शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
8
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
10
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
11
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
12
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
13
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
14
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
15
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
16
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
17
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
20
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा

सलग दुसऱ्या दिवशी पावसाच्या हलक्या सरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:18 IST

कोल्हापूर : गुरुवारपासून किरकोळ स्वरूपात पुनरागमन करत भूरभूर शुक्रवारीही कायम राहिली. दिवसभर अधूनमधून हलक्या सरी कोसळत राहिल्या. यामुळे मागील ...

कोल्हापूर : गुरुवारपासून किरकोळ स्वरूपात पुनरागमन करत भूरभूर शुक्रवारीही कायम राहिली. दिवसभर अधूनमधून हलक्या सरी कोसळत राहिल्या. यामुळे मागील आठवड्यात पाऊस थांबल्यानंतर झालेल्या पेरण्यांच्या उगवणीची चिंता मिटली आहे. पण ज्यांची शिवारे अजून गारठली आहेत, त्यांची मात्र मशागतीच्या कामांमध्ये पंचाईत केली आहे.

जिल्ह्यात हा आठवडाभर पूर्णपणे कोरडा राहिल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता, पण बुधवारपासूनच काहीशा हलक्या सरींनी पावसाने आगमन केले होते. तसे दोन दिवस कधी ऊन तर कधी ढगाळ वातावरण आणि अधूनमधून येणारी हलकीशी सर असे वातावरण राहिले आहे. शुक्रवारी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत अवघा ४ मिलीमीटर पाऊस झाला आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही अगदीच तुरळक पाऊस पडत आहे. त्यामुळे रुई आणि इचलकरंजी हे दोनच बंधारे अद्याप पाण्याखाली आहेत. उर्वरीत सगळे खुले झाल्याने यावरून होणारी वाहतूकही सुरळीत झाली आहे.

दरम्यान हा पाऊस नव्याने उगवण होणाऱ्या व झालेल्या पिकांना मोठा दिलासा देणारा ठरला आहे. आगुप पेरणी झालेल्या भात, सोयाबीन व भुईमूग यांनाही खतांचा डोस देण्यास सुरुवात झाली आहे. पावसाने उघडीप घेतल्याने आडसाली उसाच्या लागणीलाही जोर आला आहे. साधारपणे १५ जुलैपर्यंत पाऊस जोर धरणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज गृहीत धरून आडसाली लागणीची घाई केली जात आहे, पण रोपाऐवजी कांडी लागवडीलाच जास्त प्राधान्य दिले जात असल्याचे दिसत आहे. याशिवाय ज्यांनी अजूनही उसासाठीचा शेवटचा मिरगी डोस दिलेला नाही, अथवा दिला आहे, पण मागील आठवड्यातील पावसाने वाहून गेला आहे, ते खतांची मात्रा देण्यात व्यस्त असल्याचे चित्र शिवारात दिसत आहे.