शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

जीवनदायी सत्त्वे

By admin | Updated: October 29, 2015 00:15 IST

सिटी टॉक

‘डॉक्टरांनी बाकीच्या औषधांबरोबर आम्हाला व्हिटॅमिनच्या गोळ्या पण लिहून दिल्या आहेत. त्या घेतल्या नाहीत तर चालतील का?’ अशा प्रकारची चौकशी करण्यासाठी मला महिन्यातून चार ते पाच तरी फोन येतात. या गोळ्या घेण्याची अजिबात इच्छा नसणारेही लोक असतात. तसेच आयुष्यभरासाठी व्हिटॅमिनच्या गोळ्या मागणारेही लोक असतात. आज आपण याच विषयावर विचार करू. व्हिटॅमिन म्हणजेच जीवनसत्त्वे. जीवनसत्त्वांचे ढोबळमानाने दोन प्रकार असतात. पहिल्या प्रकारातील जीनवसत्त्वे ही पाण्यात विरघळणारी असतात व सुलभतेने शरीरात शोषली जातात. उदाहरणार्थ ‘ब’ आणि ‘क‘ जीवनसत्त्वे तर दुसऱ्या प्रकारच्या जीवनसत्त्वांचे शोषण होण्यासाठी स्निग्ध पदार्थांची आवश्यकता असते. या प्रकारामध्ये अ,ड,ई,के या जीवनसत्त्वांचा समावेश होतो. प्रत्येक जीवनसत्त्वांचे शरीरातील कार्य वेगवेगळे असते. जरी या अन्नघटकांपासून ऊर्जा मिळत नसली, तरी येणाऱ्या ऊर्जेचे योग्य नियोजन करण्याचे काम जीवनसत्त्वे करीत असतात. टप्प्याटप्प्याने प्रत्येक जीनवसत्त्वाबाबत विचार करू.यापैकी ‘ब’ जीवनसत्त्व हा एक समूह आहे. ज्यामध्ये आठ निरनिराळ्या घटकांचा समावेश होतो. थायमिन, रायबोफ्लेविन, नायसिन, पँटोथेनिक अ‍ॅसिड, पायरिडॉक्सिन, बायोटीन, फोलिक अ‍ॅसिड व कोबालामाईन अशी आठ घटकांची नावे आहेत. यातील काही घटक चयापचन क्रियांमध्ये भाग घेतात. काही पचनक्रियेमध्ये मदत करतात. मेंदूपासून निघणाऱ्या नसांची कार्यक्षमता सुधारणे, नैराश्यापासून संरक्षण देणे, कर्बोदांचे शोषण करणे, अशा अनेक कामांसाठी ‘ब’ जीनवसत्त्व समूहाची गरज असते. ताजी फळे, हिरव्या पालेभाज्या, धान्ये, सुका मेवा या अन्नपदार्थांमध्ये मुबलक प्रमाणात ‘ब’ जीवनसत्त्व आढळून येते. अनेकदा लोक म्हणतात की, आम्ही भरपूर भाज्या खातो. तरीही ‘ब‘ जीवनसत्त्वाची रक्तात कमतरता आहे. याचे कारण या समूहातील शेवटचा घटक हा कोबालामाईन (बी-१२) हा प्रामुख्याने मांसाहारात आढळून येतो. त्यामुळे शाकाहारी लोकांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. दही आणि चीज या पदार्थांमध्ये कोबालामाईन असते. कारण दूध आंबविणे या प्रक्रियेत कोबालामाईन निर्मिती होते. आहारामध्ये ‘ब’ जीवनसत्त्वाची कमतरता असल्यास डोळ्यांचा दाह होणे, जीभेचे अल्सर होणे, ओठांच्या त्वचेला तडे पडणे, भूक कमी होणे, स्नायू अशक्त होणे, झोपेच्या तक्रारी, पायामधून मुंग्या येणे, अशी लक्षणे दिसतात. ही कमतरता वेळीच भरून न काढल्यास रक्तक्षय, सांध्यांचा कठीणपणा, कायमस्वरूपी नसा खराब होणे, अशा तक्रारी होऊ शकतात. पाण्यात विरघळणारे दुसरे जीवनसत्त्व म्हणजे ‘क’ जीवनसत्त्व. आपल्या हाडाच्या पेशी बनविणे, कोलॅजेनची निर्मिती करणे, हार्मोन्स तयार करणे, फुप्फुसांचे कार्य सुधारणे या कामांसाठी ‘क’ जीवनसत्त्वाची गरज असते. ही गरज आहारातून पूर्ण न झाल्यास हिरड्यांमधून रक्त येणे, थकवा वाटणे, जखमा लवकर न भरण, हाडांमध्ये ताकद नसणे, अशी लक्षणे दिसू शकतात. संत्री, मोसंबी, पेरू, आवळा, सफरचंद, लिंबू अशा फळांमध्ये ‘क’ जीवनसत्त्व असते. मात्र, भाज्या अतिप्रमाणात शिजविणे, फळे कापून उघडी ठेवणे यामुळे त्यातील ‘क’ जीवनसत्त्वांचा नाश होतो.‘ब’ आणि ‘क’ ही दोन्ही जीवनसत्त्वे शरीरात साठविली जात नाहीत. त्यामुळे रोजच्या रोज आहारात त्यांचा समावेश करणे श्रेयस्कर. शिल्पा जाधव- लेखिका प्रसिद्ध आहारतज्ज्ञ आहेत.