शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
3
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
4
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
5
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
6
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
7
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
8
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
9
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
10
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
11
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
12
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
13
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
14
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
15
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
16
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
17
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
20
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   

जीवनदायी सत्त्वे

By admin | Updated: October 29, 2015 00:15 IST

सिटी टॉक

‘डॉक्टरांनी बाकीच्या औषधांबरोबर आम्हाला व्हिटॅमिनच्या गोळ्या पण लिहून दिल्या आहेत. त्या घेतल्या नाहीत तर चालतील का?’ अशा प्रकारची चौकशी करण्यासाठी मला महिन्यातून चार ते पाच तरी फोन येतात. या गोळ्या घेण्याची अजिबात इच्छा नसणारेही लोक असतात. तसेच आयुष्यभरासाठी व्हिटॅमिनच्या गोळ्या मागणारेही लोक असतात. आज आपण याच विषयावर विचार करू. व्हिटॅमिन म्हणजेच जीवनसत्त्वे. जीवनसत्त्वांचे ढोबळमानाने दोन प्रकार असतात. पहिल्या प्रकारातील जीनवसत्त्वे ही पाण्यात विरघळणारी असतात व सुलभतेने शरीरात शोषली जातात. उदाहरणार्थ ‘ब’ आणि ‘क‘ जीवनसत्त्वे तर दुसऱ्या प्रकारच्या जीवनसत्त्वांचे शोषण होण्यासाठी स्निग्ध पदार्थांची आवश्यकता असते. या प्रकारामध्ये अ,ड,ई,के या जीवनसत्त्वांचा समावेश होतो. प्रत्येक जीवनसत्त्वांचे शरीरातील कार्य वेगवेगळे असते. जरी या अन्नघटकांपासून ऊर्जा मिळत नसली, तरी येणाऱ्या ऊर्जेचे योग्य नियोजन करण्याचे काम जीवनसत्त्वे करीत असतात. टप्प्याटप्प्याने प्रत्येक जीनवसत्त्वाबाबत विचार करू.यापैकी ‘ब’ जीवनसत्त्व हा एक समूह आहे. ज्यामध्ये आठ निरनिराळ्या घटकांचा समावेश होतो. थायमिन, रायबोफ्लेविन, नायसिन, पँटोथेनिक अ‍ॅसिड, पायरिडॉक्सिन, बायोटीन, फोलिक अ‍ॅसिड व कोबालामाईन अशी आठ घटकांची नावे आहेत. यातील काही घटक चयापचन क्रियांमध्ये भाग घेतात. काही पचनक्रियेमध्ये मदत करतात. मेंदूपासून निघणाऱ्या नसांची कार्यक्षमता सुधारणे, नैराश्यापासून संरक्षण देणे, कर्बोदांचे शोषण करणे, अशा अनेक कामांसाठी ‘ब’ जीनवसत्त्व समूहाची गरज असते. ताजी फळे, हिरव्या पालेभाज्या, धान्ये, सुका मेवा या अन्नपदार्थांमध्ये मुबलक प्रमाणात ‘ब’ जीवनसत्त्व आढळून येते. अनेकदा लोक म्हणतात की, आम्ही भरपूर भाज्या खातो. तरीही ‘ब‘ जीवनसत्त्वाची रक्तात कमतरता आहे. याचे कारण या समूहातील शेवटचा घटक हा कोबालामाईन (बी-१२) हा प्रामुख्याने मांसाहारात आढळून येतो. त्यामुळे शाकाहारी लोकांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. दही आणि चीज या पदार्थांमध्ये कोबालामाईन असते. कारण दूध आंबविणे या प्रक्रियेत कोबालामाईन निर्मिती होते. आहारामध्ये ‘ब’ जीवनसत्त्वाची कमतरता असल्यास डोळ्यांचा दाह होणे, जीभेचे अल्सर होणे, ओठांच्या त्वचेला तडे पडणे, भूक कमी होणे, स्नायू अशक्त होणे, झोपेच्या तक्रारी, पायामधून मुंग्या येणे, अशी लक्षणे दिसतात. ही कमतरता वेळीच भरून न काढल्यास रक्तक्षय, सांध्यांचा कठीणपणा, कायमस्वरूपी नसा खराब होणे, अशा तक्रारी होऊ शकतात. पाण्यात विरघळणारे दुसरे जीवनसत्त्व म्हणजे ‘क’ जीवनसत्त्व. आपल्या हाडाच्या पेशी बनविणे, कोलॅजेनची निर्मिती करणे, हार्मोन्स तयार करणे, फुप्फुसांचे कार्य सुधारणे या कामांसाठी ‘क’ जीवनसत्त्वाची गरज असते. ही गरज आहारातून पूर्ण न झाल्यास हिरड्यांमधून रक्त येणे, थकवा वाटणे, जखमा लवकर न भरण, हाडांमध्ये ताकद नसणे, अशी लक्षणे दिसू शकतात. संत्री, मोसंबी, पेरू, आवळा, सफरचंद, लिंबू अशा फळांमध्ये ‘क’ जीवनसत्त्व असते. मात्र, भाज्या अतिप्रमाणात शिजविणे, फळे कापून उघडी ठेवणे यामुळे त्यातील ‘क’ जीवनसत्त्वांचा नाश होतो.‘ब’ आणि ‘क’ ही दोन्ही जीवनसत्त्वे शरीरात साठविली जात नाहीत. त्यामुळे रोजच्या रोज आहारात त्यांचा समावेश करणे श्रेयस्कर. शिल्पा जाधव- लेखिका प्रसिद्ध आहारतज्ज्ञ आहेत.