शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
4
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
5
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
6
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
7
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
8
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
9
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
10
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
11
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
12
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
13
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
14
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
15
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
16
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
17
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
18
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
19
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
20
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!

तंत्रज्ञानाच्या युगात ग्रंथालये महत्त्वाची

By admin | Updated: July 16, 2015 20:52 IST

देवानंद शिंदे : साहित्यिकांना इंदिरा संत साहित्य कृती पुरस्कार

इचलकरंजी : सध्याच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात ग्रंथालयांची भूमिका महत्त्वाची असून, साहित्यिकांच्या वाड्मयाने समृद्ध असलेली वाचनालये ही ज्ञानाची मंदिरे आहेत. माणसाच्या वेदना, दु:खे आणि घुसमट साहित्यातून प्रकट झाली तर परिस्थिती बदलण्यासाठी त्याचा निश्चितपणे उपयोग होईल, असे मत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी व्यक्त केले.येथील आपटे वाचन मंदिर व मराठी साहित्य संमेलन स्मृती ट्रस्टच्यावतीने आयोजित इंदिरा संत साहित्य कृती पुरस्कार सोहळ्यामध्ये डॉ. शिंदे बोलत होते. साहित्यिक डॉ. राजन गवस म्हणाले, साहित्याचा अंतिम हेतू लोककल्याणाचा आहे. मात्र, सध्याच्या साहित्याला राजकीय व सामाजिक वातावरण काही प्रमाणात अडसर ठरत आहे.राजवाड्याच्या दरबार हॉलमध्ये झालेल्या पुरस्कार सोहळ्यात श्रीधर नांदेडकर (उत्कृष्ट काव्यसंग्रह), भानू काळे (उत्कृष्ट गद्य साहित्यकृती), भारत सासणे (कथासंग्रह), कृष्णात खोत (कादंबरी), मिलिंद चंपानेरकर-पुष्पा भावे (अनुवाद), म. वि. कोल्हटकर (बाल साहित्यकृती), राजीव नाईक (नाट्यसाहित्य कृती), योगेश सोमण (एकांकिका), भूषण कोरगावकर (ललित गद्य), वीरा राठोड व नीलम माणगावे (लक्षणीय काव्यसंग्रह), डॉ. दाऊद दळवी व मृणालिनी चितळे (लक्षणीय गद्य साहित्यकृती), तसेच स्थानिक साहित्यिक म्हणून रामचंद्र ढेरे आणि उत्कृष्ट वाचक यासाठी सुभाष मुनगेकर यांना सन्मानित केले.यावेळी नवोदित लेखक प्रसाद ताम्हनकर यांच्या ‘जांभूळ पट्टी’ पुस्तकाचे राजन गवस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. काव्य व गद्य साहित्यकृती परीक्षण केल्याबद्दल किरण पाटील, बळवंत जेऊरकर व रणधीर शिंदे यांचाही सत्कार करण्यात आला. अ‍ॅड. स्वानंद कुलकर्णी व डॉ. विलास शहा यांनी प्रास्ताविक केले. यावेळी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, डॉ. महेश काकडे, अशोक सौंदत्तीकर, डॉ. सपना आवाडे, प्राचार्य डॉ. पी. आर. कडोले, प्रा. अशोक दास उपस्थित होते. (प्रतिनिधी)