शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
4
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
5
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
6
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
7
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
8
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
9
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
10
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
11
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
12
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
13
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
14
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
15
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
16
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
17
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
18
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
19
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
20
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे

सर्कि ट बेंचचा ठराव मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करू ;

By admin | Updated: March 27, 2015 00:29 IST

मुख्यमंत्री फडणवीस: खंडपीठ कृती समितीशी चर्चा

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे ‘सर्कि ट बेंच’ कोल्हापुरात स्थापन व्हावे, या मागणीसाठी उच्च न्यायालयाच्या सर्व अटींची पूर्तता केली जाईल, तसेच विधिमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतर होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा ठराव करून तो उच्च न्यायालयाकडे पाठविला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खंडपीठ कृती समितीला गुरुवारी दिली. गेल्या सहा महिन्यांपासून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी केलेले प्रयत्न निष्फळ ठरले होते. सर्किट बेंचच्या मागणीसाठी राज्य मंत्रिमंडळ ठराव करेपर्यंत पालकमंत्री पाटील यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढून धरणे धरण्याचा, मुंबई येथे लाँग मार्चने जाऊन लाक्षणिक उपोषण करण्याचा तसेच महालोकन्यायालयाचे कामकाज बंद पाडण्याचा निर्णय कऱ्हाड येथील खंडपीठ कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. याची तातडीने दखल घेऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी कृती समितीला मुंबईत बैठकीचे निमंत्रण दिले. त्यानुसार पालकमंत्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली कृती समितीच्या शिष्टमंडळाने विधानभवनात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने सर्किट बेंच स्थापन करण्यासाठी आपण उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मोहित शहा व राज्यपालांना पत्र दिल्याचे सांगितले होते; परंतु हे पत्र अद्याप कोणालाच पोहोचले नसल्याचे निदर्शनास आले आहे. फक्त पत्राने ही मागणी पूर्ण होणार नाही, त्यासाठी ‘कोल्हापूर’चा उल्लेख करून मंत्रिमंडळाचा ठराव झाल्याखेरीज ही मागणी पूर्ण होणार नसल्याचे सांगितले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी या मागणीसाठी उच्च न्यायालयाच्या सर्व अटींची पूर्तता केली जाईल. तसेच याप्रश्नी मंत्रिमंडळासमोर विषय ठेवण्यास मंजुरी दिली असून, अधिवेशन संपल्यानंतर होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठराव करून तो उच्च न्यायालयाकडे पाठविला जाईल, अशी ग्वाही देत मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांच्याशी या प्रश्नावर सविस्तर चर्चा झाली आहे. त्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता अधिवेशनानंतर दोन आठवड्यांत करण्यात येईल, असे स्पष्ट केले. दरम्यान, मुख्य न्यायाधीश शहा यांचा कार्यकाल संपत आल्याची बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणली असता त्यांनी शासनाने सर्किट बेंचचा प्रश्न मार्गी लावण्याचा निर्णय घेतल्याने त्यामध्ये कोणतीही अडचण निर्माण होणार नसल्याचे सांगितले. शिष्टमंडळात कृती समितीचे निमंत्रक अ‍ॅड. विवेक घाटगे, राजेंद्र मंडलिक, के. व्ही. पाटील, प्रशांत चिटणीस, बाबासाहेब पाटील, राजेंद्र पाटील, संपतराव पवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष महेश जाधव, संदीप देसाई, किरण कुलकर्णी, आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)