शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
3
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
4
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
5
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
6
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
7
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
8
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
9
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
10
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
11
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
12
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
13
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
14
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
15
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
16
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
17
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
18
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
19
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
20
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...

शिवराज्याभिषेक सोहळा लोकोत्सव करूया

By admin | Updated: May 12, 2017 01:12 IST

मराठा महासंघाच्या बैठकीत निर्धार : प्रबोधनपर कार्यक्रम, विविध उपक्रमांचे आयोजनशिवराज्याभिषेक सोहळा लोकोत्सव करूया मराठा महासंघाच्या बैठकीत निर्धार : प्रबोधनपर कार्यक्रम, विविध उपक्रमांचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा लोकोत्सव करत तो जगभरात पोहोचविण्याचा निर्धार गुरुवारी अखिल भारतीय मराठा संघाच्यावतीने आयोजित बैठकीत केला. यानिमित्ताने सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन व्याख्यान, प्रबोधनपर, पर्यावरणपूरक कार्यक्रम, शिवरायांच्या कार्याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे, शिस्तबद्ध मिरवणूक अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. शाहू स्मारक भवन येथे झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक होते. यावेळी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, शशिकांत पाटील, बबन लांडगे, डॉ. संदीप पाटील, सीमा पाटील, अरुण कांबळे, विजय तडेकर, नगरसेविका रूपाराणी निकम, संभाजी जगदाळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. वसंतराव मुळीक म्हणाले, शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या निमित्ताने शिवशक, भाषा शुद्धिकरण, शिवमुद्रा असे निर्णय घेत खऱ्या अर्थाने रयतेचे राज्य स्थापन केले. शिवराज्याभिषेकाच्या निमित्ताने ‘शिवाजी’ नावाचा महिमा जगभर पोहोचविण्यासाठी छायाचित्र प्रदर्शन, व्याख्यान, प्रबोधनात्मक कार्यक्रम, युवकांचा सहभाग असे उपक्रम हाती घेऊया. शिवराज्याभिषेक दिनाची ६ जूनला निघणारी मिरवणूक ही डॉल्बीमुक्त व विधायकतेचा संदेश देणारी असेल.इंद्रजित सावंत म्हणाले, परकीयांच्या जोखडात अडकलेल्या भारताचा पहिला स्वातंत्र्य सोहळा म्हणून शिवराज्याभिषेक दिनाचे विशेष महत्त्व आहे. हा दिवस जगभरात पोहोचवून त्याचा लोकोत्सव करण्यासाठी कोल्हापूरकरांचा सहभाग महत्त्वाचा आहे. रूपाराणी निकम म्हणाल्या, शिवाजी महाराजांचे कार्य डोक्यावर घेऊन नव्हे तर डोक्यात घेऊन मराठा महासंघाचे कार्य सुरू आहे. यावेळी बबन लांडगे, शिरीष देशपांडे, डॉ. संदीप पाटील यांचीही भाषणे झाली. मुस्लिम पंचायतचे अध्यक्ष फारूख कुरेशी यांनी या सोहळ््यात मुस्लिम समाजाचा सहभाग असेल, असे सांगितले. सोमनाथ घोडेराव, मोहन जाधव, रमेश आपटे, विजय तडेकर, विजयसिंह पाटील, अरुण कांबळे, सीमा पाटील, शैलजा भोसले, सतीश कोळसे-पाटील, आनंद म्हाळुंगेकर, यांनी मनोगत व्यक्त केले. सुवर्णसिंहासनासाठी योगदान इंद्रजित सावंत म्हणाले, राज्य शासनाने गेल्यावर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने रायगडाच्या संवर्धनासाठी पाचशे कोटींचा निधी जाहीर केला. मात्र, त्यातला एक रुपयाचा निधीही दिलेला नाही. पूर्वी येथे शिवाजी महाराजांचे ३२ मण सोन्याचे सिंहासन होते, असे सिंहासन पुन्हा स्थापन करण्यासाठी महाराष्ट्रातील एका संघटनेचे पुढाकार घेतला आहे. यानिमित्ताने रायगडचे जतन संवर्धन होणार असेल तर सुवर्ण सिंहासनासाठी कोल्हापूरकरांनी योगदान द्यावे.