शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

‘बिबट्या’, ‘साळिंदर’ला मृत्युदंड, तर अजगराला कारावास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:28 IST

आदित्य वेल्हाळ लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर वनपरिक्षेत्रात कायमस्वरूपी शासकीय पशुवैद्यकीय अधिकारीच नसल्याने गेल्या वर्षभरात बिबट्या, साळिंदर, ...

आदित्य वेल्हाळ

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोल्हापूर वनपरिक्षेत्रात कायमस्वरूपी शासकीय पशुवैद्यकीय अधिकारीच नसल्याने गेल्या वर्षभरात बिबट्या, साळिंदर, सांबर, खवले मांजर, वानर अशा अनेक जखमी प्राण्यांना जीव गमवावा लागला आहे. मानद वैद्यकीय डॉक्टरांकडून वेळेत उपचार होतीलच असे नाही. मृत प्राण्यांचे शवविच्छेदन करण्याचा अधिकार नसताना मानद डॉक्टरांकडून ते झाल्याचे उघडकीस आले आहे. वनविभाग मात्र याबाबत अनभिज्ञ आहे.

पश्चिम घाटात येणाऱ्या कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील वनक्षेत्रात लाखो वन्यजीवांचा अधिवास आहे. येथील जखमी वन्यजीवांवर कोल्हापुरातील सोनतळी येथे उपचार केले जातात. त्याकरिता मानद सेवा देणारे एक पशुवैद्यकीय अधिकारी व दोन सहायक येथे काम करीत आहेत. येथे गेल्या वर्षभरात एक हजारांहून अधिक वन्यजीव व पक्षी उपचारासाठी दाखल झाले होते. त्यातील अनेक वन्यजीवांना योग्य उपचाराअभावी आपले प्राण गमवावे लागले असल्याचा आरोप प्राणिमित्रांकडून होत आहे. यात बिबट्या, साळिंदर, सांबर, वानर, खवले मांजर, शेकरू, तरस, आदींचा समावेश असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे महाबळेश्वर (जि.सातारा) येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या बिबट्याला उपचारासाठी १९ फेब्रुवारी २०२० रोजी या उपचार केंद्रात आणले. त्याच्यावर सहा दिवस उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. शासकीय पशुवैद्यकीय अधिकारी नसताना त्याचे शवविच्छेदन केले गेले. साताऱ्यातूनच ९ फेब्रुवारी २०२१ला श्वानाने हल्ला केलेले सांबर उपचारासाठी आणण्यात आले होते. त्याचाही अशाच पद्धतीने मृत्यू झाला. त्यानंतर १७ फेब्रुवारीला जेऊर (ता.पन्हाळा) गरोदर साळिंदर रस्ते अपघातात मरण पावले. त्याच्या पोटातील एक पिल्लू जगले. हे पिल्लू तेथील नागरिकांनी वनविभागाकडे सुपूर्द केले. मात्र, योग्य आहाराअभावी त्याचाही मृत्यू झाल्याचे सांगितले जाते. रत्नागिरीत ३ ऑक्टोबर २०२० रोजी तोंडाला जखम झालेल्या अजगराला आणण्यात आले होते. उपचारानंतर तो बराही झाला. मात्र, त्याला त्याच्या अधिवासात अद्याप सोडलेले नाही. गेल्या पाच महिन्यांपासून या केंद्रातील एका पेटीत बंदिस्त असल्याने अजगर बारीक झाला आहे. मानद वैद्यकीय अधिकाऱ्याकडून योग्य उपचार होत नसतील तर तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्याकडे त्या प्राण्याचे हस्तांतरण करणे गरजेचे असले तरी वनविभाग मात्र हातावर हात ठेवून बसला आहे. त्यामुळे आता या उपचार केंद्रावरच उपचार करण्याची वेळ आल्याची भावना वन्य प्राणिमित्रांकडून व्यक्त होत आहे.

- पाॅइंटर

- या उपचार केंद्रातील मानद वैद्यकीय अधिकारी येथे काम करीत आहेत. मात्र, त्यांना प्रशिक्षित नसलेले दोन सहायक आहेत.

- वन्यजीवाला बेशुद्ध करण्यासाठी शासनमान्य अधिकृत केलेला वैद्यकीय अधिकारी लागतो. मात्र, हेही काम येथील मानद डॉक्टरांना करावे लागते.

- वन्यजीवांचे शवविच्छेदन अधिकृत वैद्यकीय अधिकाऱ्याने करणे कायद्याने बंधनकारक असताना तेही काम येथील मानद डॉक्टरांकडून केले जाते. या प्राण्यांची परस्पर विल्हेवाटही लावली जाते.

कोट -

उपचार केंद्रातील वन्यजीवांचा मृत्यू झाल्यास शासकीय पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनीच शवविच्छेदन करणे बंधनकारक आहे. असे प्रकार येथे घडत असतील तर संबधितांवर निश्चित कारवाई केली जाईल.

- रावसाहेब काळे, उपवनसंरक्षक, वनविभाग, कोल्हापूर

फोटो : २७०२०२०२१-कोल-बिबट्या०२

ओळी : सोनतळी (ता. करवीर) येथील वनविभागाच्या वन्यजीव उपचार केंद्रात बिबट्याचे शवविच्छेदन झाल्यानंतर त्याची परस्पर विल्हेवाट लावण्यात आली.

फोटो : २७०२२०२१-कोल-अजगर

ओळी : उपचार होऊन बरा झालेला अजगर गेली पाच महिने काचेच्या पेटीत नैसर्गिक अधिवासात जाण्याच्या प्रतीक्षेत आहे.