शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
4
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
5
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
6
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
8
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
9
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
10
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
12
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
13
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
14
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
15
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
16
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
17
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

संघर्ष यात्रेचा शेवट काशीत करावा! सदाभाऊंचा कॉँग्रेस-राष्ट्रवादीला टोला :

By admin | Updated: April 29, 2017 18:12 IST

शेतकऱ्यांच्या रक्ताने हात माखलेल्यांची नैतिकता काय?

 लोकमत आॅनलाईन

कोल्हापूर, दि. २९ : कॉँग्रेस-राष्ट्रवादीची संघर्ष यात्रा ही शेतकऱ्यांसाठी नव्हे, तर सत्तेच्या काळात केलेल्या पापांतून उतराई होण्यासाठी आहे. त्यांनी संघर्ष यात्रेचा शेवट काशीमध्ये जाऊन अंघोळ करून करावा; म्हणजे थोडेफार पापही धुऊन जाईल, अशी खिल्ली कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी उडविली.

ऊसदरासाठी रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांच्या छाताडावर गोळ्या घातल्या. या मंडळींचे हात शेतकऱ्यांच्या रक्ताने माखले असून त्यांना कर्जमाफीची मागणी करण्याची नैतिकता नसल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे शनिवारी एका विवाह सोहळ्यासाठी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. मुस्लिम बोर्डिंग येथे त्यांनी पत्रकारांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या.

कर्जमाफीबाबत सरकारची भूमिका काय याबाबत बोलताना खोत म्हणाले, या देशात तीन वेळा कर्जमाफी झाली. बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्या काळात विकास संस्थांना कर्जमाफी दिली. व्ही. पी. सिंग यांच्या सरकारने दुसऱ्यांदा, तर तिसरी मनमोहन सिंग यांच्या सरकारने तिसऱ्यांदा थेट शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. विदर्भ व मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांतील आत्महत्या रोखण्यासाठी मनमोहन सिंग यांनी कर्जमाफी आणली; पण अडीच एकरांची अट घातल्याने त्याचा फायदा तेथील किती शेतकऱ्यांना झाला. सात वर्षांनी पुन्हा कर्जमाफीची मागणी होत आहे. महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमुक्त होऊन त्याचा सात-बारा कोरा झाला पाहिजे. यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे.

‘शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी पायाभूत सुविधा देण्याची गरज आहे. यासाठी जलयुक्त शिवार योजनेत मोठी गुंतवणूक केल्याने आज त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. एकीकडे पायाभूत सुविधा भक्कम करीत असताना कर्जमुक्ती कशी करता येईल याचा विचार आम्ही करीत आहोत. ‘कर्जमुक्ती’च्या लोकप्रिय घोषणेत शेतकऱ्यांना अडकून ठेवण्याचा उद्योग काही मंडळी करीत आहे; पण याच लोकांना कर्जमाफीसाठी १९८८ नंतर २००८ साल का उजाडले? कर्जमाफी हवीच होती तर विधानसभेच्या जाहीरनाम्यात मागणी का नव्हती? ऊस आंदोलनात शेतकऱ्यांवर गोळ्या झाडून त्यांच्यावर दरोड्याचे गुन्हे दाखल केले. दोन्ही कॉँग्रेसच्या मंडळींचे हात शेतकऱ्यांच्या रक्ताने माखले आहेत. त्यांना संघर्ष यात्रा काढण्याची नैतिकता नसल्याचे खोत यांनी सांगितले.

हवामान अंदाजासाठी स्वंयचलित यंत्रे लहरी हवामानामुळे शेती अडचणीत येत आहे. यासाठी राज्य सरकारने हवामानाचा अंदाज घेणारी २६०० स्वयंचलित यंत्रे उभी करण्याचा निर्णय घेतल्याचे राज्यमंत्री खोत यांनी सांगितले. रघुनाथदादांनी कारखानदारांच्या गळी उतरावे गुजरातमधील ‘गणदेवी’ कारखान्याप्रमाणे दर द्यावा, ही दहा वर्षे आमची मागणी आहे. रघुनाथदादांचा अभ्यास मोठा आहे. आपण लहान कार्यकर्ता आहे. गाळप झालेल्या उसाला एक हजारच का ‘गणदेवी’इतका दर देण्यासाठी त्यांनी ते कारखानदारांच्या गळी उतरवावे, असा टोला खोत यांनी हाणला.