शहरं
Join us  
Trending Stories
1
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
2
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
3
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
4
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
5
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
6
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
7
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
8
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
9
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
10
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
11
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
12
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
13
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
14
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
15
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
16
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
17
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
18
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
19
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
20
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!

वीस पटाखालील शाळांची योग्य माहिती द्यावी

By admin | Updated: October 6, 2015 00:28 IST

आजरा पंचायत समिती : शाळा बंद न करण्याची मागणी

आजरा : आजरा तालुका डोंगराळ असून, आजही पावसाळ्यात ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्यांवरील मुलांना शाळेपर्यंत जाणे अडचणीचे होत असल्याने चुकीची माहिती दिल्याने २० पटाखालील शाळा बंद होणार नाहीत याची काळजी शिक्षण खात्याने घ्यावी, अशा सूचना आजरा पंचायत समितीच्या मासिक सभेत पदाधिकाऱ्यांनी केल्या.आजरा पंचायत समितीची मासिक सभा सभापती विष्णुपंत केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. आजरा तालुक्यातदुष्काळ जाहीर करावा व २० पटाखालील आजरा तालुक्यातील शाळा बंद करू नयेत, असा महत्त्वपूर्ण ठराव सभेच्या सुरुवातीस करण्यात आला.मेंढोली येथील शाळेतील विद्यार्थ्यांना गेले दोन महिने पोषण आहार मिळालेला नाही. धान्याची मागणी न झाल्याने हा प्रकार घडल्याचे शिक्षण विभागाच्यावतीने सांगण्यात आले. सदस्यांनी याबाबत आक्रमक भूमिका घेत गटशिक्षण अधिकाऱ्यांसह संबंधितांना नोटिसा काढण्याच्या सूचना सभापती केसरकर यांनी केल्या.जलयुक्त शिवार अभियानांतर्गत खानापूर गावची निवड करण्यात आली असून, यापुढे वन्यप्राण्यांकडून झालेल्या नुकसानीचे आॅनलाईन फॉर्म भरून घेतले जाणार असून, १५ दिवसांत नुकसानभरपाई दिली जाणार असल्याचे परिक्षेत्र वनअधिकारी राजन देसाई यांनी सांगितले.आजरा तालुक्यात पाणीटंचाईची शक्यता गृहीत धरून ‘चित्री’चे पाणी सोडताना प्राधान्याने आजरावासीयांचा विचार करावा, अशा सूचना सदस्यांनी पाटबंधारे विभागास केल्या, तर पाणीटंचाई गृहीत धरून बंधाऱ्यांना बरगे टाकण्याचे काम पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता हारदे यांनी स्पष्ट केले.सदस्या कामिनी पाटील यांनी पेरणोली मार्गावरील मोरी खचल्याने वाहतूक धोकादायक झाल्याचे निदर्शनास आणून दिले. ग्रामसेवकांच्या उपस्थितीचा प्रश्नही सभागृहात उपस्थित करण्यात आला. यावेळी एस. टी. आगार, सार्वजनिक बांधकाम विभाग, वीज कंपनी, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, आदी विभागांचा आढावा घेण्यात आला.सभेस सहायक गटविकास अधिकारी एस. एस. भोसले, अनिता नाईक, तुळशीराम कांबळे, निर्मला व्हनबट्टे यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)शिक्षण खात्याच्या कारभाराचा आढावा घेत असताना २० पटाखालील शाळा बंद करण्याच्या शासनाच्या निर्णयावर जोरदार चर्चा झाली.तालुक्यात ३८ शाळा ३० पटाखालील आहेत. बहुतांश शाळा डोंगरी व पावसाळी भागातील असल्याने या शाळांमधील विद्यार्थ्यांची पर्यायी व्यवस्था करणे अडचणीचे ठरणार आहे. परिणामी शाळांमधील मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. त्यामुळे शिक्षण खात्याने कोणतीही चुकीची माहिती देऊ नये, असे कामिना पाटील, सभापती विष्णुपंत केसरकर यांनी सांगितले.