शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

करवीरमधील दोन कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:18 IST

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील म्हाळुंगे आणि दिंडनेर्ली येथील दोन कृषी सेवा केंद्रांचे परवाने मंगळवारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव ...

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील म्हाळुंगे आणि दिंडनेर्ली येथील दोन कृषी सेवा केंद्रांचे परवाने मंगळवारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी निलंबित केले. खत विक्रीतील अफरातफर सुनावणीत सिद्ध झाल्याने ही कारवाई करण्यात आली. परवाना निलंबनाची या खरीप हंगामातील ही पहिलीच घटना आहे.

जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर खते, बियाणांना प्रचंड मागणी वाढली आहे. नवीन पेरणीसह उसाच्या पावसाळी डोससाठीही खतांची मागणी वाढली आहे. पण टंचाई असल्याचे भासवत कृषी सेवा केंद्राकडून वाढीव दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी १४ भरारी पथके स्थापन करून रविवारपासून जिल्ह्यात धाडसत्र सुरू केले आहे. पहिल्याच दिवशी १८६ कृषी सेवा केंद्रांची तपासणी करत १८ सेवा केंद्रांना नोटिसा काढल्या होत्या. त्यानंतरही धाडसत्र सुरूच ठेवले असून, मंगळवारी दुपारपर्यंत ३२४ केंद्रांची झाडाझडती घेतली. यात हातकणंगले, गडहिंग्लज, चंदगड तालुक्यांतील केंद्रांचा समावेश आहे.

नोटीस काढलेल्या १८ जणांची सोमवारी व मंगळवारी अशी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी करवीर तालुक्यातील म्हाळुंगे येथील अंबाई व दिंडनेर्ली येथील स्वराली या दोन कृषी सेवा केंद्रांनी दिलेला खुलासा व प्रत्यक्ष पाहणीतील वस्तुस्थिती यात तफावत आढळली. विक्री केलेल्या खर्चाच्या पावत्या न देणे, साठा पुस्तकात खत विक्रीचा हिशेब ठेवणे, दरफलक व साठा फलक न भरणे इत्यादी कारणास्तव त्यांच्यावर परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली.

चौकट

बुधवारी आणखी तीन केंद्रांची सुनावणी

नोटिसा पाठवलेल्यांपैकी आणखी तीन कृषी सेवा केंद्रांची बुधवारी सुनावणी ठेवण्यात आली आहे.

चौकट

तपासणीचा धडाका सुरूच राहणार

जिल्ह्यात खत, बियाणे, औषधे विक्री करणारी १८०० कृषी सेवा केंद्रे आहेत. १४ पथकांकडून रोज किमान १५० तरी केेेंद्रांची तपासणी होईल, असे नियोजन कृषी विभागाकडून केले गेले आहे. आतापर्यंत ३२४ केंद्रांची तपासणी पूर्ण झाली असून, हा धडाका सुरूच राहणार असल्याने शेतकरी सुखावले आहेत, तर कृषी सेवा केंद्रचालक धास्तावले आहेत.

प्रतिक्रिया

कृषी सेवा केंद्राने घालून दिलेल्या नियमास अधीन राहूनच व्यवसाय करणे अपेक्षित असताना, शेतकऱ्यांची कोंडी केली जात असल्यानेच कारवाई कडक केली आहे. यात कुणाचीही गय केली जाणार नाही.

ज्ञानदेव वाकुरे,

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी