शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
4
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
5
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
6
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
9
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
10
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
11
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
12
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
13
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
14
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
16
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
17
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
18
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
19
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
20
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!

बहर लांबल्याने लिंबू महाग

By admin | Updated: October 23, 2014 22:53 IST

वातावरणात बदल : उत्पादन घटल्याने नगास चार ते पाच रुपये दर

सांगली : गेल्यावर्षीचा तीव्र उन्हाळा आणि यंदा झालेला जोरदार पाऊस या वातावरणातील फरकाचा परिणाम लिंबू पिकावर झाल्याने उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. परिणामी दर गगनाला भिडले आहेत. चांगल्या दर्जाचा लिंबू प्रतिनग चार ते पाच रुपये झाला आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेला लिंबू हिरवा असून त्यात रसाचे प्रमाण अत्यल्प आहे. सांगली, मिरज मार्केटमध्ये सोलापूर, पुणे जिल्ह्यातील दौंड, श्रीगोंदा आणि कर्नाटकमधून लिंबूची मोठ्या प्रमाणात आवक होते. परंतु, त्या भागात गेल्यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे लिंबूच्या बागा वाळून गेल्या. काही शेतकऱ्यांनी बागा वाळू दिल्या नाहीत; पण पुरेसे पाणी न मिळाल्यामुळे फेब्रुवारीमध्ये मोहोर कमी प्रमाणात आला. त्यानंतर मृग नक्षत्रातही कमी बहर आला. आॅगस्ट, सप्टेंबरमध्ये जोरदार पाऊस झाला. हा पाऊस अजूनही जिल्ह्यासह राज्याच्या अनेक भागात सुरूच आहे. जादा पावसामुळे लिंबूच्या झाडांवर तांबेरा, ठिपक्या रोग पडल्याच्या तक्रारी आहेत. जादा पावसामुळे झाडाच्या मुळ्या दबल्यामुळे फळांमध्ये पुरेसा रस तयार होत नाही. लिंबूची टंचाई असल्यामुळे शेतकरी केवळ हिरवट लिंबूचीच बाजारात विक्री करू लागले आहेत. हिरव्या लिंबूचे दरही गगनाला भिडले आहेत. सांगलीच्या बाजारात तर लिंबूची विक्री प्रतिनग चार ते पाच रुपयाने होत आहे. बाजारामध्ये सध्या चांगले पिकलेले दोन लिंबू दहा रुपयांना मिळत आहेत. याचा फटका नागरिकांंसह हॉटेल व्यावसायिक आणि लिंबू-सरबताची विक्री करणाऱ्या हातगाडीवाल्यांनाही बसला आहे. (प्रतिनिधी) विविध रोगांचा प्रादुर्भावआॅगस्ट, सप्टेंबरमध्ये जोरदार पाऊस झाला. हा पाऊस जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागात सुरू आहे. याचा परिणाम लिंबूच्या बागांवर झाला आहे. झाडांवर तांबेरा, ठिपक्या या रोगांनी आक्रमण केले आहे. तसेच पावसाने फळांमध्ये रस तयार झालेला नाही. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.पूर्वी हॉटेलमध्ये कांदा, टोमॅटोचे दर वाढल्यानंतर भाजीतून ते गायब होत असे. छोटे हॉटेल व्यावसायिक तर कांदाभजी करणेच टाळत. गेल्या दहा वर्षांत हॉटेल व्यावसायिकांना कधीच लिंबूची टंचाई जाणवली नाही. मात्र सध्या एक लिंबू चार ते पाच रुपयाला मिळत असल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांची कोंडी झाली आहे, अशी प्रतिक्रिया सांगलीतील हॉटेल व्यावसायिक दौलतराव घोरपडे यांनी दिली.वातावरणातील बदलामुळे लिंबूचे उत्पादन घटले असून, रोगही पडला आहे. शेतकऱ्यांनी पाणी कमी प्रमाणात देऊन मायक्रोन्युट्रेड खताचा वापर करण्याची गरज आहे.- आर. जे. भोसले, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद.उन्हाळ्यामुळे लिंबूच्या अनेक बागांना पुरेसे पाणी मिळाले नाही. यामुळे मोहर, मृगाच्या काळात लिंबूच्या झाडांना कळीच आली नाही. सध्या कळी आली आहे, पण जादा पावसामुळे तांबेरा रोग पडला असून, फळावर ठिपके पडले आहेत.- भरत तळंगे, आरग (ता. मिरज)