शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

नेत्यांना कुरघोडीचे राजकारण अंगलट

By admin | Updated: May 6, 2015 00:17 IST

पाय खेचाखेची : आत्मपरीक्षणाची वेळ

गणपती कोळी - कुरुंदवाड -शिरोळ राजकीयदृष्ट्या सुज्ञ व क्रांतिकारी समजला जातो; मात्र ‘कोजिमाशि’ व ‘गोकुळ’च्या निवडणुकीत शिरोळ-हातकणंगले तालुक्यांतील सत्ताधारी व विरोधी उमेदवारांचा पराभव करण्यात दोन्ही तालुके पिछाडीवर राहिले आहेत. निर्णायक मतदार असतानाही एकमेकांचे पाय खाली खेचण्याच्या वृत्तीमुळे राजकारण अंगलट आले आहे. त्यामुळे या निकालावरून आता तरी पूर्वेकडील नेते, कार्यकर्त्यांना आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.शिरोळ तालुका सामाजिक, शैक्षणिकतेबरोबर राजकीयदृष्ट्या सुज्ञ व सक्षम ओळखला जातो. त्यामुळे निवडणुकीत कितीही जातीयवादी राजकारण झाले, धनशक्तीचा वापर झाला, तरी चांगल्या उमेदवाराला मतदान करून आपला स्वाभिमान राखला आहे. त्यामुळे तालुक्याचे नाव दिल्लीपर्यंत पोहोचले आहे. असे असतानाही ‘कोजिमाशि’ व ‘गोकुळ’ निवडणुकीतून जिल्ह्याच्या राजकारणात तालुका पिछाडीवर असल्याचे सिद्ध झाले आहे.‘कोजिमाशि’ निवडणुकीत सत्ताधारी दादा लाड यांच्या विरोधात राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीने काट्याची टक्कर दिली. या निवडणुकीत हातकणंगले व शिरोळ तालुक्यात निर्णायक मतदार असल्याने दोन्ही आघाडीने सक्षम उमेदवार दिले होते. यामध्ये हातकणंगलेतून सत्ताधारीकडून धोंडिराम बाबर (रुकडी), संगीता मांगलेकर (मजले), तर विरोधी आघाडीतून सुरेश कोळी (इचलकरंजी) उमेदवार होते. शिरोळमधून सत्ताधारीकडून गौतम पाटील (कोथळी), आनंदराव काटकर (सैनिक टाकळी), तर विरोधी गटातून राजगोंडा झुणके (शिरदवाड), अशोक पलंगे (हेरवाड) हे उमेदवार होते.एकमेकांचे पाय ओढण्यात माहीर असलेले नेते, कार्यकर्त्यांच्या वृत्तीने या उमेदवारांचा बळी गेला. सत्ताधारी गटातील काटकरांचा निसटता विजय वगळता दोन्ही तालुक्यांतील दोन्ही पॅनेलच्या उमेदवारांचा पराभव झाला. याउलट कोल्हापूर, कागल, भुदरगड भागांतील नेते कार्यकर्त्यांनी गट-तट विसरून दोन्ही पॅनेलच्या उमेदवारांना मतदान करीत शिरोळ-हातकणंगले तालुक्याची जागाही आपल्याकडेच खेचत धूर्त राजकीय खेळी केली आहे.नेतृत्वही संपुष्टातगोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत शिरोळ व हातकणंगले तालुक्यांना एक जागा देत सत्ताधाऱ्यांकडून दिलीप पाटील, तर विरोधी गटातून भीमगोंडा बोरगावे उमेदवार होते. दोन्ही तालुक्यांना मिळून एक उमेदवार असतानाही दोनही उमेदवारांचा पराभव करीत गोकुळमधील या तालुक्याचे नेतृत्वही संपुष्टात आले आहे.राज्याच्या, देशाच्या राजकारणात दबदबा निर्माण करणाऱ्या या तालुक्यांना जिल्ह्याच्या राजकारणात अपयश आले आहे.आतातरी शहाणपण शिकणार का ?खुन्नशी वृत्तीतून एकमेकांचे पाय खेचण्याच्या कुरघोडीने राजकारण तालुक्याच्या अंगलट आले. त्यामुळे या निकालातून तालुक्यातील नेते, कार्यकर्ते आतातरी शहाणपण शिकणार का, असा प्रश्न सामान्य लोक करीत आहेत.