शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

बगलबच्च्यांना सत्ता देण्यासाठीच नेत्यांची धडपड--शेतकरी संघ निवडणूक रणधुमाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2015 00:55 IST

पी. डी. पाटील यांचा आरोप : विकासाचा अजेंडा नाही; मोहिते-नेसरीकरांच्या स्वप्नातील संघ उभारू

राजाराम लोंढे - कोल्हापूर  शेतकरी संघाची सध्याच्या परिस्थिती नाजूक आहे, यामधून संघाला बाहेर काढण्यासाठी सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांकडे कोणताही अजेंडा नाही. केवळ संघाला राजकीय अड्डा बनविण्यासाठी व बगलबच्यांना सत्ता देण्यासाठीच या मंडळींना सत्ता हवी असल्याचा आरोप संघाचे माजी अध्यक्ष पी. डी. पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. तात्यासाहेब मोहिते व बाबा नेसरीकर यांच्या स्वप्नातील संघाला गतवैभव मिळवून देण्यासाठी जिवाचे रान करू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. पाटील म्हणाले, संघाची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्नशील राहिलो; पण नेत्यांच्या डोक्यात काही वेगळेच होते. त्यांनी सवयीप्रमाणे शेवटपर्यंत झुलवत ठेवले. राजकीय द्वेषापोटी आम्हा मंडळींना त्यांनी बाजूला ठेवले असेल, पण ज्या घराण्याने संघाच्या उत्कर्षासाठी जिवाचे रान केले, त्या मोहिते घराण्याला बाजूला करण्यामागचा हेतूच समजला नाही. आतापर्यंत संघात कधीही राजकीय हस्तक्षेप झाला नाही. केवळ राजकीय हेतूने संघ ताब्यात घेण्यासाठी नेत्यांची धडपड सुरू असल्यामुळे सभासदांनी आम्हाला पॅनेल करण्याचा रेटा लावला. निवडणूक लागण्यासारखी संघाची परिस्थिती नव्हती, भविष्य निर्वाह निधीची गुंतवणूक चुकीची झाल्याने त्यामध्ये ४० ते ५० लाखांचा दुरावा आहे. कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे केल्याने तो ५० लाख फरक द्यावा लागणार आहे. संघाकडील शिल्लक पाहिली तर सध्या व्यवहार सुरळीत चालण्यासाठी चार कोटींची गरज आहे. सभासदांची संघावर कमालीची श्रद्धा आहे. आम्ही सत्तेवर असताना कर्जामुळे संघ शॉर्टमार्जिनमध्ये केला, त्यावेळी सभासदांनी घरी बोलावून आमच्याकडे ठेवी ठेवल्या. शेतकरी, ग्राहकांच्या हितासाठी संघ वाचणे गरजेचे आहे. संघ ही मार्केटिंग संस्था आहे, व्यवसाय वाढला तरच नफा वाढेल. त्यासाठी नियोजन करावे लागेल. सत्तेत आल्यानंतर जिवाचे रान करून संघाला गतवैभव मिळवून देवू. विरोधी पॅनेलमध्ये संघ वाचवून चालविण्यासाठी कोणतीही दूरदृष्टी नाही. संघाचा राजकीय अड्डा करण्यासाठीच विरोधकांना सत्ता हवी आहे, पण सभासद जाणकार व सूज्ञ आहेत. या मंडळींचा हेतू त्यांनी ओळखला असून मतपेटीद्वारे त्यांचे मनसुभे उद्ध्वस्त करतील, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला. नेतृत्व नसल्यानेच मोहितेंना निमंत्रणसंघ चालविण्याची क्षमता नसणारे उमेदवार पाहून वसंतराव मोहिते बाजूला झाले. मोहिते यांना स्वीकृत म्हणून घेऊन त्यांच्याकडे संघाचा कारभार सोपविण्याची तयारी हसन मुश्रीफ यांनी दाखविली आहे. त्यावरून त्यांच्याकडे संघ चालविण्यासाठी सक्षम नेतृत्व नसल्याचे स्पष्ट झाले आहे, असा टोलाही पाटील यांनी हाणला. मग व्यक्तिगत प्रचार का?  सत्तारूढ पॅनेलमधील उमेदवारांना एकमेकांवर विश्वास नाही. त्यांच्यात कमालीची संभ्रमावस्था असून त्यांनी व्यक्तिगत प्रचार सुरू केल्याची टीका पी. डी. पाटील यांनी केली. संघाचा ‘बैल’ धावेल ‘बैल’ हे श्रमाचे व प्रामाणिकतेचे प्रतीक आहे. संघाचा बैल अशक्त झाला आहे, आगामी पाच वर्षांत पुनर्वैभव मिळविल्यानंतर बैल धावू लागेल, असे पाटील म्हणाले. सत्ता द्या हे करतो....आर्थिक शिस्त व नियोजनकाटकसरीचा व पारदर्शक कारभारशाखांना बळकट करून व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करणार.विक्री वाढीसाठी प्रयत्न कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावूगोठवलेले पगार पूर्ववत करण्यासाठी प्रयत्नशील(उद्याच्या अंकात : सत्तारुढ पॅनेलचे प्रमुख श्रीमती शोभना शिंदे-नेसरीकर व मानसिंगराव जाधव यांची भूमिका)कोल्हापूरच्या सहकारी चळवळीतील नावाजलेली संस्था अशी ओळख असलेल्या शेतकरी सहकारी संघाची निवडणूक शुक्रवारी (दि. २५) होत आहे. त्यानिमित्त रिंगणातील दोन्ही प्रमुख पॅनेल प्रमुखांच्या मुलाखती आजपासून...