शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

शेतकऱ्यांच्या चळवळीलाच बळ देऊ, कार्यकर्त्यांतून दबाव : स्वाभिमानी संघटनेतून प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:24 IST

कोल्हापूर : राजकारण करणारे बरेच जण आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारे, त्यांची चळवळ करणाऱ्या नेतृत्वाची गरज जास्त आहे. त्यामुळे ही ...

कोल्हापूर : राजकारण करणारे बरेच जण आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारे, त्यांची चळवळ करणाऱ्या नेतृत्वाची गरज जास्त आहे. त्यामुळे ही चळवळच पुढे घेऊन जावूया. आता कोणत्या पक्षाच्या नादाला नव्याने लागायला नको, अशी प्रतिक्रिया शुक्रवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून व समाजातूनही उमटली. स्वाभिमानी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांची वाटचाल भाजपच्या दिशेने सुरू असल्याचे वृत्त लोकमतमध्ये शुक्रवारी प्रसिद्ध झाल्यावर ही प्रतिक्रिया उमटली. लोकसभा निवडणुकीला अजून बराच कालावधी आहे. आता तो माझ्यासमोरचा प्राधान्यक्रम नाही, त्यामुळे भाजपच्या जवळ जाण्याचा प्रश्नच येत नसल्याचे स्वत: शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे. कार्यकर्त्यांचा सूर पाहून भवितव्यातील राजकीय वाटचालीचा निर्णय घेऊ, असे त्यांनी म्हटले आहे.

शेट्टी गेल्या कांही दिवसांपासून महाविकास आघाडीबद्दल नाराज आहेत. त्यातच त्यांनी पंढरपूर विधानसभेला स्वतंत्र उमेदवार उभा केला आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी ‘हारा नहीं हूँ मैं... बस, खेल समझ रहा था...! असे ट्विट केले होते. महाविकास आघाडीतून त्यांचे विधान परिषदेसाठी नाव पाठवण्यात आले आहे; परंतु त्यास अद्याप राज्यपालांनी मंजुरी दिलेली नाही. या सर्व अस्वस्थेतून ते महाविकास आघाडीतून लांब जात असल्याचे चित्र आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध झालेल्या या बातमीने खळबळ उडवून दिली. बातमी वाचून सकाळपासूनच पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने शेट्टी यांना फोन आले. काहींनी लोकमतकडेही प्रतिक्रिया व्यक्त केल्या. सध्याच्या काळात सामान्य माणसाच्या हिताचे राजकारण करणाऱ्या नेत्यांची समाजाला जास्त गरज आहे. राजकीय पक्ष स्वार्थापोटी संघटनेचा वापर करतात व नंतर फसवतात. त्यामुळे आता कोणताच नवीन घरोबा करायला नको. केंद्रातील भाजप सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी विधेयकांना संघटना म्हणून आपण कडाडून विरोध केला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या चुकीच्या भूमिकेला देशात सर्वात अगोदर विरोध करण्याची भूमिका शेट्टी यांनी घेतली आहे. त्यामुळे पुन्हा त्या पक्षाची संगत अजिबात करायला नको. यापूर्वी २००९ ला ज्याप्रमाणे आपण संघटना म्हणून लढलो आणि लोकांना भिडलो, तसेच राजकारण यापुढेही करूया, असा साधारण व्यक्त झालेल्या प्रतिक्रियांचा सूर राहिला.