शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
4
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
5
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
6
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
7
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
8
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
9
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
10
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
11
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
12
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
13
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
14
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
15
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
16
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
17
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
18
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
19
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
20
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची

दीपावलीपूर्वीच यंत्रमाग कारखाने बंद

By admin | Updated: October 14, 2016 01:21 IST

वस्त्रोद्योगातील आर्थिक मंदीचा परिणाम : कामगारांचे वार्षिक हिशेब भागविण्यास सुरुवात

इचलकरंजी : वस्त्रोद्योगातील आर्थिक मंदी अधिकच गडद झाल्याने सूतगिरण्यांपाठोपाठ येथील यंत्रमाग कारखाने दीपावलीपूर्वीच बंद पडण्यास सुरुवात झाली आहे. दीपावली बक्षिसासह कामगारांच्या वार्षिक हिशेबाची रक्कम भागवून नजीकच्या आठवड्यात वस्त्रनगरीतील चक्रे पूर्णपणे थांबणार आहेत. आगामी लग्नसराई हंगामाच्या पार्श्वभूमीवर दीपावली सणानंतर आठवड्याभरात दरवर्षी यंत्रमाग कारखाने सुरू होतात. मात्र, हंगामासाठी कापडास मागणी येण्याची चिन्हे दिसत नसल्याने यंत्रमाग कारखाने पुन्हा ताबडतोब चालू होण्याची शंका व्यक्त होत आहे.महाराष्ट्राबरोबर देशातील काही राज्यांत गेली दोन-तीन वर्षे दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. दुष्काळामुळे शेतकऱ्यांसह अन्य उद्योगधंद्यांमध्येही मंदीचेच वातावरण आहे. तसेच अलीकडील काळात लोकांच्या विशेषत: युवा पिढीच्या गरजा बदलल्या आहेत. अन्न-पाण्यापाठोपाठ टी.व्ही., मोबाईल, दुचाकी वाहन यांना प्राधान्य दिले जाते आणि त्यानंतर कपड्यांचा नंबर लागतो आणि अलीकडील कपडे पूर्वीपेक्षा टिकावू आहेत. अशा कारणांमुळे वस्त्रोद्योगामध्ये काहीशी मंदी होती.दुष्काळामुळे कापसाचे पीक कमी झाले आणि जून महिन्यापासून कापसाची टंचाई जाणवू लागली आहे. ३६ हजार रुपये प्रती खंडी मिळणारा कापूस ५० हजार रुपयांवर पोहोचला. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील विजेचे भाव महाग झाले. सुताच्या दराबरोबर कापडाचा उत्पादन खर्च वाढला. वाढलेल्या उत्पादन खर्चाच्या प्रमाणात कापडाला भाव मिळत नाही आणि कापडाला मागणी नसल्याने कापड उत्पादक पर्यायाने यंत्रमागधारक नुकसानीत गेला.अशा स्थितीत शासनाने यंत्रमाग उद्योगाला ऊर्जितावस्था मिळवून द्यावी, अशी अपेक्षा यंत्रमाग उद्योजक करू लागले. वीजदर सवलत, कर्जावरील व्याजदराचेअनुदान, चीनमधून आयात केलेल्या कापडावर बंदी, अशा मागण्या राज्य व केंद्र सरकारकडे करण्यात आल्या. या मागण्यांनी सरकारने प्रतिसादही दिला; पण प्रत्यक्षात पदरात काहीही पडले नसल्याने यंत्रमाग उद्योजकांत नाराजी व नैराश्य पसरले आहे. अशा पार्श्वभूमीवर आता नुकसानीत सुरू असलेले यंत्रमाग कारखाने बंद करण्याचा निर्णय यंत्रमागधारक घेऊ लागले आहेत. (प्रतिनिधी)आगामी हंगामाची साशंकताआगामी लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर कापडाचा उठाव होईल. चांगला भाव मिळेल, अशा आशेने यंत्रमाग कारखाने दीपावलीनंतर आठवड्याभरात सुरू होत. पण, सरकारचे दुर्लक्ष आणि लग्नसराईच्या काळात तरी कापडास मागणी वाढेल का, याबाबत साशंकता असल्याने आता दीपावलीनंतरही कारखाने ताबडतोब सुरू होण्याची शक्यता नसल्याची चर्चा येथील वस्त्रोद्योगात आहे.