शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या चळवळीलाच बळ देऊ, कार्यकर्त्यांतून दबाव : स्वाभिमानी संघटनेतून प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:24 IST

कोल्हापूर : राजकारण करणारे बरेच जण आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारे, त्यांची चळवळ करणाऱ्या नेतृत्वाची गरज जास्त आहे. त्यामुळे ही ...

कोल्हापूर : राजकारण करणारे बरेच जण आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारे, त्यांची चळवळ करणाऱ्या नेतृत्वाची गरज जास्त आहे. त्यामुळे ही चळवळच पुढे घेऊन जावूया. आता कोणत्या पक्षाच्या नादाला नव्याने लागायला नको, अशी प्रतिक्रिया शुक्रवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून व समाजातूनही उमटली. स्वाभिमानी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांची वाटचाल भाजपच्या दिशेने सुरू असल्याचे वृत्त लोकमतमध्ये शुक्रवारी प्रसिद्ध झाल्यावर ही प्रतिक्रिया उमटली. लोकसभा निवडणुकीला अजून बराच कालावधी आहे. आता तो माझ्यासमोरचा प्राधान्यक्रम नाही, त्यामुळे भाजपच्या जवळ जाण्याचा प्रश्नच येत नसल्याचे स्वत: शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे. कार्यकर्त्यांचा सूर पाहून भवितव्यातील राजकीय वाटचालीचा निर्णय घेऊ, असे त्यांनी म्हटले आहे.

शेट्टी गेल्या कांही दिवसांपासून महाविकास आघाडीबद्दल नाराज आहेत. त्यातच त्यांनी पंढरपूर विधानसभेला स्वतंत्र उमेदवार उभा केला आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी ‘हारा नहीं हूँ मैं... बस, खेल समझ रहा था...! असे ट्विट केले होते. महाविकास आघाडीतून त्यांचे विधान परिषदेसाठी नाव पाठवण्यात आले आहे; परंतु त्यास अद्याप राज्यपालांनी मंजुरी दिलेली नाही. या सर्व अस्वस्थेतून ते महाविकास आघाडीतून लांब जात असल्याचे चित्र आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध झालेल्या या बातमीने खळबळ उडवून दिली. बातमी वाचून सकाळपासूनच पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने शेट्टी यांना फोन आले. काहींनी लोकमतकडेही प्रतिक्रिया व्यक्त केल्या. सध्याच्या काळात सामान्य माणसाच्या हिताचे राजकारण करणाऱ्या नेत्यांची समाजाला जास्त गरज आहे. राजकीय पक्ष स्वार्थापोटी संघटनेचा वापर करतात व नंतर फसवतात. त्यामुळे आता कोणताच नवीन घरोबा करायला नको. केंद्रातील भाजप सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी विधेयकांना संघटना म्हणून आपण कडाडून विरोध केला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या चुकीच्या भूमिकेला देशात सर्वात अगोदर विरोध करण्याची भूमिका शेट्टी यांनी घेतली आहे. त्यामुळे पुन्हा त्या पक्षाची संगत अजिबात करायला नको. यापूर्वी २००९ ला ज्याप्रमाणे आपण संघटना म्हणून लढलो आणि लोकांना भिडलो, तसेच राजकारण यापुढेही करूया, असा साधारण व्यक्त झालेल्या प्रतिक्रियांचा सूर राहिला.