शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
5
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
6
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
7
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
8
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
9
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
10
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
11
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
12
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
13
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
14
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
15
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
16
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
17
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
18
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
19
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
20
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."

विधान परिषदेचे पडसाद उमटणार

By admin | Updated: June 6, 2016 00:47 IST

- जयसिंगपूर नगरपालिका रणांगण

संदीप बावचे-- जयसिंगपूर --शिरोळ तालुक्याच्या राजकीय कुरुक्षेत्रात जयसिंगपूर शहराचा महत्त्वाचा सहभाग राहिला आहे़ बदलत्या राजकीय परिस्थितीत जयसिंगपूर नगरपालिकेची निवडणूक एका नव्या वळणावर येऊन ठेपली आहे़ येथील नगरपालिकेची निवडणूक आतापर्यंत पक्षीय पातळीवर न होता गटातटाच्या राजकारणातच झाली आहे़ गटाअंतर्गत झालेल्या या निवडणुकीत यड्रावकर गटाने बाजी मारली आहे़ नगरपालिकेवर गेल्या १५ वर्षांपासून यड्रावकर गटाची सत्ता अबाधित आहे़ होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीवर नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीची छाप पडण्याची शक्यता राजकीय वातावरणात व्यक्त होत आहे़ नगरपालिका निवडणुकीत प्रत्यक्षात येथे कोणता पॅटर्न राबविला जाईल, याबाबत संभ्रमावस्था आहे़ गतवेळच्या सन २०११ मध्ये झालेल्या निवडणुकीत यड्रावकर व सा़ ऱे पाटील गटाच्या नेतृत्वाखालील उमेदवारांनी बाजी मारली़ खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानीला खातेही उघडता आले नाही़ सत्तेची सूत्रे यड्रावकर व सा़ रे़ पाटील गटाच्या हाती जाणार हे स्पष्ट होताच जनसुराज्य पक्षाच्या एका सदस्याने व अपक्षाने सत्ताधाऱ्यांशी हातमिळवणी केली़ त्यामुळे पालिकेवर गेली पाच वर्षे यड्रावकर व सा़ रे़ पाटील गटाची एकहाती सत्ता राहिली़राज्यातील भाजप आघाडी सरकारने होऊ घातलेल्या निवडणुकीत थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याचा निर्णय घेतला आहे़ जयसिंगपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण कोणत्या प्रवर्गासाठी पडते़ यावर येथील निवडणुकीची चुरस अवलंबून राहणार आहे़गेल्या पाच वर्षांत येथील नगरपालिकेवर यड्रावकर व सा़ रे़ पाटील गटाची सत्ता राहिली़ मात्र, सा़ रे़ पाटील यांच्या निधनानंतर काँग्रेस पक्षाची सूत्रे दत्त साखरचे अध्यक्ष गणपतराव पाटील व शिरोळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अनिलराव यादव यांच्या हाती राहिली आहे़ यड्रावकर गटाशी ते मिळते-जुळते घेणार की, आपला वेगळा सवतासुभा निर्माण करणार यावर या निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे़ त्याचबरोबर तालुक्यात काँग्रेस-राष्ट्रवादी-स्वाभिमानीला हादरा देत पहिल्यांदाच शिवसेनेचे आमदार झालेले उल्हास पाटील कोणती भूमिका घेतात, हेही तितकेच महत्त्वाचे आहे़ खासदार राजू शेट्टी या निवडणुकीसाठी कशा पद्धतीने मोट बांधतात, हेही महत्त्वाचे आहे़विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते डॉ़ राजेंद्र पाटील-यड्रावकर हे काँग्रेसचे उमेदवार सतेज पाटील यांच्या पाठीशी राहिले़ त्यामुळे यड्रावकर विरोधक विधान परिषदेतील पराभूत उमेदवार महादेवराव महाडिक यांना या निवडणुकीत उतरविण्याचा प्रयत्न करीत आहेत़ खा़ राजू शेट्टी, महादेवराव महाडिक, आमदार उल्हास पाटील अशी शक्ती एकवटल्यास ही निवडणूक रंगतदार ठरणार आहे़