शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

‘ग्रंथालयां’चे रूपांतर ‘वाचनालया’त व्हावे

By admin | Updated: July 6, 2015 00:32 IST

इंद्रजित देशमुख : ‘लोकमत’तर्फे सहा ग्रंथालयांना ग्रंथदान

कोल्हापूर : वाचनाने माणसाला शहाणपण येते, कारण तुमच्या जीवनाची चेतना टिकवून ठेवण्यासाठी माहिती, ज्ञान आणि स्वातंत्र्याची दृष्टी देणाऱ्या पुस्तकांनी जीवनाचे परिवर्तन होते, असं म्हणतात. ‘ज्याच्या घरात नाही पुस्तकाचं कपाट, त्याचं घर सपाट...’, म्हणूनच समृद्ध मराठीची वाचन चळवळ रुजवायची असेल, तर असंख्य पुस्तके असलेल्या ग्रंथालयांचे रूपांतर ‘वाचनालया’त व्हायला हवे, असे मत कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी व्यक्त केले.‘लोकमत’ने आयोजित केलेल्या शाहू स्मारक भवनच्या कॉन्फरन्स हॉलमधील ग्रंथभेट उपक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. व्यासपीठावर सरव्यवस्थापक मकरंद देशमुख आणि संपादक वसंत भोसले उपस्थित होते. यावेळी कोल्हापूर शहर, ग्रामीण भागासह सांगली येथील एकूण सहा ग्रंथालयांना प्रत्येकी तीनशे या प्रमाणे १८०० पुस्तक ांचे दान करण्यात आले. यावेळी इंद्रजित देशमुख यांनी वाचन संस्कृतीचे महत्त्व आपल्या ओघवत्या वाणीने सांगत, सुरेश भट यांची ‘बोलून पाषाणाची दुनिया’ आणि बा. भ. बोरकरांची ‘तेच डोळे देखणे जे...’या कविता सादर करीत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यावेळी देशमुख म्हणाले, आजच्या खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या लाटेत माहितीचा सागर आपल्यासमोर आहे. चमकोगिरी आणि ब्रँडेडच्या जगात आपण वावरतो; पण सत्ता, संपत्ती सौंदर्य यानंतर शाश्वत जगण्याची प्रेरणा दुसऱ्याचा आनंद शोधताना परिपूर्ण होते. शब्दांच्या सामर्थ्याने आयुष्याचे परिवर्तन होते. ज्ञानेश्वर, तुकाराम, कुसुमाग्रजांसारख्या अनंत साहित्यिकांनी मराठी भाषेची परंपरा समृद्ध ठेवली आहे. हा वारसा असाच प्रवाहित ठेवायचा असेल, तर वाचन संस्कृतीला पर्याय नाही. ते म्हणाले, ग्रंथदान केल्याने व्यक्तीच्या जीवनाचे परिवर्तन होते. माझा ई-बुकला विरोध नाही; पण वाचनाचा खरा आनंद पुस्तकाने मिळतो. प्रास्ताविकात संपादक वसंत भोसले म्हणाले, मराठी साहित्याला मिळालेला वारसा वाचन चळवळीच्या माध्यमातून जपला पाहिजे. या उद्देशाने ‘लोकमत’ने ग्रंथदान उपक्रम राबवला. यात आम्ही नागरिकांना तुम्ही वाचलेली किंवा वापरात नसलेली पुस्तके दान करा, असे आवाहन केले. त्याला उदंड प्रतिसाद मिळाला. ही पुस्तके अशाच व्यक्ती, संस्था, आणि ग्रंथालयांना देण्यात येत आहेत. ज्यांनी खरंच तळागाळातील माणसांना वाचनाच्या माध्यमातून शहाणे करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रिया दंडगे यांनी सूत्रसंचालन केले.या ग्रंथालयांना केले ‘ग्रंथदान’ कोल्हापुरातील दौलतनगर येथील स्वा. प्रा. चंद्रकांत पाटगावकर (ग्रंथ वाचक) संघ, हसूर दुमाला येथील सानेगुरुजी सार्वजनिक वाचनालय, कोल्हापुरातील पाडळकर मार्केट येथील श्री देवांग कोष्टी समाज बोर्डिंग, कबनूर (ता. हातकणंगले) येथील श्री संत रोहिदास वाचनालय, (सांगली) येथील ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालय व मिठारवाडी (ता.पन्हाळा) येथील ज्ञानभारती या ग्रंथालयांना ग्रंथदान करण्यात आले. आमच्या ग्रंथालयात तीन हजार पुस्तके आणि दीडशे सभासद आहेत. ‘लोकमत’ने दिलेल्या ग्रंथांमुळे आमच्या ग्रंथालयात आता दर्जेदार साहित्याची भर पडली आहे. या उपक्रमाबद्दल आम्ही ‘लोकमत’चे आभारी आहोत. - स्नेहल पाटील,ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालय, सांगली