शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

करवीरमधील दोन कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:18 IST

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील म्हाळुंगे आणि दिंडनेर्ली येथील दोन कृषी सेवा केंद्रांचे परवाने मंगळवारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव ...

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील म्हाळुंगे आणि दिंडनेर्ली येथील दोन कृषी सेवा केंद्रांचे परवाने मंगळवारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी निलंबित केले. खत विक्रीतील अफरातफर सुनावणीत सिद्ध झाल्याने ही कारवाई करण्यात आली. परवाना निलंबनाची या खरीप हंगामातील ही पहिलीच घटना आहे.

जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर खते, बियाणांना प्रचंड मागणी वाढली आहे. नवीन पेरणीसह उसाच्या पावसाळी डोससाठीही खतांची मागणी वाढली आहे. पण टंचाई असल्याचे भासवत कृषी सेवा केंद्राकडून वाढीव दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी १४ भरारी पथके स्थापन करून रविवारपासून जिल्ह्यात धाडसत्र सुरू केले आहे. पहिल्याच दिवशी १८६ कृषी सेवा केंद्रांची तपासणी करत १८ सेवा केंद्रांना नोटिसा काढल्या होत्या. त्यानंतरही धाडसत्र सुरूच ठेवले असून, मंगळवारी दुपारपर्यंत ३२४ केंद्रांची झाडाझडती घेतली. यात हातकणंगले, गडहिंग्लज, चंदगड तालुक्यांतील केंद्रांचा समावेश आहे.

नोटीस काढलेल्या १८ जणांची सोमवारी व मंगळवारी अशी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी करवीर तालुक्यातील म्हाळुंगे येथील अंबाई व दिंडनेर्ली येथील स्वराली या दोन कृषी सेवा केंद्रांनी दिलेला खुलासा व प्रत्यक्ष पाहणीतील वस्तुस्थिती यात तफावत आढळली. विक्री केलेल्या खर्चाच्या पावत्या न देणे, साठा पुस्तकात खत विक्रीचा हिशेब ठेवणे, दरफलक व साठा फलक न भरणे इत्यादी कारणास्तव त्यांच्यावर परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली.

चौकट

बुधवारी आणखी तीन केंद्रांची सुनावणी

नोटिसा पाठवलेल्यांपैकी आणखी तीन कृषी सेवा केंद्रांची बुधवारी सुनावणी ठेवण्यात आली आहे.

चौकट

तपासणीचा धडाका सुरूच राहणार

जिल्ह्यात खत, बियाणे, औषधे विक्री करणारी १८०० कृषी सेवा केंद्रे आहेत. १४ पथकांकडून रोज किमान १५० तरी केेेंद्रांची तपासणी होईल, असे नियोजन कृषी विभागाकडून केले गेले आहे. आतापर्यंत ३२४ केंद्रांची तपासणी पूर्ण झाली असून, हा धडाका सुरूच राहणार असल्याने शेतकरी सुखावले आहेत, तर कृषी सेवा केंद्रचालक धास्तावले आहेत.

प्रतिक्रिया

कृषी सेवा केंद्राने घालून दिलेल्या नियमास अधीन राहूनच व्यवसाय करणे अपेक्षित असताना, शेतकऱ्यांची कोंडी केली जात असल्यानेच कारवाई कडक केली आहे. यात कुणाचीही गय केली जाणार नाही.

ज्ञानदेव वाकुरे,

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी