शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

नेत्यांना कुरघोडीचे राजकारण अंगलट

By admin | Updated: May 6, 2015 00:17 IST

पाय खेचाखेची : आत्मपरीक्षणाची वेळ

गणपती कोळी - कुरुंदवाड -शिरोळ राजकीयदृष्ट्या सुज्ञ व क्रांतिकारी समजला जातो; मात्र ‘कोजिमाशि’ व ‘गोकुळ’च्या निवडणुकीत शिरोळ-हातकणंगले तालुक्यांतील सत्ताधारी व विरोधी उमेदवारांचा पराभव करण्यात दोन्ही तालुके पिछाडीवर राहिले आहेत. निर्णायक मतदार असतानाही एकमेकांचे पाय खाली खेचण्याच्या वृत्तीमुळे राजकारण अंगलट आले आहे. त्यामुळे या निकालावरून आता तरी पूर्वेकडील नेते, कार्यकर्त्यांना आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.शिरोळ तालुका सामाजिक, शैक्षणिकतेबरोबर राजकीयदृष्ट्या सुज्ञ व सक्षम ओळखला जातो. त्यामुळे निवडणुकीत कितीही जातीयवादी राजकारण झाले, धनशक्तीचा वापर झाला, तरी चांगल्या उमेदवाराला मतदान करून आपला स्वाभिमान राखला आहे. त्यामुळे तालुक्याचे नाव दिल्लीपर्यंत पोहोचले आहे. असे असतानाही ‘कोजिमाशि’ व ‘गोकुळ’ निवडणुकीतून जिल्ह्याच्या राजकारणात तालुका पिछाडीवर असल्याचे सिद्ध झाले आहे.‘कोजिमाशि’ निवडणुकीत सत्ताधारी दादा लाड यांच्या विरोधात राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीने काट्याची टक्कर दिली. या निवडणुकीत हातकणंगले व शिरोळ तालुक्यात निर्णायक मतदार असल्याने दोन्ही आघाडीने सक्षम उमेदवार दिले होते. यामध्ये हातकणंगलेतून सत्ताधारीकडून धोंडिराम बाबर (रुकडी), संगीता मांगलेकर (मजले), तर विरोधी आघाडीतून सुरेश कोळी (इचलकरंजी) उमेदवार होते. शिरोळमधून सत्ताधारीकडून गौतम पाटील (कोथळी), आनंदराव काटकर (सैनिक टाकळी), तर विरोधी गटातून राजगोंडा झुणके (शिरदवाड), अशोक पलंगे (हेरवाड) हे उमेदवार होते.एकमेकांचे पाय ओढण्यात माहीर असलेले नेते, कार्यकर्त्यांच्या वृत्तीने या उमेदवारांचा बळी गेला. सत्ताधारी गटातील काटकरांचा निसटता विजय वगळता दोन्ही तालुक्यांतील दोन्ही पॅनेलच्या उमेदवारांचा पराभव झाला. याउलट कोल्हापूर, कागल, भुदरगड भागांतील नेते कार्यकर्त्यांनी गट-तट विसरून दोन्ही पॅनेलच्या उमेदवारांना मतदान करीत शिरोळ-हातकणंगले तालुक्याची जागाही आपल्याकडेच खेचत धूर्त राजकीय खेळी केली आहे.नेतृत्वही संपुष्टातगोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत शिरोळ व हातकणंगले तालुक्यांना एक जागा देत सत्ताधाऱ्यांकडून दिलीप पाटील, तर विरोधी गटातून भीमगोंडा बोरगावे उमेदवार होते. दोन्ही तालुक्यांना मिळून एक उमेदवार असतानाही दोनही उमेदवारांचा पराभव करीत गोकुळमधील या तालुक्याचे नेतृत्वही संपुष्टात आले आहे.राज्याच्या, देशाच्या राजकारणात दबदबा निर्माण करणाऱ्या या तालुक्यांना जिल्ह्याच्या राजकारणात अपयश आले आहे.आतातरी शहाणपण शिकणार का ?खुन्नशी वृत्तीतून एकमेकांचे पाय खेचण्याच्या कुरघोडीने राजकारण तालुक्याच्या अंगलट आले. त्यामुळे या निकालातून तालुक्यातील नेते, कार्यकर्ते आतातरी शहाणपण शिकणार का, असा प्रश्न सामान्य लोक करीत आहेत.