शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
3
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
4
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
5
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
6
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
7
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट
8
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
9
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
10
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
11
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
12
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
13
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
14
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
15
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
16
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
17
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
18
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
19
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
20
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...

एलबीटी संदिग्धता कायम

By admin | Updated: March 19, 2015 00:17 IST

व्यापारीवर्गात नाराजी : अभ्यास कसला करणार?

कोल्हापूर : १ आॅगस्टपासून एलबीटी रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असला तरी व्यापारी मात्र नाराज आहेत. सरकारने दिलेला ‘शब्द’ फिरविला असून, चार महिन्यांची मुदत कशाला पाहिजे, असा सवाल व्यापाऱ्यांनी केला असून, संदिग्धता ठेवणे ही व्यापाऱ्यांची फसवणूक आहे, अशी भावनाही कोल्हापुरातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. भाजप-शिवसेना युतीने राज्यात आपले सरकार आले की पहिला निर्णय हा एलबीटी रद्दचा असेल असे आश्वासन व्यापाऱ्यांना दिले होते. त्यामुळे १ एप्रिलपासून एलबीटी रद्द होणार म्हणून बुधवारी फटाके फोडून आनंद व्यक्त करायचा बेत आखला होता; परंतु अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १ आॅगस्टपासून एलबीटी रद्द करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. शिवाय पर्याय काय असावेत यावर चार महिने अभ्यास करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. सरकारने व्यापाऱ्यांना आश्वासन दिले होते, त्यामुळे १ एप्रिलपासून कर रद्द होणे आवश्यक होते, परंतु तसे न झाल्याने आम्ही नाराज झालो आहोत. सरकारने या विषयात संदिग्धता ठेवल्याने व्यापारीवर्गात गोंधळ निर्माण झाला आहे. सरकारच्या विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण झाला आहे, असे व्यापारी महासंघाचे निमंत्रक सदानंद कोरगांवकर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे. एलबीटी पूर्ण रद्द करतो असे अर्थमंत्री म्हणालेले नाहीत. ‘व्हॅट’च्या पर्यायाचा त्यांनी उल्लेख केलेला नाही. पर्याय काय असावेत यावर अभ्यास करणार असल्याचे ते म्हणतात. मग गेल्या पाच महिन्यांपासून त्यांनी काय केले, असा सवालही कोरगांवकर यांनी उपस्थित केला आहे. काँग्रेससारखीच युती सरकारही री ओढत असल्याचे दिसून येत असल्याचे कोरगांवकर म्हणाले. (प्रतिनिधी)व्हॅटमध्ये वाढ हाच पर्याय : कापडिया व्यापाऱ्यांनी युतीचे सरकार निवडूून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी शब्द फिरवायला नको पाहिजे होता. ‘व्हॅट’चाच पर्याय असायला पाहिजे. त्याबाबत तातडीने निर्णय घ्यायला हवा होता, तो घेतला नाही. त्यामुळे या सरकारवर कसा विश्वास ठेवायचा, असा प्रश्न प्रदीपभाई कापडिया यांनी उपस्थित केला.‘फाम’च्या बैठकीत निर्णय : गायकवाडसरकारच्या आजच्या निर्णयामुळे सर्वच व्यापारी नाराच झाले असून, येत्या काही दिवसांत ‘फाम’ची बैठक होत आहे. त्यामध्ये पुढील काळात काय भूमिका घ्यायची हे ठरविले जाईल, असे सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष सुरेश गायकवाड यांनी सांगितले. १ एप्रिलपासून एलबीटी रद्द करण्याचे आश्वासन दिले होते. सरकारने व्यापाऱ्यांची फसवणूक केली आहे, असे गायकवाड म्हणाले. शहरातील व्हॅट नोंदीत व्यापारी - २० हजारएलबीटी भरणारे व्यापारी - ९७००एलबीटीचे मार्च २०१५ अखेर उद्दिष्ट - ९६ कोटी (पैकी १३ कोटी मुद्रांक शुल्क)आजअखेर एलबीटी वसूल - ८७ कोटी ८८ लाखयेत्या वर्षाचे एलबीटी उद्दिष्ट - ११० कोटी