शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

विधान परिषदेचे पडसाद उमटणार

By admin | Updated: June 6, 2016 00:47 IST

- जयसिंगपूर नगरपालिका रणांगण

संदीप बावचे-- जयसिंगपूर --शिरोळ तालुक्याच्या राजकीय कुरुक्षेत्रात जयसिंगपूर शहराचा महत्त्वाचा सहभाग राहिला आहे़ बदलत्या राजकीय परिस्थितीत जयसिंगपूर नगरपालिकेची निवडणूक एका नव्या वळणावर येऊन ठेपली आहे़ येथील नगरपालिकेची निवडणूक आतापर्यंत पक्षीय पातळीवर न होता गटातटाच्या राजकारणातच झाली आहे़ गटाअंतर्गत झालेल्या या निवडणुकीत यड्रावकर गटाने बाजी मारली आहे़ नगरपालिकेवर गेल्या १५ वर्षांपासून यड्रावकर गटाची सत्ता अबाधित आहे़ होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीवर नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीची छाप पडण्याची शक्यता राजकीय वातावरणात व्यक्त होत आहे़ नगरपालिका निवडणुकीत प्रत्यक्षात येथे कोणता पॅटर्न राबविला जाईल, याबाबत संभ्रमावस्था आहे़ गतवेळच्या सन २०११ मध्ये झालेल्या निवडणुकीत यड्रावकर व सा़ ऱे पाटील गटाच्या नेतृत्वाखालील उमेदवारांनी बाजी मारली़ खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानीला खातेही उघडता आले नाही़ सत्तेची सूत्रे यड्रावकर व सा़ रे़ पाटील गटाच्या हाती जाणार हे स्पष्ट होताच जनसुराज्य पक्षाच्या एका सदस्याने व अपक्षाने सत्ताधाऱ्यांशी हातमिळवणी केली़ त्यामुळे पालिकेवर गेली पाच वर्षे यड्रावकर व सा़ रे़ पाटील गटाची एकहाती सत्ता राहिली़राज्यातील भाजप आघाडी सरकारने होऊ घातलेल्या निवडणुकीत थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याचा निर्णय घेतला आहे़ जयसिंगपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण कोणत्या प्रवर्गासाठी पडते़ यावर येथील निवडणुकीची चुरस अवलंबून राहणार आहे़गेल्या पाच वर्षांत येथील नगरपालिकेवर यड्रावकर व सा़ रे़ पाटील गटाची सत्ता राहिली़ मात्र, सा़ रे़ पाटील यांच्या निधनानंतर काँग्रेस पक्षाची सूत्रे दत्त साखरचे अध्यक्ष गणपतराव पाटील व शिरोळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अनिलराव यादव यांच्या हाती राहिली आहे़ यड्रावकर गटाशी ते मिळते-जुळते घेणार की, आपला वेगळा सवतासुभा निर्माण करणार यावर या निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे़ त्याचबरोबर तालुक्यात काँग्रेस-राष्ट्रवादी-स्वाभिमानीला हादरा देत पहिल्यांदाच शिवसेनेचे आमदार झालेले उल्हास पाटील कोणती भूमिका घेतात, हेही तितकेच महत्त्वाचे आहे़ खासदार राजू शेट्टी या निवडणुकीसाठी कशा पद्धतीने मोट बांधतात, हेही महत्त्वाचे आहे़विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते डॉ़ राजेंद्र पाटील-यड्रावकर हे काँग्रेसचे उमेदवार सतेज पाटील यांच्या पाठीशी राहिले़ त्यामुळे यड्रावकर विरोधक विधान परिषदेतील पराभूत उमेदवार महादेवराव महाडिक यांना या निवडणुकीत उतरविण्याचा प्रयत्न करीत आहेत़ खा़ राजू शेट्टी, महादेवराव महाडिक, आमदार उल्हास पाटील अशी शक्ती एकवटल्यास ही निवडणूक रंगतदार ठरणार आहे़