शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

संघर्ष यात्रेचा शेवट काशीत करावा! सदाभाऊंचा कॉँग्रेस-राष्ट्रवादीला टोला :

By admin | Updated: April 29, 2017 18:12 IST

शेतकऱ्यांच्या रक्ताने हात माखलेल्यांची नैतिकता काय?

 लोकमत आॅनलाईन

कोल्हापूर, दि. २९ : कॉँग्रेस-राष्ट्रवादीची संघर्ष यात्रा ही शेतकऱ्यांसाठी नव्हे, तर सत्तेच्या काळात केलेल्या पापांतून उतराई होण्यासाठी आहे. त्यांनी संघर्ष यात्रेचा शेवट काशीमध्ये जाऊन अंघोळ करून करावा; म्हणजे थोडेफार पापही धुऊन जाईल, अशी खिल्ली कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी उडविली.

ऊसदरासाठी रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांच्या छाताडावर गोळ्या घातल्या. या मंडळींचे हात शेतकऱ्यांच्या रक्ताने माखले असून त्यांना कर्जमाफीची मागणी करण्याची नैतिकता नसल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे शनिवारी एका विवाह सोहळ्यासाठी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. मुस्लिम बोर्डिंग येथे त्यांनी पत्रकारांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या.

कर्जमाफीबाबत सरकारची भूमिका काय याबाबत बोलताना खोत म्हणाले, या देशात तीन वेळा कर्जमाफी झाली. बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्या काळात विकास संस्थांना कर्जमाफी दिली. व्ही. पी. सिंग यांच्या सरकारने दुसऱ्यांदा, तर तिसरी मनमोहन सिंग यांच्या सरकारने तिसऱ्यांदा थेट शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. विदर्भ व मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांतील आत्महत्या रोखण्यासाठी मनमोहन सिंग यांनी कर्जमाफी आणली; पण अडीच एकरांची अट घातल्याने त्याचा फायदा तेथील किती शेतकऱ्यांना झाला. सात वर्षांनी पुन्हा कर्जमाफीची मागणी होत आहे. महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमुक्त होऊन त्याचा सात-बारा कोरा झाला पाहिजे. यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे.

‘शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी पायाभूत सुविधा देण्याची गरज आहे. यासाठी जलयुक्त शिवार योजनेत मोठी गुंतवणूक केल्याने आज त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. एकीकडे पायाभूत सुविधा भक्कम करीत असताना कर्जमुक्ती कशी करता येईल याचा विचार आम्ही करीत आहोत. ‘कर्जमुक्ती’च्या लोकप्रिय घोषणेत शेतकऱ्यांना अडकून ठेवण्याचा उद्योग काही मंडळी करीत आहे; पण याच लोकांना कर्जमाफीसाठी १९८८ नंतर २००८ साल का उजाडले? कर्जमाफी हवीच होती तर विधानसभेच्या जाहीरनाम्यात मागणी का नव्हती? ऊस आंदोलनात शेतकऱ्यांवर गोळ्या झाडून त्यांच्यावर दरोड्याचे गुन्हे दाखल केले. दोन्ही कॉँग्रेसच्या मंडळींचे हात शेतकऱ्यांच्या रक्ताने माखले आहेत. त्यांना संघर्ष यात्रा काढण्याची नैतिकता नसल्याचे खोत यांनी सांगितले.

हवामान अंदाजासाठी स्वंयचलित यंत्रे लहरी हवामानामुळे शेती अडचणीत येत आहे. यासाठी राज्य सरकारने हवामानाचा अंदाज घेणारी २६०० स्वयंचलित यंत्रे उभी करण्याचा निर्णय घेतल्याचे राज्यमंत्री खोत यांनी सांगितले. रघुनाथदादांनी कारखानदारांच्या गळी उतरावे गुजरातमधील ‘गणदेवी’ कारखान्याप्रमाणे दर द्यावा, ही दहा वर्षे आमची मागणी आहे. रघुनाथदादांचा अभ्यास मोठा आहे. आपण लहान कार्यकर्ता आहे. गाळप झालेल्या उसाला एक हजारच का ‘गणदेवी’इतका दर देण्यासाठी त्यांनी ते कारखानदारांच्या गळी उतरवावे, असा टोला खोत यांनी हाणला.