शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

संख्या घटल्याने नेत्यांसमोर पेच

By admin | Updated: October 27, 2014 00:25 IST

संचालकपदाचे राजकारण : ‘शब्द’ पाळताना होणार दमछाक

राजाराम लोंढे - कोल्हापूर -सहकारी संस्थांच्या नवीन नियमांनुसार संचालकांच्या संख्येला कात्री लागली आहे. त्याचा सर्वाधिक फटका हा साखर कारखाने व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांना बसणार आहे. त्यांना जास्तीत जास्त २१ संचालकांचे पॅनल करावे लागणार असल्याने विधानसभा निवडणुकीत संचालकपदासाठी दिलेला ‘शब्द’ पाळताना कारखानदारांची पुरती दमछाक होणार आहे. ९७ व्या घटनादुरुस्तीमुळे सर्वच संस्थांच्या संचालक मंडळांची संख्या कमी झाली आहे. साखर कारखाने, दूध संघ, सूतगिरणी, जिल्हा बँकांच्या संचालकांच्या संख्येला कात्री लागली आहे. पूर्वी साखर कारखान्यांच्या संचालकांची संख्या २५ आहे. बहुतांश कारखान्यांच्या निवडणुका या गटनिहाय घेतल्या जातात. गटातील मतदारसंख्येनुसार संचालकांची संख्या ठरविली जाते; पण नवीन नियमांनुसार २१ पर्यंत संचालक ठेवावे लागणार असल्याने चार जागा कमी होणार आहेत. परिणामी, कार्यक्षेत्रातील कोणत्या तरी चार गावांना पॅनलमध्ये संधी मिळणार नाही, हे नक्की आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत अनेकांना संचालकपदाचे गाजर दाखविले आहे. मुळात संचालकांची संख्या २५; पण त्याच्या पाचपट लोकांना नेत्यांनी आश्वासने दिली आहेत. पूर्वीच्या संचालक मंडळात राखीव गटातून सहा व सर्वसाधारण गटातून १९ असे २५ जणांचे संचालक मंडळ कार्यरत होते. आता राखीव गटातील ‘आर्थिकदृष्ट्या मागास’ हा प्रवर्गच कमी केला आहे. त्यामुळे अनुसूचित जाती/जमाती, इतर मागासवर्गीय, भटक्या विमुक्त जाती/जमाती यांतून प्रत्येकी एक व दोन महिला असे राखीव गटांतील पाच सदस्य राहणार आहेत. मुळात संचालकपदासाठी प्रत्येक गावात तीन-चार इच्छुक असतात. त्यातून एकाची निवड करताना तिघांचा रोष ओढवून घ्यावा लागतो. आता नेत्यांना कसरतच करावी लागणार आहे. विधानसभा, लोकसभा निवडणुकीत दिलेला ‘शब्द’ पाळताना साखरसम्राटांची दमछाक होणार, हे नक्की आहे. जिल्हा बँकेचे कर्मचारी प्रतिनिधींसह ३४ चे संचालक मंडळ कार्यरत होते; पण त्यांचीही संख्या १९ वर आल्याने तालुक्यातील नेत्यांना मुरड घालावी लागणार आहे. सत्ताधाऱ्यांच्या हालचाली !विधानसभेनंतर जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या कारखान्यांची सत्ताधारी मंडळी विधानसभा निवडणुकीत बाहेर आली असून, कारखान्याच्या प्रशासकीय यंत्रणेकडून नवीन नियमावलीनुसार गट कसे तयार होणार, कोणत्या गटात किती संख्या ठेवायची, याविषयीची माहिती गोळा करण्यास सुरू झाली आहे. ‘गोकुळ’वर परिणाम नाहीकोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाचे संचालक मंडळ मुळातच अठरांचे आहे. त्यामुळे संघाच्या पोटनियम दुरुस्ती सभेत ही संख्या २१ पर्यंत नेण्याची मागणी झाली; पण सत्तेतील वाटेकरी वाढविण्याची मानसिकता नेत्यांसह कारभारी संचालकांचीही नसल्याने ही संख्या अठराच राहिली. आगामी वर्षभरात होणार या कारखान्यांच्या निवडणुका दूधगंगा-वेदगंगा, भोगावती, छत्रपती राजाराम, डॉ. डी. वाय. पाटील, कुंभी-कासारी. असे राहणार साखरकारखान्यांचे संचालक मंडळ १५ सर्वसाधारण सदस्य 0१ संस्था प्रतिनिधी0१ अनुसूचित जाती/जमाती 0१ इतर मागासवर्गीय0१ भटक्या विमुक्त जाती/जमाती 0२ महिला राखीवजिल्हा बँकेचे संचालक मंडळ १२ प्रत्येक तालुक्याचा एक प्रतिनिधी0२ महिला प्रतिनिधी0१ अनुसूचित जाती/जमाती0१ इतर मागासवर्गीय0१ भटक्या विमुक्त जाती/ जमाती0२ दूध संस्था, पाणीपुरवठा, साखर कारखान्यांसह इतर गटांतूनजिल्हा बँकेचे संचालक मंडळ १२ प्रत्येक तालुक्याचा एक प्रतिनिधी0२ महिला प्रतिनिधी0१ अनुसूचित जाती/जमाती0१ इतर मागासवर्गीय0१ भटक्या विमुक्त जाती/ जमाती0२ दूध संस्था, पाणीपुरवठा, साखर कारखान्यांसह इतर गटांतून