शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

पूर्वीच्या सर्वसंमत रेखांकनात बदल केल्यास आत्मदहन करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:23 IST

कोपार्डे : करवीर तालुक्यातील भुये, भुयेवाडी येथील राष्ट्रीय महामार्गाचे मंत्रालयात सर्वसंमतीने मंजूर झालेले ३० जानेवारी २०१८ चे रेखांकन ...

कोपार्डे : करवीर तालुक्यातील भुये, भुयेवाडी येथील राष्ट्रीय महामार्गाचे मंत्रालयात सर्वसंमतीने मंजूर झालेले ३० जानेवारी २०१८ चे रेखांकन कायम ठेवावे. जर यात बदल केला आणि भूसंपादनासाठी अधिकारी आले, तर आत्मदहन करू, असा निर्वाणीचा इशारा भुये, भुयेवाडीतील शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प अधिकारी वसंत पंधारे यांना निवेदनाद्वारे दिला.

बुधवारी माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखाली या दोन गावचे शेतकरी प्रतिनिधी देव पाटील, सरपंच सचिन देवकुळे यांनी पंधारे यांना लेखी निवेदन दिले. यावेळी चंद्रदीप नरके यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. मंत्रालयात मंत्री, लोकप्रतिनिधी, शेतकरी प्रतिनिधी व प्रकल्प अधिकारी यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत सर्वसंमतीने राज्यमार्ग -१९४ चे रुंदीकरण करून राष्ट्रीय महामार्ग करण्याचे रेखांकन करण्यात आले होते. याचे फायदे-तोटे तपासून या राज्यमार्गाचे रुंदीकरण करण्याचे ठरले होते. तसे सर्वमताने रेखांकन करण्यात आले होते. त्याला मंजुरीही मिळाली होती. यामुळे सर्व भुये, भुयेवाडी गावातील शेतकरी, ग्रामस्थांना या रेखांकनानुसार आपली जमीन व स्थावर मालमत्ता किती जाणार, याचे नियोजन केले होते. पण या रेखांकनात २०२० मध्ये लॉकडाऊनच्या काळात बदल करण्यात आला. गुप्त भूसंपादनाच्या हालचाली सुरू झाल्यानंतर याबाबत ग्रामस्थांनी कार्यालयात निवेदने दिली होती. पण याकडेही का दुर्लक्ष करण्यात आले, असा सवाल नरके यांनी अधिकाऱ्यांना केला.

नरके म्हणाले, आमचा रस्ते प्रकल्पाला विरोध नाही. पण शेतकरी व ग्रामस्थांचे नुकसान टाळण्यासाठी लोकप्रतिनिधी व शेतकरी यांची बैठक त्यावेळच्या प्रकल्प अधिकाऱ्यांबरोबर झाली होती. त्यात सर्वमताने मंजूर रेखांकनाला कोणाच्या आदेशाने बगल दिली आहे, याचे स्पष्टीकरण देण्याची मागणी नरके यांनी केली.

यावेळी प्रकल्प अधिकारी वसंत पंधारे यांनी या रेखांकनाची सविस्तर माहिती घेऊन ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या हिताचे रेखांकन कसे करता येईल याबाबतचा सविस्तर अहवाल वरिष्ठ कार्यालयात पाठवतो, असे सांगून, सर्वांना याबाबत विश्वासात घेतले जाईल, असे आश्वासन दिले.

यावेळी बाबासाहेब पाटील, विक्रम पाटील, जयसिंग पाटील उपस्थित होते.

फोटो : ०७ भुये निवेदन

माजी आ. चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखाली भुये, भुयेवाडी गावचे शेतकरी प्रतिनिधी देव पाटील, सरपंच सचिन देवकुळे यांनी लेखी निवेदन दिले.