शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

दीपावलीपूर्वीच यंत्रमाग कारखाने बंद

By admin | Updated: October 14, 2016 01:21 IST

वस्त्रोद्योगातील आर्थिक मंदीचा परिणाम : कामगारांचे वार्षिक हिशेब भागविण्यास सुरुवात

इचलकरंजी : वस्त्रोद्योगातील आर्थिक मंदी अधिकच गडद झाल्याने सूतगिरण्यांपाठोपाठ येथील यंत्रमाग कारखाने दीपावलीपूर्वीच बंद पडण्यास सुरुवात झाली आहे. दीपावली बक्षिसासह कामगारांच्या वार्षिक हिशेबाची रक्कम भागवून नजीकच्या आठवड्यात वस्त्रनगरीतील चक्रे पूर्णपणे थांबणार आहेत. आगामी लग्नसराई हंगामाच्या पार्श्वभूमीवर दीपावली सणानंतर आठवड्याभरात दरवर्षी यंत्रमाग कारखाने सुरू होतात. मात्र, हंगामासाठी कापडास मागणी येण्याची चिन्हे दिसत नसल्याने यंत्रमाग कारखाने पुन्हा ताबडतोब चालू होण्याची शंका व्यक्त होत आहे.महाराष्ट्राबरोबर देशातील काही राज्यांत गेली दोन-तीन वर्षे दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. दुष्काळामुळे शेतकऱ्यांसह अन्य उद्योगधंद्यांमध्येही मंदीचेच वातावरण आहे. तसेच अलीकडील काळात लोकांच्या विशेषत: युवा पिढीच्या गरजा बदलल्या आहेत. अन्न-पाण्यापाठोपाठ टी.व्ही., मोबाईल, दुचाकी वाहन यांना प्राधान्य दिले जाते आणि त्यानंतर कपड्यांचा नंबर लागतो आणि अलीकडील कपडे पूर्वीपेक्षा टिकावू आहेत. अशा कारणांमुळे वस्त्रोद्योगामध्ये काहीशी मंदी होती.दुष्काळामुळे कापसाचे पीक कमी झाले आणि जून महिन्यापासून कापसाची टंचाई जाणवू लागली आहे. ३६ हजार रुपये प्रती खंडी मिळणारा कापूस ५० हजार रुपयांवर पोहोचला. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील विजेचे भाव महाग झाले. सुताच्या दराबरोबर कापडाचा उत्पादन खर्च वाढला. वाढलेल्या उत्पादन खर्चाच्या प्रमाणात कापडाला भाव मिळत नाही आणि कापडाला मागणी नसल्याने कापड उत्पादक पर्यायाने यंत्रमागधारक नुकसानीत गेला.अशा स्थितीत शासनाने यंत्रमाग उद्योगाला ऊर्जितावस्था मिळवून द्यावी, अशी अपेक्षा यंत्रमाग उद्योजक करू लागले. वीजदर सवलत, कर्जावरील व्याजदराचेअनुदान, चीनमधून आयात केलेल्या कापडावर बंदी, अशा मागण्या राज्य व केंद्र सरकारकडे करण्यात आल्या. या मागण्यांनी सरकारने प्रतिसादही दिला; पण प्रत्यक्षात पदरात काहीही पडले नसल्याने यंत्रमाग उद्योजकांत नाराजी व नैराश्य पसरले आहे. अशा पार्श्वभूमीवर आता नुकसानीत सुरू असलेले यंत्रमाग कारखाने बंद करण्याचा निर्णय यंत्रमागधारक घेऊ लागले आहेत. (प्रतिनिधी)आगामी हंगामाची साशंकताआगामी लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर कापडाचा उठाव होईल. चांगला भाव मिळेल, अशा आशेने यंत्रमाग कारखाने दीपावलीनंतर आठवड्याभरात सुरू होत. पण, सरकारचे दुर्लक्ष आणि लग्नसराईच्या काळात तरी कापडास मागणी वाढेल का, याबाबत साशंकता असल्याने आता दीपावलीनंतरही कारखाने ताबडतोब सुरू होण्याची शक्यता नसल्याची चर्चा येथील वस्त्रोद्योगात आहे.