शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

घोषणाबाज सरकारला गुडघे टेकायला लावू

By admin | Updated: May 22, 2017 00:37 IST

घोषणाबाज सरकारला गुडघे टेकायला लावू

शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांची ‘पुणे ते मंत्रालय’ अशी ‘आत्मक्लेश’ यात्रा आजपासून सुरू होत आहे. गेल्या दहा वर्षांतील त्यांची ही चौथी मोठी यात्रा आहे, मागील तीन यात्रा सत्तेत नसताना काढल्या होत्या; पण आता सत्तेत असूनही सरकार विरोधात उघडपणे त्यांनी ‘शड्डू’ ठोकला आहे. आत्मक्लेश यात्रेच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी साधलेला संवाद...राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने शेतकऱ्यांचा विश्वास गमावल्याने मोठ्या आशेने राज्यातील शेतकऱ्यांनी भाजपला सत्तेवर बसवले. निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्वच नेत्यांनी मोठ-मोठी आश्वासने दिली होती, त्याचा विसर सरकारला पडल्याने आम्हाला रस्त्यावर उतरावे लागत आहे. तीन वर्षे नुसत्या घोषणात गेली असून आश्वासने जर पाळता येत नसतील तर शेतकऱ्यांना फसविल्याचे सरकारने एकदा जाहीर करावे, पण लक्षात ठेवा गाठ शेतकऱ्यांशी आहे. या घोषणाबाज सरकारला गुडघे टेकायला लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा खरमरीत इशारा खासदार राजू शेट्टी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला. दोन्ही काँग्रेसने शेतकऱ्यांना लुटले होते, त्यांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी आम्ही भाजपसोबत गेलो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लाखो शेतकऱ्यांना कर्जमुक्ती व हमीभावाचे आश्वासन दिले होते; पण आश्वासने विसरायला पंतप्रधान काय सामान्य माणूस नाहीत. दिलेला ‘शब्द’ पाळण्याची सरकारची नैतिक जबाबदारी आहे. निवडणुकीत दिलेली आश्वासने पाळता येणार नसल्याचे केंद्र सरकार धडधडीत सर्वोच्च न्यायालयात सांगते. त्यावरून मोदी यांनी अज्ञानातून आश्वासने दिली असावीत किंवा त्यांना शेतकऱ्यांना फसवायचे होते, असे दोन अर्थ निघतात. आम्ही ज्याप्रमाणे महाराष्ट्रात भाजपला साथ देऊन काँग्रेसची पंधरा वर्षांची राजवट उधळून लावली त्याप्रमाणे रामपाल जाट यांनी राजस्थानमध्ये वसुंधराराजे सिंधिया यांचे सरकार आणले; पण दुर्दैवाने तेही भाजप सोडून बाहेर पडले आणि आम्हीही नाराज आहोत. तुमच्या विरोधात संघर्ष करायला आम्ही वेडे आहोत का? सरकारने आता घोषणाबाजी बंद करून कृती करावी. ‘मागेल त्याला शेततळे’ देण्याची घोषणा केली, पाच लाख शेततळी बांधण्याचे आश्वासन दिले आणि बांधली केवळ पाच हजार, दहा हजार सोलर पंप शेतकऱ्यांना वाटण्याचे आश्वासन दिले आणि वाटले केवळ दीड हजार, केवळ थापा मारून निवडणुका जिंकण्याचे काम भाजप सरकार करत आहे. तीन वर्षे वाट पाहून आमची सहनशीलता संपली आहे, ‘आत्मक्लेश’ यात्रेतून आश्वासन पूर्ततेची आठवण करून देत आहे. आगामी काळात आंदोलनाची तीव्रता वाढवून कर्जमुक्तीसह इतर मागण्यांसाठी सरकारला गुडघे टेकायला लावू, असा इशारा खासदार शेट्टी यांनी यावेळी दिला. व्यक्तीपेक्षा चळवळ मोठी...!शेतकऱ्यांच्या त्यागातून व बलिदानातून चळवळ उभी राहिली आहे, कोण गेले आणि कोण आले म्हणून त्याची ताकद कधी कमी होत नसते आणि वाढतही नसते. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी सुरुवातीला दिवगंत नेते शरद जोशी यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना ताकद दिली. त्यानंतर माझ्यावर विश्वास ठेवला आहे, माझ्यानंतर उद्या दुसरा कोणी तरी असेल. माझ्यादृष्टीने सध्या इतर मुद्दे गौण असून सर्व लक्ष ‘आत्मक्लेश’ यात्रेवर आहे, अशा शब्दांत राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याविषयी विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी सूचक इशारा दिला. तर ‘त्यांना’ तुरुंगात डांबा कारखाना विक्री व जलसंपदा घोटाळा करणाऱ्यांना तुरुंगात डांबण्यासाठी काँग्रेस सरकारच्या काळात गाडीभर पुरावे गोळा करणाऱ्यांच्या हातातच आता सत्ता आहे; पण आता तुरुंगात कोणी दिसेना, उलट ‘वाल्याचे वाल्मिकी’ झाल्याचे सांगत त्यांना ‘भाजप’मध्ये घेऊन त्यांचे शुद्धिकरण सुरू असल्याची टीका शेट्टी यांनी केली. ‘दादा’ चैनीसाठी कर्जमुक्ती नको!‘पहिल्यांदा शेतकरी सक्षम मगच कर्जमाफी’ या महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वक्तव्याचे आश्चर्य वाटते. शेतकऱ्यांच्या मानेवरील कर्जाचा बोजा कमी झाल्याशिवाय तो सक्षम कसा होणार? शेतकऱ्यांचा जीव गेल्यावर त्यांना सक्षम करणार आहात का? आम्हाला चैनीसाठी कर्जमुक्ती नको, असल्याचेही शेट्टी यांनी सांगितले.