शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लजमध्ये नेते ‘सावध’..उमेदवार ‘संभ्रमात’..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2016 00:16 IST

नगरपालिका निवडणुका : एकमेकांच्या हालचालींवरच सर्वांचे ‘लक्ष्य’

राम मगदूम -- गडहिंग्लजगडहिंग्लजमध्ये उमेदवाराबरोबरच मतदारही संभ्रमात असून, नेते मात्र सावध आहेत. सर्वच राजकीय पक्ष व गटांनी एकमेकांवर लक्ष ठेवून हालचाली गतिमान केल्या आहेत. बेरीज-वजाबाकीच्या राजकारणामुळे संभाव्य उमेदवार संभ्रमात, तर नेते सावध, असे चित्र आहे. संभाव्य आघाड्यासाठीही उमेदवारी दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसाची वाट पाहावी लागणार आहे.गेल्या चार दशकांत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात कोण? सत्ताधाऱ्यांच्या बाजूने कोण? याचा अंदाज बांधणे सोपे होते. उघड हालचालींवरूनच त्यावेळी निवडणुकीतील संभाव्य उमेदवार आणि लढतीचे संभाव्य चित्र स्पष्ट होत आले. मात्र, सर्वार्थाने वेगळी ठरलेल्या या निवडणुकीचे सारे संदर्भच बदलून गेल्यामुळे पालिकेच्या राजकीय सारिपाटावर संभ्रमाचे ढग तयार झाले आहेत. गतवेळी तत्कालीन सत्ताधारी जनता दल-जनसुराज्य काँगे्रस यांच्या आघाडीविरुद्ध शहापूरकर गटाच्या सहकार्याने राष्ट्रवादीने आघाडी केली अन् सत्तांतरही घडविले. मात्र, काठावरील बहुमतामुळे मिळालेली सत्ता राष्ट्रवादीला पाच वर्षे टिकविता आली नाही. साडेतीन वर्षानंतर ‘राष्ट्रवादी’च्या सुंदराबाई बिलावरांच्या पाठिंब्यावर जनता दलाने पालिकेची सत्ता पुन्हा ताब्यात घेतली. त्यामुळे राष्ट्रवादी आणि जनता दल हे दोघेही यावेळी ‘सत्ताधारी भूमिकेत’ आहेत. ऐतिहासिक ठरलेले हे सत्तांतर संभ्रमावस्थेचे पहिले कारण आहे.दरम्यान, सहा महिन्यांपूर्वी झालेल्या गडहिंग्लज साखर कारखान्याच्या निवडणुकीत नगरपालिकेतील एकमेकांचे कट्टर विरोधक असणारे जनता दल व राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष नाट्यमयरीत्या एकत्र आले आणि त्यांच्या पॅनेलला यशही मिळाले. मात्र, ती ‘युती’ न रुचलेल्या राष्ट्रवादीच्या ‘काही’ नगरसेवकांची नाराजी आजअखेर कायम राहिली. त्याचे पडसाददेखील वेळोवेळी उमटले. त्यामुळेच पालिकेच्या निवडणुकीतील राष्ट्रवादी व जनता दलाची ‘बहुचर्चित’ युती अद्याप दृष्टिपथात नाही. किंबहुना, ती दुरापास्तही ठरली आहे, हे या संभ्रमावस्थेचे दुसरे कारण.गडहिंग्लज कारखाना निवडणुकीत मुश्रीफ-शिंदेच्या विरोधात ऐनवेळी एकत्र आलेले शहापूरकर व चव्हाण या दोघांनीही अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मात्र, त्यापूर्वीच ‘जनसुराज्य’चे माजी उपनगराध्यक्ष रमेश रिंगणे, तर आठवड्यापूर्वीच माजी नगराध्यक्ष वसंत यमगेकर हे देखील भाजपवाशी झाले आहेत. रिंगणे हे चव्हाणांचे सहकारी, तर यमगेकरांना शहापूरकरांनी भाजपमध्ये आणले आहे. नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवर रिंगणे व यमगेकर दोघांनीही दावा केल्यामुळे विरोधी ‘महाआघाडी’चे नेतृत्व असणाऱ्या भाजपमध्येच ‘पेच’ निर्माण झाला आहे. त्यामुळे शिवसेना व स्वाभिमानी या मित्रपक्षांसह तिसरा पर्याय देऊ इच्छिणाऱ्या ‘महाआघाडी’चे चित्रही अद्याप दृष्टिक्षेपात नाही, हे संभ्रमावस्थेचे तिसरे कारण आहे.