शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व
2
बंदूक नाही पण निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांच्या हाती, आत सापडले… 
3
IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यासाठी कठोर मेहनत; १० किलो वजनही कमी केलं! पण... सरफराजला ते प्रकरण भोवलं?
4
धक्कादायक! ४० हजारांसाठी देशाशी गद्दारी; गुजरातच्या कच्छमधून पाकिस्तानी गुप्तहेराला अटक
5
इंटरनेटची सुविधा नाही, फोनही लागत नाही; भुयारी मेट्रोचा प्रवास ठरतोय त्रासदायक!
6
वडिलांची झाली हत्या, मारेकऱ्यांना शिक्षा देण्यासाठी 'तो' झाला IPS; फी भरण्यासाठी विकलं धान्य
7
IND vs ENG : तो चांगला खेळतोय; पण...श्रेयस अय्यर कसोटी संघात का नाही? अजित आगरकर यांनी असं दिलं उत्तर
8
Rohit Pawar: समविचारी पक्ष सोबत आले तर ठिक, नाही तर...; रोहित पवार स्पष्टच बोलले
9
कपडे फाडले; लाथा मारल्या, धमकी दिली, जगतापांनी आयोगाला दिलेल्या तक्रार अर्जात धक्कादायक बाबी समोर
10
बिपाशाच का ही? अभिनेत्रीचा व्हिडिओ पाहून नेटकरी शॉक; एकेकाळची 'फिटनेस दिवा' आता...
11
Covid-19: चिंता वाढली! कळव्यात २१ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू
12
लग्नादरम्यान भर मंडपातून वराचं अपहरण, समोर आलं धक्कादायक कारण, कुटुंबीयांच्या तोंडचं पळालं पाणी  
13
४ ग्रह, ४ राजयोग: १० राशींवर लक्ष्मी प्रसन्न, भरघोस भरभराट; बक्कळ पैसा, बंपर लाभ, वरदान काळ!
14
धक्कादायक! गाण्याचा आवाज कमी करायला सांगितल्याने पती चिडला, पत्नीवर फेकले टॉयलेट क्लीनर
15
प्रेमाच्या जाळ्यात अडकवून बनवले तरुणींचे अश्लील व्हिडीओ; ७ आरोपींची पोलिसांनी काढली धिंड
16
ऑपरेशन सिंदूर: सैन्याने IPS अधिकाऱ्याचा सन्मान का केला? पाकिस्तानचा रहीम यार खान एअरबेस जवळच होता...
17
Somavati Amavasya 2025: पितरांच्या फोटोची जागा तर अयोग्य नाही? सोमवती अमवास्येला करा बदल!
18
Nuclear Weapon : ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचं नुकसान झालं? पाकचं परराष्ट्र मंत्रालय म्हणतंय... 
19
"काळजी करू नका…’’ पुंछमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात नुकसान झेलणाऱ्या पीडितांना राहुल गांधींनी दिला धीर
20
Corona Virus : मास्क लावायला हवा का, बूस्टर डोसची गरज आहे का, कोरोनाचा JN.1 व्हेरिएंट किती संसर्गजन्य?

पारंपरिक ज्ञानाला छेद देणारा योजना प्रस्ताव लिहिण्याची कला आत्मसात करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:19 IST

कोल्हापूर: केंद्र सरकारचा प्रत्येक विभाग नावीन्यपूर्ण कल्पनेला पाठबळ देण्यासाठी उत्सुक असतो. पण योग्य प्रस्तावाअभावी बऱ्याच वेळा हा निधी परत ...

कोल्हापूर: केंद्र सरकारचा प्रत्येक विभाग नावीन्यपूर्ण कल्पनेला पाठबळ देण्यासाठी उत्सुक असतो. पण योग्य प्रस्तावाअभावी बऱ्याच वेळा हा निधी परत जातो. त्यामुळे या योजना प्रस्तावाचा विषय हा पारंपरिक ज्ञानाला छेद देणारा असला पाहिजे, अशी सूचना शास्त्रज्ञ डॉ. अनिरुद्ध पंडित यांनी केली. महाविद्यालयातील शिक्षकांनी अध्यापनाबरोबरच संशोधन, उद्योग विश्वाची देवाण-घेवाण, तसेच संशोधन प्रस्ताव, निबंध लिहिण्याचे कसब आत्मसात करून उत्तम शिक्षक बनावे, असे आवाहनही त्यांनी केले.

डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, कसबा बावडाच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागाच्या संयोजनाखाली सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ व जगप्रसिद्ध काविटेशन टेक्निकचे जनक डॉ. अनिरुद्ध पंडित, कुलगुरू आयसीटी मुंबई यांनी संशोधन प्रस्ताव कसा लिहावा या महत्त्वपूर्ण विषयावर स्लाईड शोद्वारे ऑनलाईन सेमिनार घेतला. याचा लाभ देश-विदेशांतील पाचशे शिक्षक, संशोधक ,पदवीधर व पदवीच्या विद्यार्थ्यांनी घेतला.

डॉ. पंडित म्हणाले की, कुठल्याही सरकारी योजनेसाठी प्रस्ताव लिहिणे सुरू करणे आधी उद्देश, तसेच त्याची देश विकासाबरोबरच सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी असलेली गरज समजावून घेणे महत्त्वाचे असते. संशोधकांनी या योजना प्रस्ताव लिखाण करताना एखाद्या अनुभवी संशोधकांची मदत सुरुवातीला घेतल्यास उत्तम असते. आवश्यकतेनुसार उद्योगविश्व किंवा नामांकित विद्यापीठाबरोबर समझोता करार करावा.

या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष चेडे यांनी संशोधन प्रस्तावाची गरज सांगितली. परिचय संशोधन अधिष्ठाता व सेमिनार समन्वयक डॉ. अमरसिंह जाधव यांनी करून दिला. स्वागत, सूत्रसंचालन व आभार कार्य प्रा. राधिका धनाल यांनी पार पाडले.

फोटो: २९०५२०२१-कोल- डॉ. पंडित

(सिंगल फोटो आहे)