शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

राधानगरी अभयारण्यातील गावांचा रेंगाळलेला पुनर्वसन प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:23 IST

संजय पारकर लोकमत न्यूज नेटवर्क राधानगरी : विस्तारित राधानगरी अभयारण्यामुळे विस्थापित होणाऱ्या ३० गावांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय २० ...

संजय पारकर

लोकमत न्यूज नेटवर्क

राधानगरी : विस्तारित राधानगरी अभयारण्यामुळे विस्थापित होणाऱ्या ३० गावांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय २० वर्षापूर्वी झाला. १० वर्षांपासून त्याची प्रक्रिया सुरू झाली. मात्र आतापर्यंत एकाही गावाचे पुनर्वसन पूर्ण झालेले नाही. यासाठी २१४.८२ कोटी निधीचा अंदाज व्यक्त केला होता. यापैकी केवळ १८.३० कोटीच मिळाले आहेत. यातून तीन वाड्यांचे काम अर्धवट झाले आहे. निधीची उपलब्धता व या प्रक्रियेची गती पाहता पुढील पन्नास वर्षांतही हे काम पूर्ण होण्याची शक्यता नाही. आंबेओहोळ व उचंगी प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यामुळे ना वन्यजिवांच्या सुरक्षेसाठी लोकांचे स्थलांतर करण्याचा उद्देश सफल झाला; ना लोकांची गैरसोय दूर झाली, अशी स्थिती आहे.

संस्थानकाळात शाहू महाराजांनी दाजीपूरचे हे जंगल शिकारीसाठी राखीव ठेवले होते. स्वातंत्र्यानंतर १९५८ साली याचे राज्यातील पहिले अभयारण्य करण्यात आले. येथे विपुल व दुर्मीळ जैववैविध्य असल्याने १९८५ मध्ये त्याचा विस्तार करण्यात आला. त्याचे क्षेत्रफळ ३५१.१४ चौरस कि.मी. झाले. यात राधानगरी तालुक्यातील संलग्न १२ गावांतील २९ वाड्या-वस्त्या व गगनबावडा तालुक्यातील एका गावाचा समावेश झाला. मात्र त्यावेळी या लोकांना कोणत्याही प्रकारची माहिती दिली नव्हती. जसजसे वन्यजीव विभागाचे निर्बंध सुरू झाले अशी लोकांची गैरसोय सुरू झाली. लोकांची ओरड सुरू झाल्यावर २००० सालात महसूल व वन्यजीव विभागाने लोकांचे हक्क व सवलतींची पाहणी केली. त्यावेळी लोकांनी पुनर्वसन करण्याची मागणी केली होती.

शहरात धाव

अभयारण्य होण्यापूर्वी येथील लोक जंगलातील मध, डिंक, हिरडा, बेहडा, तमालपत्री यांसारख्या वनउपज वस्तू जमा करून विकत असत. वन विभाग त्यासाठी लिलाव करीत असे. मात्र हे सर्व आता बंद झाले आहे. हा सर्व परिसर केवळ पावसाळ्यातील पिकांवर अवलंबून आहे. त्यामुळे लोकांना रोजगारासाठी मोठ्या शहरांत धाव घ्यावी लागते. परिणामी येथे राहणाऱ्या लोकांची संख्या तुरळक आहे. एरवी बाहेर राहावे लागतेच; मग पुनर्वसन झाले तर बरेच, अशी या लोकांची मानसिकता आहे.

जमीन संपादित करावी लागेल

सन २००० सालात झालेल्या पाहणीत १२ म्हासुली गावातील ३० वाड्यांतील ११५६ कुटुंबे, १४९९ खातेदार त्यांची १४७७ घरे व २४११.९८ हेक्टर जमीन बाधित होत होती. याशिवाय दूधगंगा धरणाच्या काठावरील अगोदर विस्थापित झालेल्या ८ गावांतील ४११ खातेदारांची ५२९ हेक्टर शिल्लक जमीन संपादित करावी लागेल, असा अहवाल तयार झाला.