शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

गळतीच्या पाण्याची बचत

By admin | Updated: May 1, 2016 00:45 IST

‘क्रॉस’चे आव्हान पेलले : नियोजनबद्ध काम; ५0 लाख लीटर वाचले

कोल्हापूर : शिंगणापूर पाणी योजनेच्या चार मोठ्या गळती, नवीन पाईपलाईनचे चार ठिकाणी एकाचवेळी जोडकाम असे आव्हानात्मक काम महापालिका पाणीपुरवठा विभागाने नियोजित वेळेपेक्षाही कमी वेळेत पूर्ण केले. दोन दिवसांत केलेल्या या कामांमुळे महापालिकेच्या गळतीमधून वाया जाणारे दर दिवसांचे सुमारे ५० लाख लिटर पाणी वाचले आहे. सलग २० तास पाणी उपसा पंप बंद ठेवून अहोरात्र सुमारे १०० कर्मचारी व यंत्रसामग्रीच्या माध्यमातून एकाचवेळी काम सुरू करून तीन दिवसांचे काम अवघ्या दोन दिवसांत पूर्ण करून ऐन उन्हाळ्यात कोल्हापूर शहरात उद्भवणाऱ्या पाणीबाणीवर मात केली. विशेष म्हणजे, हे काम सुरू असताना जाहीर केल्याप्रमाणे निम्म्या शहरात पाणीटंचाईचे सावट असतानाही त्या भागात सुमारे २७ टँकरद्वारे योग्य नियोजन करून पाणीपुरवठा केला. त्यामुळे नागरिकांची, नगरसेवकांची एकही तक्रार झाली नाही. कोल्हापूर शहरात सध्या एक दिवस आड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यातच शिंगणापूर योजनेतील जलवाहिनीची चार ठिकाणी असलेली गळती काढण्याचे काम गुरुवारपासून हाती घेण्यात आल्याने शहराच्या निम्म्याहून अधिक भागांतील पाणीपुरवठा खंडित करावा लागला. त्यामुळे शहरात पाण्याची अभूतपूर्व कृत्रिम टंचाई निर्माण झाली. गुरुवारी सकाळी सहा वाजता शिंगणापूरहून पुईखडीला नेण्यात येणाऱ्या चार पंपांद्वारे पाण्याचा उपसा बंद केला. त्यानंतर जलवाहिनीवरील व्हॉल्व्ह रिकामे करणे, पाणी बाहेर काढणे, गळती काढणे, जुन्या पाईप तोडून नव्या पाईपला जोडणे, वेल्डिंग, आदी कामे अहोरात्र पूर्ण करून शुक्रवारी रात्री १२ वाजता शिंगणापूर योजनेचे चारही उपसा पंप एकापाठोपाठ सुरू करून जलवाहिनी सुरू केली. त्यानंतर शनिवारी पहाटेपर्यंत शिंगणापूर योजनेवर आधारित असणाऱ्या बहुतांशी पाण्याच्या टाक्या काही प्रमाणात भरून त्याद्वारे सकाळपासून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आव्हान पाणीपुरवठा विभागाने पेलले आहे. प्रथमच एकावेळी चार क्रॉस बदलले४दोन दिवस अहोरात्र जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. विशेष म्हणजे या कामात कोणताही अडथळा आला नाही. ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाई, त्यात एक दिवसाआड पाणीपुरवठा अशा अवस्थेत हे काम करताना नागरिकांची तक्रार येणार नाही याची दक्षता घेण्यात आली होती. ४त्यासाठी सुमारे १५ दिवस अगोदर गळतीच्या ठिकाणी खोदण्यात आले, तर नव्या जलवाहिनीला जोडण्यात येणाऱ्या ठिकाणीही यापूर्वीच खोदाई केली होती. त्यानंतर प्रत्यक्ष गुरुवारी उपसा थांबविल्यानंतर कामाला सुरुवात केली, ते सुमारे वीस तासांनंतरच काम पूर्ण करूनच थांबविले. ४एकाचवेळी चार ठिकाणी जलवाहिनीवर क्रॉस टाकण्याचे धाडसाचे काम प्रथमच महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पेलले.आजपासून पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठाकोल्हापूर : जलवाहिनीला ‘क्रॉस’ व गळती काढण्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण केल्यानंतर शनिवारपासून शहरात पाणीपुरवठा सुरूझाला; पण कमी दाबाने पाणीपुरवठा केल्याने बहुतांश भागात टँकरनेच पाणीपुरवठा केला. दिवसभरात २७ टँकरद्वारे ११० फेऱ्यांद्वारे कृत्रिम पाणीटंचाईवर मात करता आली. सर्वच भागात आज, रविवारपासून नियोजनानुसार एक दिवसाआड पूर्णक्षमतेने पाणीपुरवठा होणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाने जाहीर केले. गुरुवारपासून फुलेवाडी जकात नाका, रिंगरोडवरील अयोध्या कॉलनी, नवीन वाशी नाका, ए-वन गॅरेज पुईखडी या चार ठिकाणची मोठी गळती काढण्याचे काम, तसेच जुन्या जलवाहिनीतील पाणीपुरवठा नव्या जलवाहिनीद्वारे करण्यासाठी ‘क्रॉस’ टाकण्याचे काम एकाच वेळी सुरु केल्यानंतर गुरुवारपासून शिंगणापूर येथून चारही पंपांद्वारे होणारा उपसा थांबविला होता. ही आव्हानात्मक कामे युद्धपातळीवर पूर्ण करून शुक्रवारी मध्यरात्री शिंगणापूर पाणी योजनेचे चारही उपसा पंप कमी क्षमतेने सुरू करून चाचणी घेण्यात आली. पहाटेनंतर पाणी उपसा करून टाक्या भरल्या; पण कमी कालावधीमुळे पाण्याच्या टाक्या पूर्ण न भरल्याने राजारामपुरी, साळोखेनगर, ए वॉर्ड, मंगळवार पेठ, आदी भागांत पाणीपुरवठा झालाच नाही. त्यामुळे या भागात टँकरने पाणीपुरवठा करावा लागला. शहरात आज, रविवारपासून एक दिवसाआड पूर्णक्षमतेने पाणीपुरवठा होणार आहे. सणगर गल्लीत टँकरदरम्यान, मंगळवार पेठेतील सणगर गल्लीत टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. शनिवारी सकाळी या गल्लीत टँकरने पाणीपुरवठा सुरू असताना महिलांत वादावादीचे प्रसंग निर्माण झाले; पण भागातील ज्येष्ठांनी हा वाद मिटविला.