शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : 'ऑपरेशन सिंदूर' आणि हनुमान यांचा काय संबंध? राजनाथ सिंह यांनी सांगितला श्लोकाचा खरा अर्थ
2
'ऑपरेशन सिंदूर'च्या रात्री १०.३० वाजता अखेरचं बोलणं, पहाटे ३ वाजता पुन्हा कॉल, पण...
3
प्रचंड गुप्तता, २ दिवसांपूर्वी अधिकारी क्वारंटाईन; 'ऑपरेशन सिंदूर'ची 'अशी' केली तयारी
4
“संधी मिळाली तर पाकचा खात्मा करून टाकेन”; कर्नल सोफिया कुरेशींच्या वडिलांची प्रतिक्रिया
5
पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांनी अजित डोवाल यांना फोन केला? तुर्की मीडियाचा दावा
6
“पाकिस्तानला कमी लेखता कामा नये, २४ तासांत कारवाई करायला हवी होती”: संजय राऊत
7
सेटवर पोलीस आले अन् अभिनेत्याला घेऊन गेले; गर्लफ्रेंडने केले गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
8
पाकिस्तानी कुरापती! गुजरात बॉर्डरवर आढळले संशयास्पद ड्रोन; विजेच्या तारांना धडकताच स्फोट
9
अंगावरचे कपडे फाडले, बेदम मारहाण; 'यु ट्युबर'वर रेल्वेतील पॅन्ट्री कर्मचाऱ्यांचा हल्ला, कारण...
10
PNB Share Price: १०० रुपयांपेक्षा स्वस्त मिळतोय 'हा' बँकिंग स्टॉक, मोठ्या डिस्काऊंटवर खरेदी करण्याची संधी; बँकेचा नफाही वाढला 
11
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पुढे काय? आजच्या सर्वपक्षीय बैठकीत ठरणार मोठी रणनीती!
12
"माझ्या बाबांनी आधीच भविष्यवाणी केली होती"; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर मराठी अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत
13
टेलिकॉम क्षेत्रात पुन्हा जिओची बाजी! 'या' बाबतीत ठरले अव्वल; व्हीआय-BSNL जवळपासही नाही
14
बिळातून बाहेर पडले, पाकिस्तानी सैन्य अधिकारी उघडपणे दहशतवाद्यांसोबत दिसले; हा घ्या पुरावा
15
Lahore Blast: पाकिस्तानमध्ये अचानक सायरन वाजला! विमानतळाजवळ तीन मोठे स्फोट, लाहोरमध्ये घबराट
16
Astro Tips: रोज घराबाहेर पडताना लावलेली 'ही' छोटीशी सवय देईल दीर्घकाळ सकारात्मक परिणाम!
17
ATM मध्ये व्यवहारापूर्वी दोनदा 'Cancel' बटण दाबलं तर पिन चोरी थांबवू शकता का? पाहा दाव्यामागील सत्य
18
बँकांमध्ये तुमचे पैसे किती सुरक्षित? जर बँक बुडाली तर तुम्हाला पैसे परत मिळतात का?
19
कुख्यात आतंकवादी हाफिज सईदचं तळच उडवलं! मिसाईल स्ट्राईकने मुरिदकेत हाहाकार; पाहा व्हिडीओ
20
द्वेषाचं बीज उखडून फेकणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांचा पगार किती? कुठून घेतलं शिक्षण? काय मिळतात सुविधा?

जनसेवेसाठी आयुष्य वेचले

By admin | Updated: August 12, 2014 00:40 IST

राजू शेट्टी : आंबेडकरांच्या तत्त्वानुसार संघटित होऊन संघर्ष केला

पेठवडगाव : प्रवाहाच्या विरोधात जाऊन सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी नानासाहेब माने यांनी आयुष्य वेचले. समाजातील गोरगरीब मुलांना उच्च शिक्षणाची सोय करून शिक्षणांची संधी दिली. त्यांच्या कार्यात अडचणी आल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना पाठीशी राहील, असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयामध्ये माजी आमदार नानासाहेब माने यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त सपत्निक सत्कार खा. शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी माजी आमदार संपतराव पवार-पाटील होते. यावेळी माजी आमदार नरसिंह गुरुनाथ पाटील, नगराध्यक्षा विद्या पोळ, माजी नगराध्यक्ष विजयसिंह यादव प्रमुख उपस्थित होते.खासदार शेट्टी म्हणाले, स्वातंत्र्यानंतर राजकारणात ठरावीक सत्ताकेंद्रे निर्माण झाली. या सत्ताधाऱ्यांनी सामान्याला विकासापासून वंचित ठेवले आणि स्वत:चा स्वार्थ साधला. तर आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्त्वानुसार संघटित होऊन संघर्ष केला. पारंपरिक व ठरावीक सत्ताकेंद्रे शेतकऱ्यांच्या बांधावर नेली. त्यामुळे सामान्य जनतेला न्याय देण्यासाठी प्रयत्न केला. यात यशस्वी ठरलो. जिल्ह्यात सुरू केलेली चळवळ देशात नेण्यासाठी युवकांनी व नागरिकांनी साथ दिली.सत्काराला उत्तर देताना नानासाहबे माने म्हणाले, समाजात समता प्रस्थापित करावी यासाठी सामान्य जनतेच्या सेवेसाठी प्रशासकीय सेवेचा राजीनामा दिला. राजकारणात प्रवेश करून थेट आमदारकीही मिळाली. या काळात विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. नंतर कॉँग्रेस पक्षात पंधरा वर्षे काम केले. मात्र, संधी मिळाली नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश करत असल्याचे जाहीर केले. प्राचार्य जे. डी. सिसाळ यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सुजाता माने, प्रविता सालपे, सुनीता पोळ, उर्मिला उंडाळे, प्रमिला माने, श्रीधर पाटील, अजय पाटील, डॉ. अशोक चौगुले, गुंडा कांबळे उपस्थित होते. (प्रतिनिधी)कट्टर विरोधक साडेपाच तास थांबले४माजी आमदार नानासाहेब माने व माजी नगराध्यक्ष विजयसिंह यादव यांच्यात अनेक तात्त्विक वाद आहेत. यादव यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसास माने यांना आग्रहाचे निमंत्रण देण्यात आले होते. तसेच व्यासपीठावर त्यांच्या नावाची खुर्ची सुद्धा आरक्षित ठेवली होती. तर आज माने यांनी यादव पिता-पुत्रींना आग्रहाचे निमंत्रण दिले होते. ते दोघेजण कार्यक्रमासाठी साडेपाच तास आवर्जून थांबलेशेट्टी अखेर उशिरानेच आले४खासदार राजू शेट्टी हे वेळेच्या बाबतीत काटेकोर नाहीत. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे विद्यार्थी सकाळी सातपासून तयारी करीत होते. दहाचा कार्यक्रम दीड वाजण्याच्या सुमारास झाला. या कार्यक्रमासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्तेही सकाळपासून थांबले होते. त्यामुळे खासदार शेट्टी वेळेवर येत नाहीत. हा अनुभव कार्यकर्त्यांना आला. त्यामुळे ते उशिरा येतात, अशी चौकट लावा म्हणजे वेळेवर येतील, असा कार्यकर्त्यांचा चर्चेचा सूर होता.