शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांना मदत केलेला आरोपी सुरक्षा दलाच्या जाळ्यात; ऑपरेशन महादेवला मोठं यश
2
काश्मीर मुद्द्यावरून अमेरिकेचा पाकिस्तानला धक्का! पंतप्रधान मोदी-ट्रम्प भेटीबद्दलही केले मोठे विधान
3
'अशा' कमाईवर विशेष टॅक्स सूट नाही; कर सवलत मिळालेल्यांना थकबाकी भरावी लागणार, पण एक दिलासा...
4
एअरस्पेसमध्ये रशियाचा 'डिजिटल हल्ला'; स्पेनच्या संरक्षण मंत्र्यांच्या विमानाच्या जीपीएसमध्ये बिघाड, युरोपमध्ये खळबळ
5
इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर...
6
महाराष्ट्रातील बेस्ट पर्यटन स्थळे क्लिक करा, ५ लाख जिंका; शासनाची अनोखी स्पर्धा, काय आहेत अटी?
7
नवरात्री २०२५: शुक्रवारी ललिता पंचमी, ३ शुभ योगासह, भद्रा राजयोगात ७ राशींचा भाग्योदय
8
लडाखमधील भडकलेल्या आंदोलनाचं पाकिस्तान कनेक्शन? सोनम वांगचूक यांच्या दौऱ्याबद्दल उपस्थित होताहेत शंका
9
प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब आणि मुलावर गुन्हा दाखल; १५० हून अधिक लोकांना लाखोंचा फटका
10
Stock Market Today: सलग पाचव्या दिवशी शेअर बाजारात घसरण, निफ्टी ४० अंकांनी घसरला; Glenmark Pharma, Dixon Tech मध्ये तेजी
11
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
12
कुलदीप यादव सुसाट! जडेजा आणि मुरलीधरनचा रेकॉर्ड ब्रेक, मलिंगाचाही 'हा' विक्रम धोक्यात
13
पाकिस्तानची स्थिती बिकट होणार! भारतीय हवाई दलाला मिळणार ९७ तेजस विमाने
14
१ ऑक्टोबरपासून बदलणार ७ नियम, सामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम; ऑनलाइन गेमिंगपासून तिकिटापर्यंत आहे यादीत
15
Asia Cup 2025: हारिस रौफ आणि साहिबजादा फरहानवर बंदीची टांगती तलवार, मैदानातील गैरवर्तन महागात पडणार?
16
Post Office च्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹४ लाख, मिळेल ₹१,७९,६३१ चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
17
या संकटात बळीराजा तू एकटा नाहीस, अख्खा महाराष्ट्र सोबत आहे; हताश शेतकरी घेतायेत मृत्यूशी गळाभेट
18
'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
19
बहिणीसाठी रक्षक नाही, भक्षक ठरले भाऊ; आई-वडिलांनीही पाठ फिरवली, पण होणाऱ्या नवऱ्याने साथ दिली अन्..
20
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?

संख्या घटल्याने नेत्यांसमोर पेच

By admin | Updated: October 27, 2014 00:25 IST

संचालकपदाचे राजकारण : ‘शब्द’ पाळताना होणार दमछाक

राजाराम लोंढे - कोल्हापूर -सहकारी संस्थांच्या नवीन नियमांनुसार संचालकांच्या संख्येला कात्री लागली आहे. त्याचा सर्वाधिक फटका हा साखर कारखाने व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांना बसणार आहे. त्यांना जास्तीत जास्त २१ संचालकांचे पॅनल करावे लागणार असल्याने विधानसभा निवडणुकीत संचालकपदासाठी दिलेला ‘शब्द’ पाळताना कारखानदारांची पुरती दमछाक होणार आहे. ९७ व्या घटनादुरुस्तीमुळे सर्वच संस्थांच्या संचालक मंडळांची संख्या कमी झाली आहे. साखर कारखाने, दूध संघ, सूतगिरणी, जिल्हा बँकांच्या संचालकांच्या संख्येला कात्री लागली आहे. पूर्वी साखर कारखान्यांच्या संचालकांची संख्या २५ आहे. बहुतांश कारखान्यांच्या निवडणुका या गटनिहाय घेतल्या जातात. गटातील मतदारसंख्येनुसार संचालकांची संख्या ठरविली जाते; पण नवीन नियमांनुसार २१ पर्यंत संचालक ठेवावे लागणार असल्याने चार जागा कमी होणार आहेत. परिणामी, कार्यक्षेत्रातील कोणत्या तरी चार गावांना पॅनलमध्ये संधी मिळणार नाही, हे नक्की आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत अनेकांना संचालकपदाचे गाजर दाखविले आहे. मुळात संचालकांची संख्या २५; पण त्याच्या पाचपट लोकांना नेत्यांनी आश्वासने दिली आहेत. पूर्वीच्या संचालक मंडळात राखीव गटातून सहा व सर्वसाधारण गटातून १९ असे २५ जणांचे संचालक मंडळ कार्यरत होते. आता राखीव गटातील ‘आर्थिकदृष्ट्या मागास’ हा प्रवर्गच कमी केला आहे. त्यामुळे अनुसूचित जाती/जमाती, इतर मागासवर्गीय, भटक्या विमुक्त जाती/जमाती यांतून प्रत्येकी एक व दोन महिला असे राखीव गटांतील पाच सदस्य राहणार आहेत. मुळात संचालकपदासाठी प्रत्येक गावात तीन-चार इच्छुक असतात. त्यातून एकाची निवड करताना तिघांचा रोष ओढवून घ्यावा लागतो. आता नेत्यांना कसरतच करावी लागणार आहे. विधानसभा, लोकसभा निवडणुकीत दिलेला ‘शब्द’ पाळताना साखरसम्राटांची दमछाक होणार, हे नक्की आहे. जिल्हा बँकेचे कर्मचारी प्रतिनिधींसह ३४ चे संचालक मंडळ कार्यरत होते; पण त्यांचीही संख्या १९ वर आल्याने तालुक्यातील नेत्यांना मुरड घालावी लागणार आहे. सत्ताधाऱ्यांच्या हालचाली !विधानसभेनंतर जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या कारखान्यांची सत्ताधारी मंडळी विधानसभा निवडणुकीत बाहेर आली असून, कारखान्याच्या प्रशासकीय यंत्रणेकडून नवीन नियमावलीनुसार गट कसे तयार होणार, कोणत्या गटात किती संख्या ठेवायची, याविषयीची माहिती गोळा करण्यास सुरू झाली आहे. ‘गोकुळ’वर परिणाम नाहीकोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाचे संचालक मंडळ मुळातच अठरांचे आहे. त्यामुळे संघाच्या पोटनियम दुरुस्ती सभेत ही संख्या २१ पर्यंत नेण्याची मागणी झाली; पण सत्तेतील वाटेकरी वाढविण्याची मानसिकता नेत्यांसह कारभारी संचालकांचीही नसल्याने ही संख्या अठराच राहिली. आगामी वर्षभरात होणार या कारखान्यांच्या निवडणुका दूधगंगा-वेदगंगा, भोगावती, छत्रपती राजाराम, डॉ. डी. वाय. पाटील, कुंभी-कासारी. असे राहणार साखरकारखान्यांचे संचालक मंडळ १५ सर्वसाधारण सदस्य 0१ संस्था प्रतिनिधी0१ अनुसूचित जाती/जमाती 0१ इतर मागासवर्गीय0१ भटक्या विमुक्त जाती/जमाती 0२ महिला राखीवजिल्हा बँकेचे संचालक मंडळ १२ प्रत्येक तालुक्याचा एक प्रतिनिधी0२ महिला प्रतिनिधी0१ अनुसूचित जाती/जमाती0१ इतर मागासवर्गीय0१ भटक्या विमुक्त जाती/ जमाती0२ दूध संस्था, पाणीपुरवठा, साखर कारखान्यांसह इतर गटांतूनजिल्हा बँकेचे संचालक मंडळ १२ प्रत्येक तालुक्याचा एक प्रतिनिधी0२ महिला प्रतिनिधी0१ अनुसूचित जाती/जमाती0१ इतर मागासवर्गीय0१ भटक्या विमुक्त जाती/ जमाती0२ दूध संस्था, पाणीपुरवठा, साखर कारखान्यांसह इतर गटांतून