शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आघाडी कोकणवासियांच्या पाठीशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2017 00:41 IST

आघाडी कोकणवासियांच्या पाठीशी

लोकमत न्यूज नेटवर्कराजापूर : शेतकऱ्यांसह विविध प्रश्न हाताळण्यात हे शासन पूर्णपणे अपयशी ठरले असून, आघाडीच्या माध्यमातून आम्ही समस्त कोकणवासियांच्या पाठीशी ठाम उभे राहू, अशी ग्वाही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, आमदार सुनील तटकरे यांनी राजापूर येथील जवाहर चौकात आयोजित सभेत दिली.विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी, आरपीआय, समाजवादी पक्ष व शेकाप यांच्या संघर्ष यात्रेचे राजापुरात आगमन झाले. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असून, हे शासन शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला तयार नाही. त्याविरुध्द काँग्रेससह विरोधी पक्षांनी राज्यव्यापी संघर्ष यात्रा सुरु केली असून, अखेरच्या टप्प्यात तिचे आगमन राजापुरात झाले. या यात्रेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार अजित पवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे - पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे, आमदार भाई जगताप, जोगेंद्र कवाडे, आमदार हुस्नबानू खलिफे, काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते हरिश रोग्ये यांच्यासह अनेक आमदार उपस्थित होते.रत्नागिरीहून आलेल्या या संघर्ष यात्रेचे पाली, लांजा, ओणी, राजापूर तालीमनाका येथे आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात आले. त्यानंतर ती यात्रा जवाहर चौकात आली व त्याठिकाणी एक छोटीसी सभा झाली. त्यावेळी उपस्थिती अत्यल्प होती.सुरुवातीला आमदार हुस्नबानू खलिफे यांनी सर्वांचे स्वागत करून यात्रेचा हेतू विषद केला. त्यानंतर उपस्थितांमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांनी मार्गदर्शन केले. हे शासन कृषी, मत्य व्यवसाय, बागायती, महामार्ग अशा सर्वच क्षेत्रात अपयशी ठरले असून, आघाडी शासनाच्या काळात भात पिकाला चांगला भाव मिळायचा, शिवाय बोनसही दिला जात असे. मात्र, युती शासनाच्या काळात कोकणवासीयांची उपेक्षा झाली असल्याचे तटकरे म्हणाले.आघाडीच्या माध्यमातून आम्ही कोकणवासीयांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू व हे कोकण समृध्द व्हावे, यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यांची पाठचशेतकऱ्यांच्या प्रश्नावरून राज्यव्यापी काढण्यात आलेल्या संघर्ष यात्रेला इतरत्र चांगला प्रतिसाद लाभत असताना राजापुरात मात्र दोन्ही काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी व स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनीच या यात्रेकडे पाठ फिरवली. शहरवगळता तालुकाभरातून अल्प प्रतिसाद लाभला. काही पदाधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते. पण, त्यांनी दूर राहाणे पसंत केले. दोन्ही काँग्रेसचे जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य अनुपस्थित होते. त्यामुळे राजापुरात या यात्रेचा खूपच बोजवारा उडाला अशी चर्चा सर्वत्र सुरू होती.अनेक आमदार गाडीतचया यात्रेसाठी आलेल्या आमदारांपैकी प्रमुख आमदारच आलेल्या खासगी बसमधून उतरले, तर काही आमदार एअरकंडिशन गाडीत बसून राहिले. त्यामुळे हे आमदार नक्की कशासाठी आले होते? अशी चर्चा नंतर सुरू होती.