शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

आठवणींचे गाठोडे बांधून पाहू : कविसंमेलनात स्त्रीच्या भावविश्वाला साद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:24 IST

कोल्हापूर : ‘आठवणींचे आपण एक गाठोडे बांधून पाहू, शिदोरी म्हणून हवं तर सोबत आपल्या वाहू, आई ऐकतेस ना मला ...

कोल्हापूर : ‘आठवणींचे आपण एक गाठोडे बांधून पाहू, शिदोरी म्हणून हवं तर सोबत आपल्या वाहू, आई ऐकतेस ना मला येऊ दे ना जगात, बघ मी ठेवेन तुला सुखात.’ या स्त्री भावविश्वाचे अंतरंग खुलवत झालेल्या कविसंमेलनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले.

मराठी राजभाषा दिनानिमित्त महावीर विद्यालयात महावीर विद्यालयाचा मराठी विभाग आणि मराठी कवी लेखक संघटना करवीर यांच्या विद्यमाने कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. प्रमुख पाहुण्या म्हणून सुजाता पेंडसे उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी श्रीराम पचिंद्रे होते. यावेळी स्त्रीभ्रूणाचे मनोगत मांडणाऱ्या अरुणा भोसले यांच्या भावस्पर्शी कवितेने रसिकांच्या काळजाला हात घातला. अपर्णा पाटील यांचे ‘आठवणींचे गाठोडे’, गौरी भोगले यांचे ‘तिचं बाईपण पोळी लाटत गेली... पोळ्या गोल होत गेल्या, त्या भाजताना, सृजन लिहिणारी बोटं करपून गेली’ या कवितांनी स्त्री मनाला साद घातली. सुजाता पेंडसे यांनी कविता फक्त रंगमंचावर टाळ्या घेणारी असू नये, तर कवितेला आशय आणि खोलीही असायला हवी, असे मनोगत व्यक्त केले.

यानंतर कल्याणी आडत, वैष्णवी अंदुरकर, प्रियदर्शिनी चोरगे यांच्या कवितेने कार्यक्रमाची रंगत वाढवली. यावेळी प्रताप पाटील, अरुण सुनगार, सारिका पाटील यांनी गजल सादर केली. महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख डॉ. गोपाळ गावडे यांनीही आपली कविता सादर केली. यावेळी माजी प्राचार्य प्रदीप गबाले, मधुकर मुसळे, करवीरनगर वाचन मंदिराच्या संचालक संजीवनी तोफखाने उपस्थित होत्या. सारिका पाटील यांनी सूत्रसंचालन केले. अपर्णा पाटील यांनी आभार मानले.

--

फोटो नं ०४०३२०२१-कोल-कविसंमेलन

ओळ : मराठी राजभाषा दिनानिमित्त महावीर विद्यालयात आयोजित कविसंमेलनात अपर्णा पाटील यांनी कविता सादर केली. यावेळी गौरी भोगले व सुजाता पेंडसे उपस्थित होत्या.

--