शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

माणुसकीचा दुवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 00:07 IST

कोल्हापूर शहराला सामाजिक प्रबोधनाची आणि सेवेची फार मोठी परंपरा आहे. अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून ही परंपरा आजही तितक्याच जोमाने पुढे नेली जात आहे. नव्या पिढीचा प्रयत्न अतिशय चांगला आणि इतरांनी प्रेरणा देणारा नक्कीच आहे. समाजात जितके गरजवंत आहेत, त्याच्या कितीतरी पटीने या गरजवंतांना मदत करणारे दानशूर आहेत. फक्त समाजाची गरज ओळखून ...

कोल्हापूर शहराला सामाजिक प्रबोधनाची आणि सेवेची फार मोठी परंपरा आहे. अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून ही परंपरा आजही तितक्याच जोमाने पुढे नेली जात आहे. नव्या पिढीचा प्रयत्न अतिशय चांगला आणि इतरांनी प्रेरणा देणारा नक्कीच आहे. समाजात जितके गरजवंत आहेत, त्याच्या कितीतरी पटीने या गरजवंतांना मदत करणारे दानशूर आहेत. फक्त समाजाची गरज ओळखून मदत गोळा करणाºया आणि गोळा झालेली मदत गरजवंतांपर्यंत पोहोचविणाºया कार्यकर्त्यांची आवश्यकता असते. ती आपल्याकडे कमी नाही. अनेक ग्रुप, संस्था, संघटना अशा प्रकारची कामे करत आहेत. त्यामुळे गरजू लोकांपर्यंत योग्य मदत मिळते आणि मनस्वी आनंदही मिळतो. हिंदू धर्मातील दिवाळीसारख्या मोठ्या सणाच्या आनंदात उपेक्षित, गोरगरिबांनाही सामावून घेण्याचा प्रयत्न कोल्हापुरात झाला, आजही होताना पाहायला मिळतो.दिवाळीला नवीन कपडे आणि खमंग फराळ या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. त्यामुळेच सर्वत्र उत्साही, आनंदी वातावरण निर्माण झालेले असते. प्रत्येक जण आपापल्या ऐपतीप्रमाणे दिवाळी साजरी करतात; परंतु ज्यांची ऐपत नाही असाही एक घटक समाजात आहे. अशा उपेक्षित, गोरगरिबांना दिवाळाची आनंद मिळवून देण्याचा प्रयत्न ‘माणुसकीची भिंत’ या उपक्रमातून गेल्या दोन वर्षांपासून होत आहे. यंदाचे हे दुसरे वर्ष होते. गतवर्षीपेक्षा यंदा प्रचंड प्रतिसाद मिळाला. हा प्रतिसाद देणाºयांकडून मिळाला तसा तो घेणाºयांकडूनही मिळाला. त्यामुळे ज्या उद्देशाने हा उपक्रम सुरू झाला, तो यशस्वी ठरला असे मानायला काहीच हरकत नाही. आमदार सतेज पाटील, मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर यांच्या पुढाकारातून या उपक्रमास एक लाखावर कपडे मिळाले, त्याचे वितरणही गरजूपर्यंत झाले. या उपक्रमाची दखल अन्य जिल्ह्यांत घेऊन तेथेही असे उपक्रम सुरू झाले आहेत हे या कार्याची पोहोचपावतीच म्हणावी लागेल.खरंतर अशाप्रकारचा उपक्रम गेल्या सात-आठ वर्षांपासून कोल्हापुरात सुरू आहे. जुने कपडे घेऊन ती बाबा आमटे यांच्या ‘आनंदवन’ आश्रमाकडे पाठविण्याचा उपक्रम महालक्ष्मी अ‍ॅपरल्सचे रवींद्र ओबेरॉय यांनी सुरू केला. त्यालाही मोठा प्रतिसाद मिळत होता. चांगल्या सुस्थितील इस्त्री केलेले कपडे दिवाळीत गोळा करून ओबेरॉय स्वत: ‘आनंदवन’ला जाऊन हे कपडे गरीब, पीडितांना देत असत. या उपक्रमाससुद्धा समाजाने भरपूर प्रतिसाद दिला, अनेकांनी कौतुकही केले.कोल्हापूर शहरात एकीकडे ‘माणुसकीची भिंत’ उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत असताना दुसरीकडे खासदार धनंजय महाडिक यांनी ‘आपुलकीची दिवाळी’ या उपक्रमाची यंदापासून सुरुवात केली. गोरगरिबांना फराळ वाटण्याचा हा उपक्रम आहे. ज्यांना दोनवेळच्या जेवणाची विवंचना आहे अशांना दिवाळीचे गोडधोड पदार्थ खायला मिळणे अवघडच. फराळ विकत घेऊन खाणे किंवा करून खाणं परवडणारे नाही. त्यांच्यासमोर ऐन दिवाळीत फराळासाठी भीक मागण्याची वेळ येत असते. या गोरगरिबांची गरज ओळखून आणि त्यांनाही दिवाळीचा आनंद द्विगुणित करता यावा म्हणून हा उपक्रम सुरू झाला. त्यालाही यंदा चांगला प्रतिसाद मिळाला. समाजात अशाप्रकारचे उपक्रम राबविणारे असंख्य कार्यकर्ते आहेत. सगळ्याच उपक्रमांना प्रसिद्धी मिळते असं काही नाही. जे वृत्तपत्र कार्यालयापर्यंत पोहोचतात, त्यांच्या उपक्रमांना प्रसिद्धी मिळते; परंतु समाजात असेही काही अवलिया आहेत की गोरगरिबांना एका हाताने केलेली मदत ही दुसºया हाताला कळता कामा नये, असे मानणाºयांपैकी आहेत. गरजूंना केलेल्या मदतीची ही मंडळी कधीही कुठेही वाच्यता करत नाहीत. अगदी नि:स्वार्थी वृत्तीने, कशाचीही अपेक्षा न ठेवता स्वकमाईतून मदत करत राहतात म्हणूनच त्यांचेसुद्धा सामाजिक काम कौतुकास्पद आहे. - भारत चव्हाण