शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
2
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
3
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
4
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
5
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
6
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
7
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
8
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
9
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
10
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
11
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
12
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
13
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
14
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
15
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
16
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
17
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
18
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
19
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
20
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश

एलबीटी संदिग्धता कायम

By admin | Updated: March 19, 2015 00:17 IST

व्यापारीवर्गात नाराजी : अभ्यास कसला करणार?

कोल्हापूर : १ आॅगस्टपासून एलबीटी रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असला तरी व्यापारी मात्र नाराज आहेत. सरकारने दिलेला ‘शब्द’ फिरविला असून, चार महिन्यांची मुदत कशाला पाहिजे, असा सवाल व्यापाऱ्यांनी केला असून, संदिग्धता ठेवणे ही व्यापाऱ्यांची फसवणूक आहे, अशी भावनाही कोल्हापुरातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. भाजप-शिवसेना युतीने राज्यात आपले सरकार आले की पहिला निर्णय हा एलबीटी रद्दचा असेल असे आश्वासन व्यापाऱ्यांना दिले होते. त्यामुळे १ एप्रिलपासून एलबीटी रद्द होणार म्हणून बुधवारी फटाके फोडून आनंद व्यक्त करायचा बेत आखला होता; परंतु अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १ आॅगस्टपासून एलबीटी रद्द करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. शिवाय पर्याय काय असावेत यावर चार महिने अभ्यास करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. सरकारने व्यापाऱ्यांना आश्वासन दिले होते, त्यामुळे १ एप्रिलपासून कर रद्द होणे आवश्यक होते, परंतु तसे न झाल्याने आम्ही नाराज झालो आहोत. सरकारने या विषयात संदिग्धता ठेवल्याने व्यापारीवर्गात गोंधळ निर्माण झाला आहे. सरकारच्या विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण झाला आहे, असे व्यापारी महासंघाचे निमंत्रक सदानंद कोरगांवकर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे. एलबीटी पूर्ण रद्द करतो असे अर्थमंत्री म्हणालेले नाहीत. ‘व्हॅट’च्या पर्यायाचा त्यांनी उल्लेख केलेला नाही. पर्याय काय असावेत यावर अभ्यास करणार असल्याचे ते म्हणतात. मग गेल्या पाच महिन्यांपासून त्यांनी काय केले, असा सवालही कोरगांवकर यांनी उपस्थित केला आहे. काँग्रेससारखीच युती सरकारही री ओढत असल्याचे दिसून येत असल्याचे कोरगांवकर म्हणाले. (प्रतिनिधी)व्हॅटमध्ये वाढ हाच पर्याय : कापडिया व्यापाऱ्यांनी युतीचे सरकार निवडूून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी शब्द फिरवायला नको पाहिजे होता. ‘व्हॅट’चाच पर्याय असायला पाहिजे. त्याबाबत तातडीने निर्णय घ्यायला हवा होता, तो घेतला नाही. त्यामुळे या सरकारवर कसा विश्वास ठेवायचा, असा प्रश्न प्रदीपभाई कापडिया यांनी उपस्थित केला.‘फाम’च्या बैठकीत निर्णय : गायकवाडसरकारच्या आजच्या निर्णयामुळे सर्वच व्यापारी नाराच झाले असून, येत्या काही दिवसांत ‘फाम’ची बैठक होत आहे. त्यामध्ये पुढील काळात काय भूमिका घ्यायची हे ठरविले जाईल, असे सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष सुरेश गायकवाड यांनी सांगितले. १ एप्रिलपासून एलबीटी रद्द करण्याचे आश्वासन दिले होते. सरकारने व्यापाऱ्यांची फसवणूक केली आहे, असे गायकवाड म्हणाले. शहरातील व्हॅट नोंदीत व्यापारी - २० हजारएलबीटी भरणारे व्यापारी - ९७००एलबीटीचे मार्च २०१५ अखेर उद्दिष्ट - ९६ कोटी (पैकी १३ कोटी मुद्रांक शुल्क)आजअखेर एलबीटी वसूल - ८७ कोटी ८८ लाखयेत्या वर्षाचे एलबीटी उद्दिष्ट - ११० कोटी