शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

पूर्वीच्या सर्वसंमत रेखांकनात बदल केल्यास आत्मदहन करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:23 IST

कोपार्डे : करवीर तालुक्यातील भुये, भुयेवाडी येथील राष्ट्रीय महामार्गाचे मंत्रालयात सर्वसंमतीने मंजूर झालेले ३० जानेवारी २०१८ चे रेखांकन ...

कोपार्डे : करवीर तालुक्यातील भुये, भुयेवाडी येथील राष्ट्रीय महामार्गाचे मंत्रालयात सर्वसंमतीने मंजूर झालेले ३० जानेवारी २०१८ चे रेखांकन कायम ठेवावे. जर यात बदल केला आणि भूसंपादनासाठी अधिकारी आले, तर आत्मदहन करू, असा निर्वाणीचा इशारा भुये, भुयेवाडीतील शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प अधिकारी वसंत पंधारे यांना निवेदनाद्वारे दिला.

बुधवारी माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखाली या दोन गावचे शेतकरी प्रतिनिधी देव पाटील, सरपंच सचिन देवकुळे यांनी पंधारे यांना लेखी निवेदन दिले. यावेळी चंद्रदीप नरके यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. मंत्रालयात मंत्री, लोकप्रतिनिधी, शेतकरी प्रतिनिधी व प्रकल्प अधिकारी यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत सर्वसंमतीने राज्यमार्ग -१९४ चे रुंदीकरण करून राष्ट्रीय महामार्ग करण्याचे रेखांकन करण्यात आले होते. याचे फायदे-तोटे तपासून या राज्यमार्गाचे रुंदीकरण करण्याचे ठरले होते. तसे सर्वमताने रेखांकन करण्यात आले होते. त्याला मंजुरीही मिळाली होती. यामुळे सर्व भुये, भुयेवाडी गावातील शेतकरी, ग्रामस्थांना या रेखांकनानुसार आपली जमीन व स्थावर मालमत्ता किती जाणार, याचे नियोजन केले होते. पण या रेखांकनात २०२० मध्ये लॉकडाऊनच्या काळात बदल करण्यात आला. गुप्त भूसंपादनाच्या हालचाली सुरू झाल्यानंतर याबाबत ग्रामस्थांनी कार्यालयात निवेदने दिली होती. पण याकडेही का दुर्लक्ष करण्यात आले, असा सवाल नरके यांनी अधिकाऱ्यांना केला.

नरके म्हणाले, आमचा रस्ते प्रकल्पाला विरोध नाही. पण शेतकरी व ग्रामस्थांचे नुकसान टाळण्यासाठी लोकप्रतिनिधी व शेतकरी यांची बैठक त्यावेळच्या प्रकल्प अधिकाऱ्यांबरोबर झाली होती. त्यात सर्वमताने मंजूर रेखांकनाला कोणाच्या आदेशाने बगल दिली आहे, याचे स्पष्टीकरण देण्याची मागणी नरके यांनी केली.

यावेळी प्रकल्प अधिकारी वसंत पंधारे यांनी या रेखांकनाची सविस्तर माहिती घेऊन ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या हिताचे रेखांकन कसे करता येईल याबाबतचा सविस्तर अहवाल वरिष्ठ कार्यालयात पाठवतो, असे सांगून, सर्वांना याबाबत विश्वासात घेतले जाईल, असे आश्वासन दिले.

यावेळी बाबासाहेब पाटील, विक्रम पाटील, जयसिंग पाटील उपस्थित होते.

फोटो : ०७ भुये निवेदन

माजी आ. चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखाली भुये, भुयेवाडी गावचे शेतकरी प्रतिनिधी देव पाटील, सरपंच सचिन देवकुळे यांनी लेखी निवेदन दिले.