शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

स्त्री सन्मानाची मानवी साखळी करूया

By admin | Updated: August 4, 2016 01:22 IST

‘लोकमत’ची साद : नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन

कोल्हापूर : भारतीय संस्कृतीत एकीकडे स्त्रीची शक्ती म्हणून पूजा होते, तर दुसरीकडे तिच्यावर होत असलेल्या अत्याचारांचा आलेख वाढत जातोय. या दोन्ही भूमिकांऐवजी एक व्यक्ती म्हणून तिच्या अस्तित्वाचा आणि स्त्रीत्वाचा सन्मान व्हायला पाहिजे, या उद्देशाने ‘लोकमत’तर्फे आयोजित मानवी साखळीत संवेदनशील कोल्हापूरकर म्हणून मोठ्या संख्येने सहभागी होऊ या. राज्यभर आणि देशाच्या विविध भागांतही महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर समाजमनांत स्त्रीत्वाचा सन्मान वाढावा, या भावनेने ‘लोकमत’तर्फे शनिवारी (दि. ६) म्हणजेच मैत्रीदिनाच्या निमित्ताने ‘धागा जोडू मैत्रीचा... सन्मान करू स्त्रीत्वाचा...’ ही संकल्पना घेऊन भवानी मंडपात मानवी साखळी करण्यात येणार आहे. सकाळी १० वाजता होणाऱ्या या उपक्रमात विविध संस्थांसह शाळा, महाविद्यालये, सखी मंच सदस्या यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटनात दिवसेंदिवस वाढत आहे. केवळ कायदे करून किंवा संबंधित आरोपींना शिक्षा करून अशा घटनांना आळा बसणार नाही; तर स्त्रीबद्दल आदरभाव निर्माण व्हायला हवा. त्यासाठी मुलांमध्ये आणि पुरुषांमध्ये जाणीवजागृती व्हायला हवी. समाजबदलाच्या आणि परिवर्तनाच्या चळवळीत ‘लोकमत’ने नेहमीच पुढाकार घेतला आहे. त्याचेच पुढचे पाऊल म्हणून या मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले आहे. ही साखळी केवळ महिलांची किंवा पुरुषांची नव्हे तर मानवतेची आहे. म्हणूनच त्यात स्त्री, पुरुष, विद्यार्थी, विद्यार्थिनी, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊ शकतात. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवीत प्रबोधनाच्या दिशेने आपले पाऊल टाकावे आणि या कार्यास पाठिंबा द्यावा, असे आवाहन विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी केले आहे.पूर्वीच्या काळी शिवाजी महाराजांनी महिलेवर अत्याचार केलेल्या देशमुखाचे हात-पाय तोडले होते, शाहू महाराजांनीही महिलांसाठी विशेष कायदे केले होते. आता मात्र छेडछाड झाली की मुलींना जबाबदार धरले जाते. त्यांनाच घाबरून राहण्याचा सल्ला दिला जातो. महिलांना सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी घरातूनच मुलांवर संस्कार केले पाहिजे. पण मुलांना मोकळीक मिळते. महिलांवरील अत्याचार थांबण्यासाठी मुलांवर बालपणापासून सन्मानाचे संस्कार रूजवले पाहिजे. -मधुरिमाराजे छत्रपती महिलांचा सन्मान करण्यासाठी आधी मुलांमध्ये त्याबद्दलची भावनी रुजवली पाहिजे. सुजाण पालकत्वातूनच अशा घटनांना आळा बसेल. त्यामुळे ‘लोकमत’ने उचललेले हे प्रबोधनाचे पाऊल अत्यंत कौतुकास्पद आणि आदर्शवत आहे. त्यातून नागरिकांपर्यंत चांगला संदेश पोहोचेल. - सीमा पाटील, सामाजिक कार्यकर्त्यापुरुषांनी महिलांचे संरक्षण करायचे, अशी आपली संस्कृती आहे; पण आज पुरुषांकडूनच महिलांना धोका वाढत आहे. हे थांबवायचे असेल तर जनजागृती झाली पाहिजे. त्यासाठी ‘लोकमत’ने घेतलेला पुढाकार हे महत्त्वाचे पाऊल आहे. - संध्या कुंभारे, उद्योजिकास्लोगन स्पर्धा...या फेरीच्या निमित्ताने स्लोगन (घोषवाक्य) स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. त्यातील उत्कृष्ट तीन स्पर्धकांना बक्षिसे देण्यात येतील. मानवी साखळीवेळी या विजेत्या स्पर्धकांचा सत्कार करण्यात येणार आहे. इच्छुकांनी आपले स्लोगन मोबाईल क्रमांक ९८८१८६७६०० या व्हॉट्स अ‍ॅपवर पाठवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.