शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

शेतकऱ्यांच्या चळवळीलाच बळ देऊ, कार्यकर्त्यांतून दबाव : स्वाभिमानी संघटनेतून प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:24 IST

कोल्हापूर : राजकारण करणारे बरेच जण आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारे, त्यांची चळवळ करणाऱ्या नेतृत्वाची गरज जास्त आहे. त्यामुळे ही ...

कोल्हापूर : राजकारण करणारे बरेच जण आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारे, त्यांची चळवळ करणाऱ्या नेतृत्वाची गरज जास्त आहे. त्यामुळे ही चळवळच पुढे घेऊन जावूया. आता कोणत्या पक्षाच्या नादाला नव्याने लागायला नको, अशी प्रतिक्रिया शुक्रवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून व समाजातूनही उमटली. स्वाभिमानी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांची वाटचाल भाजपच्या दिशेने सुरू असल्याचे वृत्त लोकमतमध्ये शुक्रवारी प्रसिद्ध झाल्यावर ही प्रतिक्रिया उमटली. लोकसभा निवडणुकीला अजून बराच कालावधी आहे. आता तो माझ्यासमोरचा प्राधान्यक्रम नाही, त्यामुळे भाजपच्या जवळ जाण्याचा प्रश्नच येत नसल्याचे स्वत: शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे. कार्यकर्त्यांचा सूर पाहून भवितव्यातील राजकीय वाटचालीचा निर्णय घेऊ, असे त्यांनी म्हटले आहे.

शेट्टी गेल्या कांही दिवसांपासून महाविकास आघाडीबद्दल नाराज आहेत. त्यातच त्यांनी पंढरपूर विधानसभेला स्वतंत्र उमेदवार उभा केला आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी ‘हारा नहीं हूँ मैं... बस, खेल समझ रहा था...! असे ट्विट केले होते. महाविकास आघाडीतून त्यांचे विधान परिषदेसाठी नाव पाठवण्यात आले आहे; परंतु त्यास अद्याप राज्यपालांनी मंजुरी दिलेली नाही. या सर्व अस्वस्थेतून ते महाविकास आघाडीतून लांब जात असल्याचे चित्र आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध झालेल्या या बातमीने खळबळ उडवून दिली. बातमी वाचून सकाळपासूनच पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने शेट्टी यांना फोन आले. काहींनी लोकमतकडेही प्रतिक्रिया व्यक्त केल्या. सध्याच्या काळात सामान्य माणसाच्या हिताचे राजकारण करणाऱ्या नेत्यांची समाजाला जास्त गरज आहे. राजकीय पक्ष स्वार्थापोटी संघटनेचा वापर करतात व नंतर फसवतात. त्यामुळे आता कोणताच नवीन घरोबा करायला नको. केंद्रातील भाजप सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी विधेयकांना संघटना म्हणून आपण कडाडून विरोध केला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या चुकीच्या भूमिकेला देशात सर्वात अगोदर विरोध करण्याची भूमिका शेट्टी यांनी घेतली आहे. त्यामुळे पुन्हा त्या पक्षाची संगत अजिबात करायला नको. यापूर्वी २००९ ला ज्याप्रमाणे आपण संघटना म्हणून लढलो आणि लोकांना भिडलो, तसेच राजकारण यापुढेही करूया, असा साधारण व्यक्त झालेल्या प्रतिक्रियांचा सूर राहिला.