शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
5
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
6
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
7
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
8
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
9
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
10
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
11
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
12
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
13
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
14
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
15
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
17
रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकची गेल्या महिन्यात रेकॉर्ड ब्रेक विक्री; खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड!
18
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
19
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...

‘ग्रंथालयां’चे ‘वाचनालय’ व्हावे

By admin | Updated: July 6, 2015 00:53 IST

इंद्रजित देशमुख यांचे प्रतिपादन : ‘लोकमत’तर्फे सहा ग्रंथालयांना ग्रंथदान

कोल्हापूर : वाचनाने माणसाला शहाणपण येते, कारण तुमच्या जीवनाची चेतना टिकवून ठेवण्यासाठी माहिती, ज्ञान आणि स्वातंत्र्याची दृष्टी देणाऱ्या पुस्तकांनी जीवनाचे परिवर्तन होते, असं म्हणतात. ‘ज्याच्या घरात नाही पुस्तकाचं कपाट, त्याचं घर सपाट...’, म्हणूनच समृद्ध मराठीची वाचन चळवळ रुजवायची असेल, तर असंख्य पुस्तके असलेल्या ग्रंथालयांचे रूपांतर ‘वाचनालया’त व्हायला हवे, असे मत कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी व्यक्त केले.‘लोकमत’ने आयोजित केलेल्या शाहू स्मारक भवनच्या कॉन्फरन्स हॉलमधील ग्रंथभेट उपक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. व्यासपीठावर सरव्यवस्थापक मकरंद देशमुख आणि संपादक वसंत भोसले उपस्थित होते. यावेळी कोल्हापूर शहर, ग्रामीण भागासह सांगली येथील एकूण सहा ग्रंथालयांना प्रत्येकी तीनशे याप्रमाणे १८०० पुस्तक ांचे दान करण्यात आले. यावेळी इंद्रजित देशमुख यांनी वाचन संस्कृतीचे महत्त्व आपल्या ओघवत्या वाणीने सांगत, सुरेश भट यांची ‘बोलून पाषाणाची दुनिया’ आणि बा. भ. बोरकरांची ‘तेच डोळे देखणे जे...’ या कविता सादर करीत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यावेळी मकरंद देशमुख म्हणाले, आजच्या खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या लाटेत माहितीचा सागर आपल्यासमोर आहे. चमकोगिरी आणि ब्रँडेडच्या जगात आपण वावरतो; पण सत्ता, संपत्ती सौंदर्य यानंतर शाश्वत जगण्याची प्रेरणा दुसऱ्याचा आनंद शोधताना परिपूर्ण होते. शब्दांच्या सामर्थ्याने प्रत्येकाच्या आयुष्याचे परिवर्तन होते. ज्ञानेश्वर, तुकाराम, कुसुमाग्रजांसारख्या अनंत साहित्यिकांनी मराठी भाषेची परंपरा समृद्ध ठेवली आहे. हा वारसा असाच प्रवाहित ठेवायचा असेल, तर वाचन संस्कृतीशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. ते म्हणाले, ग्रंथदान केल्याने व्यक्तीच्या जीवनाचे परिवर्तन होते. माझा ई-बुकला विरोध नाही; पण वाचनाचा खरा आनंद पुस्तकाने मिळतो. प्रास्ताविकात संपादक वसंत भोसले म्हणाले, मराठी साहित्याला मिळालेला वारसा वाचन चळवळीच्या माध्यमातून जपला पाहिजे. या उद्देशाने ‘लोकमत’ने ग्रंथदान उपक्रम राबविला. यात आम्ही नागरिकांना तुम्ही वाचलेली किंवा वापरात नसलेली पुस्तके दान करा, असे आवाहन केले. त्याला उदंड प्रतिसाद मिळून एकाच दिवसात २५०० पुस्तके जमा झाली. ही पुस्तके अशाच व्यक्ती, संस्था, आणि ग्रंथालयांना देण्यात येत आहेत. ज्यांनी खरंच तळागाळातील माणसांना वाचनाच्या माध्यमातून शहाणे करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रिया दंडगे यांनी सूत्रसंचालन केले. या ग्रंथालयांना केले ‘ग्रंथदान’ कोल्हापुरातील दौलतनगर येथील स्वा. प्रा. चंद्रकांत पाटगावकर (ग्रंथ वाचक) संघ, हसूर दुमाला येथील सानेगुरुजी सार्वजनिक वाचनालय, कोल्हापुरातील पाडळकर मार्केट येथील श्री देवांग कोष्टी समाज बोर्डिंग, कबनूर (ता. हातकणंगले) येथील श्री संत रोहिदास वाचनालय, (सांगली) येथील ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालय व मिठारवाडी (ता.पन्हाळा) येथील ज्ञानभारती या ग्रंथालयांना ग्रंथदान करण्यात आले. झोपडपट्टीत ‘दैनिक’ही अत्यल्प प्रमाणात वाचले जाते. तिथे वाचक संख्या वाढावी, यासाठी आम्ही ग्रंथालय सुरू केले. कारण वाचन ही अशी गोष्ट आहे, की ती कितीही वेळा वाचले, तरी अतृप्ती राहते. ‘लोकमत’ने आमच्या उपक्रमाची दखल घेऊन ग्रंथदान केले, यामुळे आमच्या कामाला अधिक प्रोत्साहन मिळाले आहे. - सुनील यळगुडकर (स्वा. प्रा. चंद्रकांत पाटगावकर (ग्रंथ वाचक) संघ,आमच्या ग्रंथालयात तीन हजार पुस्तके आणि दीडशे सभासद आहेत. ‘लोकमत’ने दिलेल्या ग्रंथांमुळे आमच्या ग्रंथालयात आता दर्जेदार साहित्याची भर पडली आहे. या उपक्रमाबद्दल आम्ही ‘लोकमत’चे आभारी आहोत. - स्नेहल पाटील (ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालय, सांगली)