शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

हातकणंगले तालुक्यात समझोत्याच्या आघाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क, खोची : हातकणंगले तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने पॅनेल बांधणीच्या हालचालींना फॉर्म दाखल करण्याचा प्रक्रियेपासून वेग आला ...

लोकमत न्यूज नेटवर्क, खोची : हातकणंगले तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने पॅनेल बांधणीच्या हालचालींना फॉर्म दाखल करण्याचा प्रक्रियेपासून वेग आला आहे. पक्ष, गट, तट यापेक्षा सोयीच्या राजकारणाला महत्त्व आले असल्याचे दिसून येत आहे. अनपेक्षित साटेलोटे होत असून गतवेळचे विरोधक एकत्र येण्याचा सपाटाच अनेक गावांत लावल्याचे चित्र दिसत आहे.

तालुक्यात २१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या आहेत. इचलकरंजी, हातकणंगले असे दोन विधानसभा मतदारसंघ तालुक्यात आहेत. त्यापैकी हातकणंगले विधानसभा मतदारसंघात १९, तर इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात २ गावांची निवडणूक लागली आहे. त्यामुळे काँग्रेसचे आमदार राजू आवळे यांच्या दृष्टीने या निवडणुकीतील निकाल महत्त्वाचे आहेत. विशेष म्हणजे त्यांनी सकारात्मक भूमिका घेत ज्या गावच्या निवडणुका बिनविरोध होतील त्यांना २५ लाखांचा आमदार निधी विकासकामांसाठी देण्याची घोषणा केली आहे. सध्या तरी खोची, बिरदेववाडी या दोन ठिकाणी बिनविरोध होण्याची शक्यता आहे, पण उमेदवार निवडीवरून खटके उडताना दिसत आहेत. त्यामुळे शेवटपर्यंत समझोत्याची भूमिका टिकली तरच त्यास यश येणार आहे. पाडळी, मनपाडळे, वाठार तर्फ वडगाव, किणी, तासगाव, मिणचे, लाटवडे, खोची, बुवाचे वाठार, नेज, कुंभोज, दुर्गेवाडी, बिरदेववाडी या तालुक्याच्या पश्चिमेकडील गावांत काँग्रेस,जनसुराज्य, शिवसेना यांच्या कार्यकर्त्यांमध्ये परंपरेप्रमाणे विरोधाची मोर्चेबांधणी सुरू आहे, तर हालोंडी, माणगाव, माणगाववाडी, जंगमवाडी, रुई, तिळवणी येथे आवाडे गट, काँग्रेस, शिवसेना, शेतकरी संघटना हे प्रतिस्पर्धी म्हणून लढण्याच्या तयारीत आहे. कबनूर, चंदूर ही दोन्ही गावे मोठी असल्याने येथे पॅनेलची तसेच उमेदवारांची गर्दी होण्याची चिन्हे दिसत आहेत.

काही गावांत महाविकास आघाडीच्या राज्य पातळीवरील नेत्यांनी दिलेल्या सूचक इशाऱ्यानुसार महाविकास आघाडी एकत्र येत आहेत. लोकप्रतिनिधींनीसुद्धा ती भूमिका घेत कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत, परंतु गावपातळीवरील राजकारण या सूचनाच्या पालनास दाद देत नसल्याचे दिसते. या निवडणुकीत मात्र उमेदवार निवड जास्त क्लिष्ट बनली आहे. तरुणांचा उमेदवारीसाठी आग्रह होत आहे. विजयी होण्याची हमी मिळावी यासाठी सोयीच्या आघाड्या निर्माण होताना दिसत आहेत.