शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

दीपावलीपूर्वीच यंत्रमाग कारखाने बंद

By admin | Updated: October 14, 2016 01:21 IST

वस्त्रोद्योगातील आर्थिक मंदीचा परिणाम : कामगारांचे वार्षिक हिशेब भागविण्यास सुरुवात

इचलकरंजी : वस्त्रोद्योगातील आर्थिक मंदी अधिकच गडद झाल्याने सूतगिरण्यांपाठोपाठ येथील यंत्रमाग कारखाने दीपावलीपूर्वीच बंद पडण्यास सुरुवात झाली आहे. दीपावली बक्षिसासह कामगारांच्या वार्षिक हिशेबाची रक्कम भागवून नजीकच्या आठवड्यात वस्त्रनगरीतील चक्रे पूर्णपणे थांबणार आहेत. आगामी लग्नसराई हंगामाच्या पार्श्वभूमीवर दीपावली सणानंतर आठवड्याभरात दरवर्षी यंत्रमाग कारखाने सुरू होतात. मात्र, हंगामासाठी कापडास मागणी येण्याची चिन्हे दिसत नसल्याने यंत्रमाग कारखाने पुन्हा ताबडतोब चालू होण्याची शंका व्यक्त होत आहे.महाराष्ट्राबरोबर देशातील काही राज्यांत गेली दोन-तीन वर्षे दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. दुष्काळामुळे शेतकऱ्यांसह अन्य उद्योगधंद्यांमध्येही मंदीचेच वातावरण आहे. तसेच अलीकडील काळात लोकांच्या विशेषत: युवा पिढीच्या गरजा बदलल्या आहेत. अन्न-पाण्यापाठोपाठ टी.व्ही., मोबाईल, दुचाकी वाहन यांना प्राधान्य दिले जाते आणि त्यानंतर कपड्यांचा नंबर लागतो आणि अलीकडील कपडे पूर्वीपेक्षा टिकावू आहेत. अशा कारणांमुळे वस्त्रोद्योगामध्ये काहीशी मंदी होती.दुष्काळामुळे कापसाचे पीक कमी झाले आणि जून महिन्यापासून कापसाची टंचाई जाणवू लागली आहे. ३६ हजार रुपये प्रती खंडी मिळणारा कापूस ५० हजार रुपयांवर पोहोचला. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील विजेचे भाव महाग झाले. सुताच्या दराबरोबर कापडाचा उत्पादन खर्च वाढला. वाढलेल्या उत्पादन खर्चाच्या प्रमाणात कापडाला भाव मिळत नाही आणि कापडाला मागणी नसल्याने कापड उत्पादक पर्यायाने यंत्रमागधारक नुकसानीत गेला.अशा स्थितीत शासनाने यंत्रमाग उद्योगाला ऊर्जितावस्था मिळवून द्यावी, अशी अपेक्षा यंत्रमाग उद्योजक करू लागले. वीजदर सवलत, कर्जावरील व्याजदराचेअनुदान, चीनमधून आयात केलेल्या कापडावर बंदी, अशा मागण्या राज्य व केंद्र सरकारकडे करण्यात आल्या. या मागण्यांनी सरकारने प्रतिसादही दिला; पण प्रत्यक्षात पदरात काहीही पडले नसल्याने यंत्रमाग उद्योजकांत नाराजी व नैराश्य पसरले आहे. अशा पार्श्वभूमीवर आता नुकसानीत सुरू असलेले यंत्रमाग कारखाने बंद करण्याचा निर्णय यंत्रमागधारक घेऊ लागले आहेत. (प्रतिनिधी)आगामी हंगामाची साशंकताआगामी लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर कापडाचा उठाव होईल. चांगला भाव मिळेल, अशा आशेने यंत्रमाग कारखाने दीपावलीनंतर आठवड्याभरात सुरू होत. पण, सरकारचे दुर्लक्ष आणि लग्नसराईच्या काळात तरी कापडास मागणी वाढेल का, याबाबत साशंकता असल्याने आता दीपावलीनंतरही कारखाने ताबडतोब सुरू होण्याची शक्यता नसल्याची चर्चा येथील वस्त्रोद्योगात आहे.