शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

करवीरमधील दोन कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:18 IST

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील म्हाळुंगे आणि दिंडनेर्ली येथील दोन कृषी सेवा केंद्रांचे परवाने मंगळवारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव ...

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील म्हाळुंगे आणि दिंडनेर्ली येथील दोन कृषी सेवा केंद्रांचे परवाने मंगळवारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी निलंबित केले. खत विक्रीतील अफरातफर सुनावणीत सिद्ध झाल्याने ही कारवाई करण्यात आली. परवाना निलंबनाची या खरीप हंगामातील ही पहिलीच घटना आहे.

जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर खते, बियाणांना प्रचंड मागणी वाढली आहे. नवीन पेरणीसह उसाच्या पावसाळी डोससाठीही खतांची मागणी वाढली आहे. पण टंचाई असल्याचे भासवत कृषी सेवा केंद्राकडून वाढीव दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी १४ भरारी पथके स्थापन करून रविवारपासून जिल्ह्यात धाडसत्र सुरू केले आहे. पहिल्याच दिवशी १८६ कृषी सेवा केंद्रांची तपासणी करत १८ सेवा केंद्रांना नोटिसा काढल्या होत्या. त्यानंतरही धाडसत्र सुरूच ठेवले असून, मंगळवारी दुपारपर्यंत ३२४ केंद्रांची झाडाझडती घेतली. यात हातकणंगले, गडहिंग्लज, चंदगड तालुक्यांतील केंद्रांचा समावेश आहे.

नोटीस काढलेल्या १८ जणांची सोमवारी व मंगळवारी अशी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी करवीर तालुक्यातील म्हाळुंगे येथील अंबाई व दिंडनेर्ली येथील स्वराली या दोन कृषी सेवा केंद्रांनी दिलेला खुलासा व प्रत्यक्ष पाहणीतील वस्तुस्थिती यात तफावत आढळली. विक्री केलेल्या खर्चाच्या पावत्या न देणे, साठा पुस्तकात खत विक्रीचा हिशेब ठेवणे, दरफलक व साठा फलक न भरणे इत्यादी कारणास्तव त्यांच्यावर परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली.

चौकट

बुधवारी आणखी तीन केंद्रांची सुनावणी

नोटिसा पाठवलेल्यांपैकी आणखी तीन कृषी सेवा केंद्रांची बुधवारी सुनावणी ठेवण्यात आली आहे.

चौकट

तपासणीचा धडाका सुरूच राहणार

जिल्ह्यात खत, बियाणे, औषधे विक्री करणारी १८०० कृषी सेवा केंद्रे आहेत. १४ पथकांकडून रोज किमान १५० तरी केेेंद्रांची तपासणी होईल, असे नियोजन कृषी विभागाकडून केले गेले आहे. आतापर्यंत ३२४ केंद्रांची तपासणी पूर्ण झाली असून, हा धडाका सुरूच राहणार असल्याने शेतकरी सुखावले आहेत, तर कृषी सेवा केंद्रचालक धास्तावले आहेत.

प्रतिक्रिया

कृषी सेवा केंद्राने घालून दिलेल्या नियमास अधीन राहूनच व्यवसाय करणे अपेक्षित असताना, शेतकऱ्यांची कोंडी केली जात असल्यानेच कारवाई कडक केली आहे. यात कुणाचीही गय केली जाणार नाही.

ज्ञानदेव वाकुरे,

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी