शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

जीवनदायी सत्त्वे

By admin | Updated: October 29, 2015 00:15 IST

सिटी टॉक

‘डॉक्टरांनी बाकीच्या औषधांबरोबर आम्हाला व्हिटॅमिनच्या गोळ्या पण लिहून दिल्या आहेत. त्या घेतल्या नाहीत तर चालतील का?’ अशा प्रकारची चौकशी करण्यासाठी मला महिन्यातून चार ते पाच तरी फोन येतात. या गोळ्या घेण्याची अजिबात इच्छा नसणारेही लोक असतात. तसेच आयुष्यभरासाठी व्हिटॅमिनच्या गोळ्या मागणारेही लोक असतात. आज आपण याच विषयावर विचार करू. व्हिटॅमिन म्हणजेच जीवनसत्त्वे. जीवनसत्त्वांचे ढोबळमानाने दोन प्रकार असतात. पहिल्या प्रकारातील जीनवसत्त्वे ही पाण्यात विरघळणारी असतात व सुलभतेने शरीरात शोषली जातात. उदाहरणार्थ ‘ब’ आणि ‘क‘ जीवनसत्त्वे तर दुसऱ्या प्रकारच्या जीवनसत्त्वांचे शोषण होण्यासाठी स्निग्ध पदार्थांची आवश्यकता असते. या प्रकारामध्ये अ,ड,ई,के या जीवनसत्त्वांचा समावेश होतो. प्रत्येक जीवनसत्त्वांचे शरीरातील कार्य वेगवेगळे असते. जरी या अन्नघटकांपासून ऊर्जा मिळत नसली, तरी येणाऱ्या ऊर्जेचे योग्य नियोजन करण्याचे काम जीवनसत्त्वे करीत असतात. टप्प्याटप्प्याने प्रत्येक जीनवसत्त्वाबाबत विचार करू.यापैकी ‘ब’ जीवनसत्त्व हा एक समूह आहे. ज्यामध्ये आठ निरनिराळ्या घटकांचा समावेश होतो. थायमिन, रायबोफ्लेविन, नायसिन, पँटोथेनिक अ‍ॅसिड, पायरिडॉक्सिन, बायोटीन, फोलिक अ‍ॅसिड व कोबालामाईन अशी आठ घटकांची नावे आहेत. यातील काही घटक चयापचन क्रियांमध्ये भाग घेतात. काही पचनक्रियेमध्ये मदत करतात. मेंदूपासून निघणाऱ्या नसांची कार्यक्षमता सुधारणे, नैराश्यापासून संरक्षण देणे, कर्बोदांचे शोषण करणे, अशा अनेक कामांसाठी ‘ब’ जीनवसत्त्व समूहाची गरज असते. ताजी फळे, हिरव्या पालेभाज्या, धान्ये, सुका मेवा या अन्नपदार्थांमध्ये मुबलक प्रमाणात ‘ब’ जीवनसत्त्व आढळून येते. अनेकदा लोक म्हणतात की, आम्ही भरपूर भाज्या खातो. तरीही ‘ब‘ जीवनसत्त्वाची रक्तात कमतरता आहे. याचे कारण या समूहातील शेवटचा घटक हा कोबालामाईन (बी-१२) हा प्रामुख्याने मांसाहारात आढळून येतो. त्यामुळे शाकाहारी लोकांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. दही आणि चीज या पदार्थांमध्ये कोबालामाईन असते. कारण दूध आंबविणे या प्रक्रियेत कोबालामाईन निर्मिती होते. आहारामध्ये ‘ब’ जीवनसत्त्वाची कमतरता असल्यास डोळ्यांचा दाह होणे, जीभेचे अल्सर होणे, ओठांच्या त्वचेला तडे पडणे, भूक कमी होणे, स्नायू अशक्त होणे, झोपेच्या तक्रारी, पायामधून मुंग्या येणे, अशी लक्षणे दिसतात. ही कमतरता वेळीच भरून न काढल्यास रक्तक्षय, सांध्यांचा कठीणपणा, कायमस्वरूपी नसा खराब होणे, अशा तक्रारी होऊ शकतात. पाण्यात विरघळणारे दुसरे जीवनसत्त्व म्हणजे ‘क’ जीवनसत्त्व. आपल्या हाडाच्या पेशी बनविणे, कोलॅजेनची निर्मिती करणे, हार्मोन्स तयार करणे, फुप्फुसांचे कार्य सुधारणे या कामांसाठी ‘क’ जीवनसत्त्वाची गरज असते. ही गरज आहारातून पूर्ण न झाल्यास हिरड्यांमधून रक्त येणे, थकवा वाटणे, जखमा लवकर न भरण, हाडांमध्ये ताकद नसणे, अशी लक्षणे दिसू शकतात. संत्री, मोसंबी, पेरू, आवळा, सफरचंद, लिंबू अशा फळांमध्ये ‘क’ जीवनसत्त्व असते. मात्र, भाज्या अतिप्रमाणात शिजविणे, फळे कापून उघडी ठेवणे यामुळे त्यातील ‘क’ जीवनसत्त्वांचा नाश होतो.‘ब’ आणि ‘क’ ही दोन्ही जीवनसत्त्वे शरीरात साठविली जात नाहीत. त्यामुळे रोजच्या रोज आहारात त्यांचा समावेश करणे श्रेयस्कर. शिल्पा जाधव- लेखिका प्रसिद्ध आहारतज्ज्ञ आहेत.