शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
3
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
4
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
7
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
8
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
9
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
10
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
11
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
12
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
13
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
14
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
15
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
16
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
17
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
18
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
19
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
20
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?

शिवराज्याभिषेक सोहळा लोकोत्सव करूया

By admin | Updated: May 12, 2017 01:12 IST

मराठा महासंघाच्या बैठकीत निर्धार : प्रबोधनपर कार्यक्रम, विविध उपक्रमांचे आयोजनशिवराज्याभिषेक सोहळा लोकोत्सव करूया मराठा महासंघाच्या बैठकीत निर्धार : प्रबोधनपर कार्यक्रम, विविध उपक्रमांचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा लोकोत्सव करत तो जगभरात पोहोचविण्याचा निर्धार गुरुवारी अखिल भारतीय मराठा संघाच्यावतीने आयोजित बैठकीत केला. यानिमित्ताने सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन व्याख्यान, प्रबोधनपर, पर्यावरणपूरक कार्यक्रम, शिवरायांच्या कार्याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे, शिस्तबद्ध मिरवणूक अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. शाहू स्मारक भवन येथे झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक होते. यावेळी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, शशिकांत पाटील, बबन लांडगे, डॉ. संदीप पाटील, सीमा पाटील, अरुण कांबळे, विजय तडेकर, नगरसेविका रूपाराणी निकम, संभाजी जगदाळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. वसंतराव मुळीक म्हणाले, शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या निमित्ताने शिवशक, भाषा शुद्धिकरण, शिवमुद्रा असे निर्णय घेत खऱ्या अर्थाने रयतेचे राज्य स्थापन केले. शिवराज्याभिषेकाच्या निमित्ताने ‘शिवाजी’ नावाचा महिमा जगभर पोहोचविण्यासाठी छायाचित्र प्रदर्शन, व्याख्यान, प्रबोधनात्मक कार्यक्रम, युवकांचा सहभाग असे उपक्रम हाती घेऊया. शिवराज्याभिषेक दिनाची ६ जूनला निघणारी मिरवणूक ही डॉल्बीमुक्त व विधायकतेचा संदेश देणारी असेल.इंद्रजित सावंत म्हणाले, परकीयांच्या जोखडात अडकलेल्या भारताचा पहिला स्वातंत्र्य सोहळा म्हणून शिवराज्याभिषेक दिनाचे विशेष महत्त्व आहे. हा दिवस जगभरात पोहोचवून त्याचा लोकोत्सव करण्यासाठी कोल्हापूरकरांचा सहभाग महत्त्वाचा आहे. रूपाराणी निकम म्हणाल्या, शिवाजी महाराजांचे कार्य डोक्यावर घेऊन नव्हे तर डोक्यात घेऊन मराठा महासंघाचे कार्य सुरू आहे. यावेळी बबन लांडगे, शिरीष देशपांडे, डॉ. संदीप पाटील यांचीही भाषणे झाली. मुस्लिम पंचायतचे अध्यक्ष फारूख कुरेशी यांनी या सोहळ््यात मुस्लिम समाजाचा सहभाग असेल, असे सांगितले. सोमनाथ घोडेराव, मोहन जाधव, रमेश आपटे, विजय तडेकर, विजयसिंह पाटील, अरुण कांबळे, सीमा पाटील, शैलजा भोसले, सतीश कोळसे-पाटील, आनंद म्हाळुंगेकर, यांनी मनोगत व्यक्त केले. सुवर्णसिंहासनासाठी योगदान इंद्रजित सावंत म्हणाले, राज्य शासनाने गेल्यावर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने रायगडाच्या संवर्धनासाठी पाचशे कोटींचा निधी जाहीर केला. मात्र, त्यातला एक रुपयाचा निधीही दिलेला नाही. पूर्वी येथे शिवाजी महाराजांचे ३२ मण सोन्याचे सिंहासन होते, असे सिंहासन पुन्हा स्थापन करण्यासाठी महाराष्ट्रातील एका संघटनेचे पुढाकार घेतला आहे. यानिमित्ताने रायगडचे जतन संवर्धन होणार असेल तर सुवर्ण सिंहासनासाठी कोल्हापूरकरांनी योगदान द्यावे.