शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

माणुसकीचा दुवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 00:07 IST

कोल्हापूर शहराला सामाजिक प्रबोधनाची आणि सेवेची फार मोठी परंपरा आहे. अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून ही परंपरा आजही तितक्याच जोमाने पुढे नेली जात आहे. नव्या पिढीचा प्रयत्न अतिशय चांगला आणि इतरांनी प्रेरणा देणारा नक्कीच आहे. समाजात जितके गरजवंत आहेत, त्याच्या कितीतरी पटीने या गरजवंतांना मदत करणारे दानशूर आहेत. फक्त समाजाची गरज ओळखून ...

कोल्हापूर शहराला सामाजिक प्रबोधनाची आणि सेवेची फार मोठी परंपरा आहे. अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून ही परंपरा आजही तितक्याच जोमाने पुढे नेली जात आहे. नव्या पिढीचा प्रयत्न अतिशय चांगला आणि इतरांनी प्रेरणा देणारा नक्कीच आहे. समाजात जितके गरजवंत आहेत, त्याच्या कितीतरी पटीने या गरजवंतांना मदत करणारे दानशूर आहेत. फक्त समाजाची गरज ओळखून मदत गोळा करणाºया आणि गोळा झालेली मदत गरजवंतांपर्यंत पोहोचविणाºया कार्यकर्त्यांची आवश्यकता असते. ती आपल्याकडे कमी नाही. अनेक ग्रुप, संस्था, संघटना अशा प्रकारची कामे करत आहेत. त्यामुळे गरजू लोकांपर्यंत योग्य मदत मिळते आणि मनस्वी आनंदही मिळतो. हिंदू धर्मातील दिवाळीसारख्या मोठ्या सणाच्या आनंदात उपेक्षित, गोरगरिबांनाही सामावून घेण्याचा प्रयत्न कोल्हापुरात झाला, आजही होताना पाहायला मिळतो.दिवाळीला नवीन कपडे आणि खमंग फराळ या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. त्यामुळेच सर्वत्र उत्साही, आनंदी वातावरण निर्माण झालेले असते. प्रत्येक जण आपापल्या ऐपतीप्रमाणे दिवाळी साजरी करतात; परंतु ज्यांची ऐपत नाही असाही एक घटक समाजात आहे. अशा उपेक्षित, गोरगरिबांना दिवाळाची आनंद मिळवून देण्याचा प्रयत्न ‘माणुसकीची भिंत’ या उपक्रमातून गेल्या दोन वर्षांपासून होत आहे. यंदाचे हे दुसरे वर्ष होते. गतवर्षीपेक्षा यंदा प्रचंड प्रतिसाद मिळाला. हा प्रतिसाद देणाºयांकडून मिळाला तसा तो घेणाºयांकडूनही मिळाला. त्यामुळे ज्या उद्देशाने हा उपक्रम सुरू झाला, तो यशस्वी ठरला असे मानायला काहीच हरकत नाही. आमदार सतेज पाटील, मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर यांच्या पुढाकारातून या उपक्रमास एक लाखावर कपडे मिळाले, त्याचे वितरणही गरजूपर्यंत झाले. या उपक्रमाची दखल अन्य जिल्ह्यांत घेऊन तेथेही असे उपक्रम सुरू झाले आहेत हे या कार्याची पोहोचपावतीच म्हणावी लागेल.खरंतर अशाप्रकारचा उपक्रम गेल्या सात-आठ वर्षांपासून कोल्हापुरात सुरू आहे. जुने कपडे घेऊन ती बाबा आमटे यांच्या ‘आनंदवन’ आश्रमाकडे पाठविण्याचा उपक्रम महालक्ष्मी अ‍ॅपरल्सचे रवींद्र ओबेरॉय यांनी सुरू केला. त्यालाही मोठा प्रतिसाद मिळत होता. चांगल्या सुस्थितील इस्त्री केलेले कपडे दिवाळीत गोळा करून ओबेरॉय स्वत: ‘आनंदवन’ला जाऊन हे कपडे गरीब, पीडितांना देत असत. या उपक्रमाससुद्धा समाजाने भरपूर प्रतिसाद दिला, अनेकांनी कौतुकही केले.कोल्हापूर शहरात एकीकडे ‘माणुसकीची भिंत’ उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत असताना दुसरीकडे खासदार धनंजय महाडिक यांनी ‘आपुलकीची दिवाळी’ या उपक्रमाची यंदापासून सुरुवात केली. गोरगरिबांना फराळ वाटण्याचा हा उपक्रम आहे. ज्यांना दोनवेळच्या जेवणाची विवंचना आहे अशांना दिवाळीचे गोडधोड पदार्थ खायला मिळणे अवघडच. फराळ विकत घेऊन खाणे किंवा करून खाणं परवडणारे नाही. त्यांच्यासमोर ऐन दिवाळीत फराळासाठी भीक मागण्याची वेळ येत असते. या गोरगरिबांची गरज ओळखून आणि त्यांनाही दिवाळीचा आनंद द्विगुणित करता यावा म्हणून हा उपक्रम सुरू झाला. त्यालाही यंदा चांगला प्रतिसाद मिळाला. समाजात अशाप्रकारचे उपक्रम राबविणारे असंख्य कार्यकर्ते आहेत. सगळ्याच उपक्रमांना प्रसिद्धी मिळते असं काही नाही. जे वृत्तपत्र कार्यालयापर्यंत पोहोचतात, त्यांच्या उपक्रमांना प्रसिद्धी मिळते; परंतु समाजात असेही काही अवलिया आहेत की गोरगरिबांना एका हाताने केलेली मदत ही दुसºया हाताला कळता कामा नये, असे मानणाºयांपैकी आहेत. गरजूंना केलेल्या मदतीची ही मंडळी कधीही कुठेही वाच्यता करत नाहीत. अगदी नि:स्वार्थी वृत्तीने, कशाचीही अपेक्षा न ठेवता स्वकमाईतून मदत करत राहतात म्हणूनच त्यांचेसुद्धा सामाजिक काम कौतुकास्पद आहे. - भारत चव्हाण