शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

न्यायालयाच्या आवारात प्रवेश न दिल्याने वकील, पक्षकारांचा गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 16:39 IST

CoronaVirus Court Kolhapur- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याच्या पार्श्वभूमीवर अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी मंगळवारी सकाळी वकील व पक्षकारांनाच जिल्हा न्यायालयाच्या आवारात प्रतिबंध केल्याने प्रवेशद्वारावरच काहीकाळ गोंधळ माजला. सुमारे दिड तास प्रवेशद्वारावर मोठी गर्दी झाली होती, आवाराबाहेर वकीलांच्या वाहनांच्या रांगा लागल्याने चौकात वाहतुकीची कोंडी झाली होती. अखेर साडेबाराला वकिलांची थर्मल तपासणी करत न्यायालयाच्या आवारात टप्पटप्याने प्रवेश देण्यात आला. आज,बुधवारपासून जिल्हा व सत्र न्यायालय आणि त्यांच्या अधिपत्याखालील सर्व तालुका न्यायालयात फक्त तातडीची व रिमांड प्रकारणाचे कामकाज चालणार आहे.

ठळक मुद्देन्यायालयाच्या आवारात प्रवेश न दिल्याने वकील, पक्षकारांचा गोंधळ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बध : फक्त तातडीची कामेच चालणार; दोन सत्रात कामकाज

कोल्हापूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याच्या पार्श्वभूमीवर अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी मंगळवारी सकाळी वकील व पक्षकारांनाच जिल्हा न्यायालयाच्या आवारात प्रतिबंध केल्याने प्रवेशद्वारावरच काहीकाळ गोंधळ माजला. सुमारे दिड तास प्रवेशद्वारावर मोठी गर्दी झाली होती, आवाराबाहेर वकीलांच्या वाहनांच्या रांगा लागल्याने चौकात वाहतुकीची कोंडी झाली होती. अखेर साडेबाराला वकिलांची थर्मल तपासणी करत न्यायालयाच्या आवारात टप्पटप्याने प्रवेश देण्यात आला. आज,बुधवारपासून जिल्हा व सत्र न्यायालय आणि त्यांच्या अधिपत्याखालील सर्व तालुका न्यायालयात फक्त तातडीची व रिमांड प्रकारणाचे कामकाज चालणार आहे.कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील सर्व न्यायालयीन कामकाज आज, बुधवारपासून पुढील आदेश येईपर्यत सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यत तसेच दुपारी १.३० ते ३.३० या कालावधीत दोन सत्रातच चालणार असल्याचे जाहीर केले. या दोन सत्रात फक्त तातडीची प्रकरणे तसेच रिमांड प्रकरणाची कामे चालणार आहेत.

दरम्यान, कार्यालयीन वेळही सकाळी १०.३० ते दुपारी ४ वाजोपर्यत राहणार आहे. न्यायालयात प्रत्येक दिवशी ५० टक्के कर्मचारी उपस्थित ठेवण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश वृषाली जोशी यांनी काढले. न्यायालयातील अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी तातडीची प्रकरणे वगळून अन्य प्रकरणात पुढील तारखा देण्यात येत आहेत. शनिवारी कामकाज बंद राहणार आहे. कॅन्टीन बंद ठेवले आहे.या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी ११ वाजता वकील, पक्षकार यांना न्यायालयाच्या मुख्य प्रवेद्वारावरच आडवले. त्यामुळे प्रवेशद्वारावरच मोठी मर्दी झाली. बाहेर रस्त्यावर वकीलांच्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे प्रवेशद्वारावरच काही काळ गोंधळ माजला होता. दुपारी साडेबारा वाजता प्रत्येक वकीलांच्या कामकाजाबाबत खात्री करुनच त्यांना सॅनीटायझर करुनच न्यायालय आवारात प्रवेश देण्यात आला.

पक्षकारांना मात्र प्रवेश नाकारला. उच्च न्यायालयाने पाठवलेल्या नियमावलींचे आज, बुधवारपासून काटेकोर अंमलबजावणी करणार असल्याची माहिती महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनचे सदस्य ॲड. विवेक घाटगे व जिल्हा बार असो.चे अध्यक्ष रजणीत गावडे यांनी पत्रकारांना दिली. 

टॅग्स :Courtन्यायालयkolhapurकोल्हापूर