शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

‘बिबट्या’, ‘साळिंदर’ला मृत्युदंड, तर अजगराला कारावास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:28 IST

आदित्य वेल्हाळ लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर वनपरिक्षेत्रात कायमस्वरूपी शासकीय पशुवैद्यकीय अधिकारीच नसल्याने गेल्या वर्षभरात बिबट्या, साळिंदर, ...

आदित्य वेल्हाळ

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोल्हापूर वनपरिक्षेत्रात कायमस्वरूपी शासकीय पशुवैद्यकीय अधिकारीच नसल्याने गेल्या वर्षभरात बिबट्या, साळिंदर, सांबर, खवले मांजर, वानर अशा अनेक जखमी प्राण्यांना जीव गमवावा लागला आहे. मानद वैद्यकीय डॉक्टरांकडून वेळेत उपचार होतीलच असे नाही. मृत प्राण्यांचे शवविच्छेदन करण्याचा अधिकार नसताना मानद डॉक्टरांकडून ते झाल्याचे उघडकीस आले आहे. वनविभाग मात्र याबाबत अनभिज्ञ आहे.

पश्चिम घाटात येणाऱ्या कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील वनक्षेत्रात लाखो वन्यजीवांचा अधिवास आहे. येथील जखमी वन्यजीवांवर कोल्हापुरातील सोनतळी येथे उपचार केले जातात. त्याकरिता मानद सेवा देणारे एक पशुवैद्यकीय अधिकारी व दोन सहायक येथे काम करीत आहेत. येथे गेल्या वर्षभरात एक हजारांहून अधिक वन्यजीव व पक्षी उपचारासाठी दाखल झाले होते. त्यातील अनेक वन्यजीवांना योग्य उपचाराअभावी आपले प्राण गमवावे लागले असल्याचा आरोप प्राणिमित्रांकडून होत आहे. यात बिबट्या, साळिंदर, सांबर, वानर, खवले मांजर, शेकरू, तरस, आदींचा समावेश असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे महाबळेश्वर (जि.सातारा) येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या बिबट्याला उपचारासाठी १९ फेब्रुवारी २०२० रोजी या उपचार केंद्रात आणले. त्याच्यावर सहा दिवस उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. शासकीय पशुवैद्यकीय अधिकारी नसताना त्याचे शवविच्छेदन केले गेले. साताऱ्यातूनच ९ फेब्रुवारी २०२१ला श्वानाने हल्ला केलेले सांबर उपचारासाठी आणण्यात आले होते. त्याचाही अशाच पद्धतीने मृत्यू झाला. त्यानंतर १७ फेब्रुवारीला जेऊर (ता.पन्हाळा) गरोदर साळिंदर रस्ते अपघातात मरण पावले. त्याच्या पोटातील एक पिल्लू जगले. हे पिल्लू तेथील नागरिकांनी वनविभागाकडे सुपूर्द केले. मात्र, योग्य आहाराअभावी त्याचाही मृत्यू झाल्याचे सांगितले जाते. रत्नागिरीत ३ ऑक्टोबर २०२० रोजी तोंडाला जखम झालेल्या अजगराला आणण्यात आले होते. उपचारानंतर तो बराही झाला. मात्र, त्याला त्याच्या अधिवासात अद्याप सोडलेले नाही. गेल्या पाच महिन्यांपासून या केंद्रातील एका पेटीत बंदिस्त असल्याने अजगर बारीक झाला आहे. मानद वैद्यकीय अधिकाऱ्याकडून योग्य उपचार होत नसतील तर तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्याकडे त्या प्राण्याचे हस्तांतरण करणे गरजेचे असले तरी वनविभाग मात्र हातावर हात ठेवून बसला आहे. त्यामुळे आता या उपचार केंद्रावरच उपचार करण्याची वेळ आल्याची भावना वन्य प्राणिमित्रांकडून व्यक्त होत आहे.

- पाॅइंटर

- या उपचार केंद्रातील मानद वैद्यकीय अधिकारी येथे काम करीत आहेत. मात्र, त्यांना प्रशिक्षित नसलेले दोन सहायक आहेत.

- वन्यजीवाला बेशुद्ध करण्यासाठी शासनमान्य अधिकृत केलेला वैद्यकीय अधिकारी लागतो. मात्र, हेही काम येथील मानद डॉक्टरांना करावे लागते.

- वन्यजीवांचे शवविच्छेदन अधिकृत वैद्यकीय अधिकाऱ्याने करणे कायद्याने बंधनकारक असताना तेही काम येथील मानद डॉक्टरांकडून केले जाते. या प्राण्यांची परस्पर विल्हेवाटही लावली जाते.

कोट -

उपचार केंद्रातील वन्यजीवांचा मृत्यू झाल्यास शासकीय पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनीच शवविच्छेदन करणे बंधनकारक आहे. असे प्रकार येथे घडत असतील तर संबधितांवर निश्चित कारवाई केली जाईल.

- रावसाहेब काळे, उपवनसंरक्षक, वनविभाग, कोल्हापूर

फोटो : २७०२०२०२१-कोल-बिबट्या०२

ओळी : सोनतळी (ता. करवीर) येथील वनविभागाच्या वन्यजीव उपचार केंद्रात बिबट्याचे शवविच्छेदन झाल्यानंतर त्याची परस्पर विल्हेवाट लावण्यात आली.

फोटो : २७०२२०२१-कोल-अजगर

ओळी : उपचार होऊन बरा झालेला अजगर गेली पाच महिने काचेच्या पेटीत नैसर्गिक अधिवासात जाण्याच्या प्रतीक्षेत आहे.