शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

सलग दुसऱ्या दिवशी पावसाच्या हलक्या सरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:18 IST

कोल्हापूर : गुरुवारपासून किरकोळ स्वरूपात पुनरागमन करत भूरभूर शुक्रवारीही कायम राहिली. दिवसभर अधूनमधून हलक्या सरी कोसळत राहिल्या. यामुळे मागील ...

कोल्हापूर : गुरुवारपासून किरकोळ स्वरूपात पुनरागमन करत भूरभूर शुक्रवारीही कायम राहिली. दिवसभर अधूनमधून हलक्या सरी कोसळत राहिल्या. यामुळे मागील आठवड्यात पाऊस थांबल्यानंतर झालेल्या पेरण्यांच्या उगवणीची चिंता मिटली आहे. पण ज्यांची शिवारे अजून गारठली आहेत, त्यांची मात्र मशागतीच्या कामांमध्ये पंचाईत केली आहे.

जिल्ह्यात हा आठवडाभर पूर्णपणे कोरडा राहिल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता, पण बुधवारपासूनच काहीशा हलक्या सरींनी पावसाने आगमन केले होते. तसे दोन दिवस कधी ऊन तर कधी ढगाळ वातावरण आणि अधूनमधून येणारी हलकीशी सर असे वातावरण राहिले आहे. शुक्रवारी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत अवघा ४ मिलीमीटर पाऊस झाला आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही अगदीच तुरळक पाऊस पडत आहे. त्यामुळे रुई आणि इचलकरंजी हे दोनच बंधारे अद्याप पाण्याखाली आहेत. उर्वरीत सगळे खुले झाल्याने यावरून होणारी वाहतूकही सुरळीत झाली आहे.

दरम्यान हा पाऊस नव्याने उगवण होणाऱ्या व झालेल्या पिकांना मोठा दिलासा देणारा ठरला आहे. आगुप पेरणी झालेल्या भात, सोयाबीन व भुईमूग यांनाही खतांचा डोस देण्यास सुरुवात झाली आहे. पावसाने उघडीप घेतल्याने आडसाली उसाच्या लागणीलाही जोर आला आहे. साधारपणे १५ जुलैपर्यंत पाऊस जोर धरणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज गृहीत धरून आडसाली लागणीची घाई केली जात आहे, पण रोपाऐवजी कांडी लागवडीलाच जास्त प्राधान्य दिले जात असल्याचे दिसत आहे. याशिवाय ज्यांनी अजूनही उसासाठीचा शेवटचा मिरगी डोस दिलेला नाही, अथवा दिला आहे, पण मागील आठवड्यातील पावसाने वाहून गेला आहे, ते खतांची मात्रा देण्यात व्यस्त असल्याचे चित्र शिवारात दिसत आहे.