाथाळ्यांची खरी भीती वाटत आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीचा मुहूर्त कॉँग्रेसने ठरविला असला तरी नेत्यांची सोयरीक जुळून येणार काय, हा खरा औत्सुक्याचा विषय आहे. महापालिकेच्या आॅक्टोबर महिन्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या नेतृत्वाखालील पी. एन. पाटील, सतेज पाटील, मालोजीराजे, सत्यजित कदम यांच्या समितीमार्फत उमेदवार निवडीसह प्रचार यंत्रणा राबविली जाणार आहे. वरवर पाहता ही समिती एकसंध दिसते; पण प्रत्यक्षात चौघाही नेत्यांचे वेगळे सुभे आहेत. कॉँग्रेसच्या या निवडणूक प्रक्रियेच्या परिघाबाहेर असलेल्या आमदार महादेवराव महाडिक यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनी ‘ताराराणी आघाडी’ची जोडणी सुरू केली आहे. त्यामुळे कॉँग्रेसमध्ये एकवेळ तिकीट वाटपावेळी गदारोळ होणार नाही. मात्र, प्रत्यक्ष निवडणुकीवेळी कुरघोडीच्या राजकारणाला अधिक ऊत येण्याची शक्यता आहे.माजी मंत्री पाटील यांना गत निवडणुकीप्रमाणे दक्षिण विधानसभा मतदारसंघातील २२ ते २५ व कसबा बावडा परिसरातील सहा अशा ३० हून अधिक प्रभागांतील उमेदवार निवडण्यापासून निवडून आणण्यापर्यंतची सर्व जबाबदारी दिली जाणार आहे. उर्वरित उत्तर मतदारसंघातील ४५ ते ५० उमेदवारीचे कॉँग्रेस व ताराराणी आघाडीच्या सोयीनुसारच वाटप होण्याची शक्यता अधिक आहे. याही निवडणुकीत महाडिक विरुद्ध सतेज पाटील अशी किनार असणार आहे. सतेज पाटील यांना १५पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवून द्यायचा नाही, अशी व्यूहरचना ‘कारभारी’ म्हणवणाऱ्यांनी केली आहे; तर पाटील यांनीही हा डाव उलटविण्याची पुरेपूर तयारी केली आहे. कॉँग्रेस विरुद्ध इतर पक्ष यापेक्षा पहिल्या टप्प्यात ‘कॉँग्रेस विरुद्ध कॉँग्रेस’ अशीच ही निवडणूक होणार आहे. या नेत्यांनी एकजुटीने निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे आश्वासन दिले असले तरी अंतर्गत गटबाजीने एकमेकांच्या पायात पाय घालण्याचेच प्रकार अधिक होणार, हे निश्चित आहे. नेते म्हणतात...कॉँग्रेसअंतर्गत असलेल्या गटबाजीबाबत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा केली आहे. त्यामुळे अंतर्गत लाथाळ्यांबाबत वरिष्ठ स्तरावरच उतारा काढला जाईल. सर्व घटकांना सोबत घेऊनच कॉँग्रेस निवडणुक ीला सामोरे जाईल. कॉँग्रेस एकजुटीनेच सामोरी जाईल. - पी. एन. पाटील, जिल्हाध्यक्ष कॉँग्रेसनिवडणुकीपूर्वी व नंतरही सर्व काही व्यवस्थित होईल, अशी आशा आहे. कॉँग्रेसला महापालिका निवडणुकीत मोठी संधी आहे. सर्वांनीच पक्षांतर्गत असलेली गटबाजी बाजूला ठेवून एकदिलाने निवडणुकीस सामोरे गेल्यास कॉँग्रेसची महापालिकेवर सत्ता येण्यास काहीच अडचण नाही. - सतेज पाटील, माजी मंत्री कॉँग्रेसमध्ये गटतट आहेत. प्रत्येक गट प्रबळ आहे. वरिष्ठांनी लक्ष घालून नेत्यांची एकमूठ बांधल्यास यश मिळविण्यात काहीच अडचण नाही. प्रत्येक नेत्याने हटवादी भूमिका बाजूला ठेवून व्यापक पक्षीय हितासाठी तडजोडीची भूमिका स्वीकारण्याची गरज आहे. - मालोजीराजे, माजी आमदार ‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले.’ मात्र, नेत्यांनी बोलण्याप्रमाणे वागले पाहिजे. पक्षांतर्गत कुरघोडीचे राजकारण थांबविले नाही तर कॉँग्रेस शहरात जिवंत राहणार नाही. नेत्यांनी याबाबत विचार करूनच निर्णय घ्यावा. - सत्यजित कदम, नगरसेवकपक्षीय बलाबलपक्षसंख्याबळअपक्षकाँग्रेस३३०२राष्ट्रवादी२६०१शिवसेना-भाजप आघाडी०९०२जनसुराज्य आघाडी०९०५स्वीकृत - ०५१ महादेवराव महाडिक हे जिल्ह्यातील कॉँग्रेसचे एकमेव आमदार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था हा त्यांचा मतदारसंघ आहे. तरीही कॉँग्रेसच्या निवडणूक तयारीच्या प्रक्रियेत त्यांचा थेट सहभाग अद्याप दिसत नाही. याबाबत प्रतिक्रियेसाठी महाडिक उपलब्ध झाले नाहीत. महाडिक हे स्वत:हून प्रक्रियेच्या बाहेर आहेत की त्यांना विधानसभा मतदारसंघ रचनेनुसार नेतृत्व हे पक्षाचे धोरण म्हणून बाजूला ठेवले याबाबत मतांतरे आहेत. महाडिक रिंंगणातून बाजूला थांबल्यास कॉँग्रेसला डोकेदुखी ठरणाऱ्या ताराराणी आघाडीला बळ मिळणार असल्याची चर्चा आहे.२ कॉँग्रेसने शहरातील सर्व ७७ प्रभागांत २०१० साली निवडणूक लढविली होती. यातील ३१ जागांवर एकहाती विजय मिळविला; तर आठहून अधिक उमेदवार निसटत्या फरकाने विजयी झाले. ऐनवेळी पडद्यामागे दगाफटका झाल्याने महापालिकेवर एकहाती सत्ता मिळविण्याच्या मनसुब्यावर पाणी पडले होते. याचीच पुन्हा पुनरावृत्ती होईल, अशी धास्ती कार्यकर्त्यांना आहे.