शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

झालं गेलं विसरून कॉँग्रेसला उभारी देऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2019 00:42 IST

कोल्हापूर : गेली १४ वर्षे कॉँग्रेस पक्षाचा आमदार म्हणून काम करीत असताना जिल्ह्यात कॉँग्रेस बळकट करण्याचा प्रयत्न केला. सध्या ...

कोल्हापूर : गेली १४ वर्षे कॉँग्रेस पक्षाचा आमदार म्हणून काम करीत असताना जिल्ह्यात कॉँग्रेस बळकट करण्याचा प्रयत्न केला. सध्या अडचणीचा काळ आहे. मोजके मावळे असले तरी गड जिंकूच, असा विश्वास काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी बुधवारी येथे व्यक्त केला. मागे काय झाले ते सगळे आपण विसरून जाणार आहोत आणि सगळ््यांना बरोबर घेऊन काँग्रेसला उभारी देण्यास आपले प्राधान्य राहील असेही त्यांनी स्पष्ट केले. कॉँग्रेसमध्ये आता आत-बाहेर चालणार नाही. राहायचे असेल त्यांनी ताकदीने राहा, असा इशाराही पाटील यांनी दिला.जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्यानंतर बुधवारी आमदार पाटील यांनी कॉँग्रेस कमिटीच्या कार्यालयात प्रवेश केला. महापुरामुळे फटाके, हारतुऱ्यांचा डामडौल नव्हता, परंतु कार्यकर्त्यांची तोबा गर्दी होती. काँग्रेसच्या कार्यालयात जल्लोषाचे वातावरण दिसले.आमदार पाटील म्हणाले, गेल्या १०-१५ वर्षे सर्व तालुक्यांत कॉँग्रेस कार्यकर्त्यांना ताकद दिली; पण त्याचा गाजावाजा केला नाही. मध्यंतरीच्या घडामोडीनंतर ज्येष्ठ नेते म्हणून जिल्हाध्यक्षपदासाठी जयवंतराव आवळे यांच्या नावाची शिफारस केली होती; पण पक्षाने आपल्यावर जबाबदारी दिली. पक्ष बदलण्याचा निर्णय घेणाऱ्यांनी थोडा विचार केला पाहिजे. पक्षाने आपणाला काय दिले आणि आपली बांधीलकी काय? पक्षाने मंत्री केले. आता अडचणीच्या काळात मागे राहणे योग्य होणार नाही. पक्षातील ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि तरुणांंचे सहकार्य घेऊन जिल्ह्णात कॉँग्रेस ‘नंबर वन’ करू.भाजप सरकारवर सडकून टीका करताना पाटील म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणाºयांनी त्यांच्या गडकिल्ल्यांवर हॉटेल उभारण्याचा संकल्प केला आहे, त्याचा निषेध करतो. ज्या किल्ल्यांच्या इतिहासातून शिवरायांच्या प्रतापाची महिती तरुण पिढीसमोर जाणार आहे, तेच किल्ले हॉटेलसाठी भाड्याने देण्याचा निर्णय भाजप सरकारने घेतला आहे. या भूमिकेमागे षड्यंत्र असून या निमित्ताने छत्रपतींचा विचार पुसण्याचे काम फडणवीस सरकार करीत आहे. ते आम्ही कदापि होवू देणार नाही.’नगरसेवक तौफिक मुल्लाणी यांनी स्वागत केले. अ‍ॅड. गुलाबराव घोरपडे, हिंदुराव चौगले, सरलाताई पाटील, शशांक बावचकर यांनी मनोगत व्यक्त केले. शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, उपमहापौर भूपाल शेटे, संजीवनीदेवी गायकवाड, ऋतुराज पाटील, राजू आवळे, यशवंत हाप्पे, अ‍ॅड. सुरेश कुराडे, दौलत देसाई, अमर यशवंत पाटील, विजयसिंह मोरे, राहुल खंजिरे, जयराम पाटील, उदयानी साळुंखे, संध्या घोटणे, सुप्रिया साळोखे, आदी उपस्थित होते.काँग्रेस कमिटीतराजेश नरसिंग पाटील‘गोकुळ’चे संचालक राजेश नरसिंग पाटील हे बुधवारी कॉँग्रेस कमिटीत हजर झाल्याने अनेकांच्या भुवय्या उंचावल्या.भरमू पाटील हे भाजपमध्ये गेल्याने तालुक्यात कॉँग्रेस कमकुवत झाली होती. अशातच पाटील यांनी उपस्थिती लावत धक्का दिला.इचलकरंजीत कॉँग्रेसचाच आमदारइचलकरंजीतील नेते सोडून गेले असले तरी सामान्य जनता कॉँग्रेससोबत आहे. इचलकरंजीचा आमदार हा कॉँग्रेसचाच असेल. कार्यकर्ते प्रामाणिक आहेत. नेत्यांचेच काही सांगता येत नाही, असा टोला शशांक बावचकर यांनी लगावला.