शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जीवनदायी सत्त्वे

By admin | Updated: October 29, 2015 00:15 IST

सिटी टॉक

‘डॉक्टरांनी बाकीच्या औषधांबरोबर आम्हाला व्हिटॅमिनच्या गोळ्या पण लिहून दिल्या आहेत. त्या घेतल्या नाहीत तर चालतील का?’ अशा प्रकारची चौकशी करण्यासाठी मला महिन्यातून चार ते पाच तरी फोन येतात. या गोळ्या घेण्याची अजिबात इच्छा नसणारेही लोक असतात. तसेच आयुष्यभरासाठी व्हिटॅमिनच्या गोळ्या मागणारेही लोक असतात. आज आपण याच विषयावर विचार करू. व्हिटॅमिन म्हणजेच जीवनसत्त्वे. जीवनसत्त्वांचे ढोबळमानाने दोन प्रकार असतात. पहिल्या प्रकारातील जीनवसत्त्वे ही पाण्यात विरघळणारी असतात व सुलभतेने शरीरात शोषली जातात. उदाहरणार्थ ‘ब’ आणि ‘क‘ जीवनसत्त्वे तर दुसऱ्या प्रकारच्या जीवनसत्त्वांचे शोषण होण्यासाठी स्निग्ध पदार्थांची आवश्यकता असते. या प्रकारामध्ये अ,ड,ई,के या जीवनसत्त्वांचा समावेश होतो. प्रत्येक जीवनसत्त्वांचे शरीरातील कार्य वेगवेगळे असते. जरी या अन्नघटकांपासून ऊर्जा मिळत नसली, तरी येणाऱ्या ऊर्जेचे योग्य नियोजन करण्याचे काम जीवनसत्त्वे करीत असतात. टप्प्याटप्प्याने प्रत्येक जीनवसत्त्वाबाबत विचार करू.यापैकी ‘ब’ जीवनसत्त्व हा एक समूह आहे. ज्यामध्ये आठ निरनिराळ्या घटकांचा समावेश होतो. थायमिन, रायबोफ्लेविन, नायसिन, पँटोथेनिक अ‍ॅसिड, पायरिडॉक्सिन, बायोटीन, फोलिक अ‍ॅसिड व कोबालामाईन अशी आठ घटकांची नावे आहेत. यातील काही घटक चयापचन क्रियांमध्ये भाग घेतात. काही पचनक्रियेमध्ये मदत करतात. मेंदूपासून निघणाऱ्या नसांची कार्यक्षमता सुधारणे, नैराश्यापासून संरक्षण देणे, कर्बोदांचे शोषण करणे, अशा अनेक कामांसाठी ‘ब’ जीनवसत्त्व समूहाची गरज असते. ताजी फळे, हिरव्या पालेभाज्या, धान्ये, सुका मेवा या अन्नपदार्थांमध्ये मुबलक प्रमाणात ‘ब’ जीवनसत्त्व आढळून येते. अनेकदा लोक म्हणतात की, आम्ही भरपूर भाज्या खातो. तरीही ‘ब‘ जीवनसत्त्वाची रक्तात कमतरता आहे. याचे कारण या समूहातील शेवटचा घटक हा कोबालामाईन (बी-१२) हा प्रामुख्याने मांसाहारात आढळून येतो. त्यामुळे शाकाहारी लोकांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. दही आणि चीज या पदार्थांमध्ये कोबालामाईन असते. कारण दूध आंबविणे या प्रक्रियेत कोबालामाईन निर्मिती होते. आहारामध्ये ‘ब’ जीवनसत्त्वाची कमतरता असल्यास डोळ्यांचा दाह होणे, जीभेचे अल्सर होणे, ओठांच्या त्वचेला तडे पडणे, भूक कमी होणे, स्नायू अशक्त होणे, झोपेच्या तक्रारी, पायामधून मुंग्या येणे, अशी लक्षणे दिसतात. ही कमतरता वेळीच भरून न काढल्यास रक्तक्षय, सांध्यांचा कठीणपणा, कायमस्वरूपी नसा खराब होणे, अशा तक्रारी होऊ शकतात. पाण्यात विरघळणारे दुसरे जीवनसत्त्व म्हणजे ‘क’ जीवनसत्त्व. आपल्या हाडाच्या पेशी बनविणे, कोलॅजेनची निर्मिती करणे, हार्मोन्स तयार करणे, फुप्फुसांचे कार्य सुधारणे या कामांसाठी ‘क’ जीवनसत्त्वाची गरज असते. ही गरज आहारातून पूर्ण न झाल्यास हिरड्यांमधून रक्त येणे, थकवा वाटणे, जखमा लवकर न भरण, हाडांमध्ये ताकद नसणे, अशी लक्षणे दिसू शकतात. संत्री, मोसंबी, पेरू, आवळा, सफरचंद, लिंबू अशा फळांमध्ये ‘क’ जीवनसत्त्व असते. मात्र, भाज्या अतिप्रमाणात शिजविणे, फळे कापून उघडी ठेवणे यामुळे त्यातील ‘क’ जीवनसत्त्वांचा नाश होतो.‘ब’ आणि ‘क’ ही दोन्ही जीवनसत्त्वे शरीरात साठविली जात नाहीत. त्यामुळे रोजच्या रोज आहारात त्यांचा समावेश करणे श्रेयस्कर. शिल्पा जाधव- लेखिका प्रसिद्ध आहारतज्ज्ञ आहेत.