शहरं
Join us  
Trending Stories
1
माल चाहिए क्या? ...वाला? विचारल्यानंतर ' ठेवून घ्या' असे खेवलकर यांनी दिले होते होकारार्थी उत्तर
2
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
4
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
5
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
6
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
7
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
8
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
9
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
10
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
11
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
12
भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश
13
चीनने पाकिस्तानला भेट दिली रस्त्यावरून धावणारी मेट्रो, रुळांची गरजच नाही, अशी आहेत आणखी वैशिष्ट्ये
14
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ
15
भारताचा विकास रोखण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांनी भारतीय कंपन्यांवर लादलेल्या निर्बंधांमुळे इराण संतापला
16
अर्ध वर्षं संपलं, पण अर्धं तर बाकी आहे! 'या' सवयी बदला- डिसेंबर २०२५ पर्यंत बदलेल जगणं
17
'आयुष्मान भारत योजना फसवी' मुंबईतील महिलेची सरकारी योजनेवर टीका, सांगितला धक्कादायक अनुभव
18
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
19
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?
20
August Horoscope 2025: ऑगस्टमध्ये 'या' ६ राशींच्या वाट्याला येणार राजसी थाट; बाकी राशींचे काय?

एलबीटीचा वाद पुन्हा उफाळणार?

By admin | Updated: October 26, 2014 23:28 IST

निवडणुकीमध्ये प्रचाराचा मुद्दा : व्यापारी पुन्हा आंदोलनाच्या तयारीत

सांगली : निवडणुकीची रणधुमाळी आता संपली आहे. परंतु प्रचारादरम्यान एलबीटीचा मुद्दा प्रमुखपणे चर्चेत आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभांमधून एलबीटीची ‘लूटो बाटो टेक्निक’ अशी खिल्ली उडविली होती. तसेच सत्ता दिल्यास एलबीटी रद्द करण्याचेही जाहीर केले होते. राज्यात सत्तांतर झाले असून, दिलेल्या शब्दाला जागून आता नव्या सत्ताधाऱ्यांनी त्वरित एलबीटी रद्द करावा, अशी मागणी व्यापारी वर्गातून होत आहे. भविष्यातील संभाव्य धोके लक्षात घेऊन आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्यासाठी दि. ४ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे व्यापाऱ्यांच्या राज्यव्यापी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सत्ताधाऱ्यांनीदेखील या प्रश्नाचे घोंगडे भिजत ठेवल्यास व्यापारी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरण्याची चिन्हे आहेत.महापालिकेने मागील सहा महिन्यांपासून कठोर भूमिका घेऊन व्यापाऱ्यांकडून एलबीटीची वसुली जोरात सुरू केली आहे. आतापर्यंत एलबीटी वसुलीमुळे मनपाच्या तिजोरीत चाळीस कोटींची भर पडली आहे. मनपाकडे एलबीटी वसुलीसाठी एक अधीक्षक, आठ निरीक्षकांसह ८५ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. परंतु विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच कर्मचारी निवडणूक कामासाठी गेल्याने मनुष्यबळाअभावी वसुली मोहीम तात्पुरती थांबविण्यात आली होती. थांबविण्यात आलेली मोहीम भविष्यात सुरूकरण्यात येऊ नये, अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे. एलबीटीला व्यापाऱ्यांचा प्रथमपासूनच विरोध आहे. मतांचे गणित लक्षात घेऊन तत्कालीन विरोधी पक्ष असलेल्या भाजपने सत्तेवर येताच एलबीटी रद्द करणार असल्याचे आश्वासन व्यापारी बांधवांना दिले होते. सध्या भाजप बहुमताच्या जवळ गेला आहे. त्यामुळे आता सत्तेवर येताच भाजप काय भूमिका घेणार याकडेच साऱ्या व्यापाऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. सध्या महाराष्ट्रातील २५ महापालिकांमध्ये एलबीटी कायदा लागू करण्यात आला आहे. नव्या सरकारने सत्तेवर येताच मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रथम एलबीटी रद्द करण्याची घोषणा करावी. ज्यावेळीपासून हा कायदा लागू करण्यात आला, त्यावेळेपासून व्यापाऱ्यांनी भरणा केलेल्या कराची रक्कम त्यांना परत मिळावी, अशी मागणी एलबीटी विरोधी कृती समितीने केली आहे. मनपाने एलबीटीची थांबवलेली वसुली पुन्हा सुरू केल्यास व्यापाऱ्यांनीदेखील एकीची हाक दिली आहे. (प्रतिनिधी)सत्तेवर येताच एलबीटी रद्द करण्याचे लेखी आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच आमच्या शिष्टमंडळाला दिले आहे. दिवाळीपर्यंत महापालिकेने एलबीटी वसुली थांबवून आम्हाला चांगले सहकार्य केले आहे. यापुढेही त्यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा आहे. - समीर शहा, व्यापारीभाजपने आश्वासन दिल्याप्रमाणे एलबीटीच्या जोखडातून व्यापाऱ्यांची सुटका करावी. मंत्रिमंडळ स्थापन झाल्यावर व्यापाऱ्यांचे शिष्टमंडळ सत्ताधाऱ्यांना जाऊन भेटणार आहे. मनपाने नव्या सत्ताधाऱ्यांशी चर्चा करूनच एलबीटीबाबत निर्णय घ्यावा. - मनोहर सारडा, अध्यक्ष चेंबर आॅफ कॉमर्स, सांगली. समितीच्या मागण्या एलबीटी करवसुली त्वरित बंद करावीपंतप्रधानांनी एलबीटी रद्द करण्याचा दिलेला शब्द पाळावासांगलीच्या नवनिर्वाचित आमदारांनी एलबीटीविरोधात आवाज उठवावावेळप्रसंगी व्यापाऱ्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरणारकारवाई सुरूच राहणारमहापालिकेचे एलबीटी अधीक्षक एस. जी. मुजावर म्हणाले की, मध्यंतरी काही काळ थांबलेली एलबीटीची वसुली लवकरच शहरातील व्यापाऱ्यांकडून करण्यात येणार आहे.