शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

माणुसकीचा दुवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 00:07 IST

कोल्हापूर शहराला सामाजिक प्रबोधनाची आणि सेवेची फार मोठी परंपरा आहे. अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून ही परंपरा आजही तितक्याच जोमाने पुढे नेली जात आहे. नव्या पिढीचा प्रयत्न अतिशय चांगला आणि इतरांनी प्रेरणा देणारा नक्कीच आहे. समाजात जितके गरजवंत आहेत, त्याच्या कितीतरी पटीने या गरजवंतांना मदत करणारे दानशूर आहेत. फक्त समाजाची गरज ओळखून ...

कोल्हापूर शहराला सामाजिक प्रबोधनाची आणि सेवेची फार मोठी परंपरा आहे. अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून ही परंपरा आजही तितक्याच जोमाने पुढे नेली जात आहे. नव्या पिढीचा प्रयत्न अतिशय चांगला आणि इतरांनी प्रेरणा देणारा नक्कीच आहे. समाजात जितके गरजवंत आहेत, त्याच्या कितीतरी पटीने या गरजवंतांना मदत करणारे दानशूर आहेत. फक्त समाजाची गरज ओळखून मदत गोळा करणाºया आणि गोळा झालेली मदत गरजवंतांपर्यंत पोहोचविणाºया कार्यकर्त्यांची आवश्यकता असते. ती आपल्याकडे कमी नाही. अनेक ग्रुप, संस्था, संघटना अशा प्रकारची कामे करत आहेत. त्यामुळे गरजू लोकांपर्यंत योग्य मदत मिळते आणि मनस्वी आनंदही मिळतो. हिंदू धर्मातील दिवाळीसारख्या मोठ्या सणाच्या आनंदात उपेक्षित, गोरगरिबांनाही सामावून घेण्याचा प्रयत्न कोल्हापुरात झाला, आजही होताना पाहायला मिळतो.दिवाळीला नवीन कपडे आणि खमंग फराळ या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. त्यामुळेच सर्वत्र उत्साही, आनंदी वातावरण निर्माण झालेले असते. प्रत्येक जण आपापल्या ऐपतीप्रमाणे दिवाळी साजरी करतात; परंतु ज्यांची ऐपत नाही असाही एक घटक समाजात आहे. अशा उपेक्षित, गोरगरिबांना दिवाळाची आनंद मिळवून देण्याचा प्रयत्न ‘माणुसकीची भिंत’ या उपक्रमातून गेल्या दोन वर्षांपासून होत आहे. यंदाचे हे दुसरे वर्ष होते. गतवर्षीपेक्षा यंदा प्रचंड प्रतिसाद मिळाला. हा प्रतिसाद देणाºयांकडून मिळाला तसा तो घेणाºयांकडूनही मिळाला. त्यामुळे ज्या उद्देशाने हा उपक्रम सुरू झाला, तो यशस्वी ठरला असे मानायला काहीच हरकत नाही. आमदार सतेज पाटील, मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर यांच्या पुढाकारातून या उपक्रमास एक लाखावर कपडे मिळाले, त्याचे वितरणही गरजूपर्यंत झाले. या उपक्रमाची दखल अन्य जिल्ह्यांत घेऊन तेथेही असे उपक्रम सुरू झाले आहेत हे या कार्याची पोहोचपावतीच म्हणावी लागेल.खरंतर अशाप्रकारचा उपक्रम गेल्या सात-आठ वर्षांपासून कोल्हापुरात सुरू आहे. जुने कपडे घेऊन ती बाबा आमटे यांच्या ‘आनंदवन’ आश्रमाकडे पाठविण्याचा उपक्रम महालक्ष्मी अ‍ॅपरल्सचे रवींद्र ओबेरॉय यांनी सुरू केला. त्यालाही मोठा प्रतिसाद मिळत होता. चांगल्या सुस्थितील इस्त्री केलेले कपडे दिवाळीत गोळा करून ओबेरॉय स्वत: ‘आनंदवन’ला जाऊन हे कपडे गरीब, पीडितांना देत असत. या उपक्रमाससुद्धा समाजाने भरपूर प्रतिसाद दिला, अनेकांनी कौतुकही केले.कोल्हापूर शहरात एकीकडे ‘माणुसकीची भिंत’ उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत असताना दुसरीकडे खासदार धनंजय महाडिक यांनी ‘आपुलकीची दिवाळी’ या उपक्रमाची यंदापासून सुरुवात केली. गोरगरिबांना फराळ वाटण्याचा हा उपक्रम आहे. ज्यांना दोनवेळच्या जेवणाची विवंचना आहे अशांना दिवाळीचे गोडधोड पदार्थ खायला मिळणे अवघडच. फराळ विकत घेऊन खाणे किंवा करून खाणं परवडणारे नाही. त्यांच्यासमोर ऐन दिवाळीत फराळासाठी भीक मागण्याची वेळ येत असते. या गोरगरिबांची गरज ओळखून आणि त्यांनाही दिवाळीचा आनंद द्विगुणित करता यावा म्हणून हा उपक्रम सुरू झाला. त्यालाही यंदा चांगला प्रतिसाद मिळाला. समाजात अशाप्रकारचे उपक्रम राबविणारे असंख्य कार्यकर्ते आहेत. सगळ्याच उपक्रमांना प्रसिद्धी मिळते असं काही नाही. जे वृत्तपत्र कार्यालयापर्यंत पोहोचतात, त्यांच्या उपक्रमांना प्रसिद्धी मिळते; परंतु समाजात असेही काही अवलिया आहेत की गोरगरिबांना एका हाताने केलेली मदत ही दुसºया हाताला कळता कामा नये, असे मानणाºयांपैकी आहेत. गरजूंना केलेल्या मदतीची ही मंडळी कधीही कुठेही वाच्यता करत नाहीत. अगदी नि:स्वार्थी वृत्तीने, कशाचीही अपेक्षा न ठेवता स्वकमाईतून मदत करत राहतात म्हणूनच त्यांचेसुद्धा सामाजिक काम कौतुकास्पद आहे. - भारत चव्हाण