शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

नेत्यांनी सभ्य भाषा वापरावी

By admin | Updated: June 23, 2015 00:37 IST

उदय नारकर यांची टीका : मुश्रीफ-शेट्टी यांच्यातील वाद

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी हे कोल्हापूर जिल्ह्यातील सन्मान्य लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी राजकीय आरोप-प्रत्यारोप करताना सभ्य भाषा वापरावी, असे आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सचिव उदय नारकर यांनी निवेदनाद्वारे केले आहे.रविवारी शेट्टी यांनी मुश्रीफ यांना श्वान म्हटले, तर मुश्रीफ यांनी शेट्टी यांना कोल्हा म्हटले. त्या पार्श्वभूमीवर नारकर यांनी हे निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. त्यात म्हटले आहे की, जनतेच्या प्रेमाच्या बळावर गेली अनेक वर्षे हे दोन्ही नेते राज्याच्या आणि देशाच्या प्रतिनिधीगृहांत प्रतिनिधित्व करत आहेत. जनतेला त्यांच्याकडून अनेक अपेक्षा आहेत. या प्रतिनिधींनी जनतेच्या सभ्यतेचे प्रतिनिधित्व करावे, ही अपेक्षाही त्यात आहे; पण एकमेकांवर राजकीय कुरघोडी करण्याच्या नादात या दोन्ही नेत्यांनी सभ्यतेचे सर्व संकेत पायदळी तुडवण्याचेच ठरवले आहे की काय? अशी शंका येऊ लागली आहे. या दोन नेत्यांमध्ये सध्या सुरू असलेली शेरेबाजी हीनतेचे सवंग प्रदर्शन करणारी आहे. अशा प्रकारच्या शिवराळ भाषेमुळे क्षणिक मनोरंजन होईलही; पण त्यातून ‘लोकप्रतिनिधी’ या पदाचा अवमान होतो, हे या प्रतिनिधींनी लक्षात घ्यावे. हे दोघेही संसदीय संकेतांचे जाणकार आहेत. लोकशाही कामकाजात असंसदीय शब्द वापरू नयेत, अशी प्रथा असते. संसदेने आपल्या वर्तनाने जनतेसमोर लोकशाही आदर्श प्रस्थापित करायचा असतो. त्यानुसार सार्वजनिक जीवनातून आणि विशेषत: राजकीय जीवनातून असंसदीय शब्द कटाक्षाने दूर ठेवले पाहिजेत. या सन्माननीय नेत्यांनी परस्परांना प्राणिसंग्रहालयाच्या पिंजऱ्यात ठेवून वाकुल्या दाखवण्याचे काम थांबवावे. लोकशाहीत राजकारण ही वैयक्तिक बाब नसते. शाहू महाराजांचा वारसा सांगणाऱ्यांनी याचे भान ठेवावे. या दोघांपैकी एकाने तरी येथून पुढे राजकारणाचा स्तर खालावणार नाही, यासाठी पुढाकार घ्यावा. लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी या आवाहनाला कोण प्रतिसाद देईल, हे पाहण्यासाठी जनताही उत्सुक आहे, असेही निवेदनात म्हटले आहे. (प्रतिनिधी)