शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

गडहिंग्लजमध्ये नेते ‘सावध’..उमेदवार ‘संभ्रमात’..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2016 00:16 IST

नगरपालिका निवडणुका : एकमेकांच्या हालचालींवरच सर्वांचे ‘लक्ष्य’

राम मगदूम -- गडहिंग्लजगडहिंग्लजमध्ये उमेदवाराबरोबरच मतदारही संभ्रमात असून, नेते मात्र सावध आहेत. सर्वच राजकीय पक्ष व गटांनी एकमेकांवर लक्ष ठेवून हालचाली गतिमान केल्या आहेत. बेरीज-वजाबाकीच्या राजकारणामुळे संभाव्य उमेदवार संभ्रमात, तर नेते सावध, असे चित्र आहे. संभाव्य आघाड्यासाठीही उमेदवारी दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसाची वाट पाहावी लागणार आहे.गेल्या चार दशकांत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात कोण? सत्ताधाऱ्यांच्या बाजूने कोण? याचा अंदाज बांधणे सोपे होते. उघड हालचालींवरूनच त्यावेळी निवडणुकीतील संभाव्य उमेदवार आणि लढतीचे संभाव्य चित्र स्पष्ट होत आले. मात्र, सर्वार्थाने वेगळी ठरलेल्या या निवडणुकीचे सारे संदर्भच बदलून गेल्यामुळे पालिकेच्या राजकीय सारिपाटावर संभ्रमाचे ढग तयार झाले आहेत. गतवेळी तत्कालीन सत्ताधारी जनता दल-जनसुराज्य काँगे्रस यांच्या आघाडीविरुद्ध शहापूरकर गटाच्या सहकार्याने राष्ट्रवादीने आघाडी केली अन् सत्तांतरही घडविले. मात्र, काठावरील बहुमतामुळे मिळालेली सत्ता राष्ट्रवादीला पाच वर्षे टिकविता आली नाही. साडेतीन वर्षानंतर ‘राष्ट्रवादी’च्या सुंदराबाई बिलावरांच्या पाठिंब्यावर जनता दलाने पालिकेची सत्ता पुन्हा ताब्यात घेतली. त्यामुळे राष्ट्रवादी आणि जनता दल हे दोघेही यावेळी ‘सत्ताधारी भूमिकेत’ आहेत. ऐतिहासिक ठरलेले हे सत्तांतर संभ्रमावस्थेचे पहिले कारण आहे.दरम्यान, सहा महिन्यांपूर्वी झालेल्या गडहिंग्लज साखर कारखान्याच्या निवडणुकीत नगरपालिकेतील एकमेकांचे कट्टर विरोधक असणारे जनता दल व राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष नाट्यमयरीत्या एकत्र आले आणि त्यांच्या पॅनेलला यशही मिळाले. मात्र, ती ‘युती’ न रुचलेल्या राष्ट्रवादीच्या ‘काही’ नगरसेवकांची नाराजी आजअखेर कायम राहिली. त्याचे पडसाददेखील वेळोवेळी उमटले. त्यामुळेच पालिकेच्या निवडणुकीतील राष्ट्रवादी व जनता दलाची ‘बहुचर्चित’ युती अद्याप दृष्टिपथात नाही. किंबहुना, ती दुरापास्तही ठरली आहे, हे या संभ्रमावस्थेचे दुसरे कारण.गडहिंग्लज कारखाना निवडणुकीत मुश्रीफ-शिंदेच्या विरोधात ऐनवेळी एकत्र आलेले शहापूरकर व चव्हाण या दोघांनीही अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मात्र, त्यापूर्वीच ‘जनसुराज्य’चे माजी उपनगराध्यक्ष रमेश रिंगणे, तर आठवड्यापूर्वीच माजी नगराध्यक्ष वसंत यमगेकर हे देखील भाजपवाशी झाले आहेत. रिंगणे हे चव्हाणांचे सहकारी, तर यमगेकरांना शहापूरकरांनी भाजपमध्ये आणले आहे. नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवर रिंगणे व यमगेकर दोघांनीही दावा केल्यामुळे विरोधी ‘महाआघाडी’चे नेतृत्व असणाऱ्या भाजपमध्येच ‘पेच’ निर्माण झाला आहे. त्यामुळे शिवसेना व स्वाभिमानी या मित्रपक्षांसह तिसरा पर्याय देऊ इच्छिणाऱ्या ‘महाआघाडी’चे चित्रही अद्याप दृष्टिक्षेपात नाही, हे संभ्रमावस्थेचे तिसरे कारण आहे.