शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

उद्घाटनापासून वकील अलिप्त राहणार

By admin | Updated: February 6, 2016 00:37 IST

खंडपीठ प्रश्न : अ‍ॅड. राजेंद्र चव्हाण यांची माहिती; ‘न्यायसंकुल’चा उद्या कार्यक्रम

कोल्हापूर : गेली ३० वर्षे मुंबई उच्च न्यायालयाचे ‘सर्किट बेंच’ कोल्हापुरात स्थापन करण्याची मागणी शासनदरबारी प्रलंबित आहे. त्यामुळे उद्या, रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी मुख्य न्यायमूर्ती विजया ताहिलरमाणी यांच्या हस्ते होणाऱ्या ‘न्यायसंकुल’च्या उद्घाटन कार्यक्रमापासून वकील व पक्षकार अलिप्त राहणार आहेत, अशी माहिती खंडपीठ कृती समितीचे निमंत्रण अ‍ॅड. राजेंद्र चव्हाण यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली. गेली ३० वर्षे कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व सोलापूर या सहा जिल्ह्यांतील वकिलांच्या संघटना मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन होण्यासाठी लढत आहेत. सहा जिल्ह्यांतील वकिलांनी दि. २९ आॅगस्ट २०१२ पासून बेमुदत ‘काम बंद’ आंदोलन केले होते. हे आंदोलन सलग ५५ दिवस सुरू राहिले. तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विनंतीला मान देत कृती समितीने ५५ दिवसांपासून सुरू असलेले ‘बेमुदत काम बंद’ आंदोलन मागे घेतले. त्यानंतर न्यायमूर्ती शहा यांनी त्रिसदस्यीय समितीची नियुक्ती केली. तत्कालीन मुख्यमंत्री चव्हाण यांनी सर्किट बेंचच्या प्रस्तावाला आर्थिक तरतुदींसह मंजुरी दिल्याचे सांगण्यात आले. मुंबईतील ‘अ‍ॅडव्होकेट्स असोसिएशन आॅफ वेस्टर्न इंडिया’च्या सदस्यांनी तशी शिफारसही केली. ३१ जानेवारीअखेर निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती शहा यांनी दिली होती; परंतु कोणताही निर्णय त्यांनी दिला नाही. त्यामुळे ‘सर्किट बेंच’प्रश्नी पुन्हा नव्या जोमाने लढा उभारण्याचा निर्णय जिल्हा बार असोसिएशनने घेतला. उच्च न्यायालयाच्या नकारात्मक प्रतिसादाच्या निषेधार्थ सहा जिल्ह्यांतील वकिलांनी ३० आॅगस्ट २०१४ रोजी एकदिवसीय लाक्षणिक बंद पाळून, त्या दिवसापासून लाल फिती लावून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दि. १६ डिसेंबर २०१४ रोजी केंद्रीय कायदामंत्री सदानंद गौडा यांच्याबरोबर दिल्ली येथे खंडपीठ कृती समितीच्या शिष्टमंडळाची बैठक झाली. सर्किट बेंचप्रश्नी १२ फेब्रुवारी २०१५ रोजी मुंबईत उपोषण करण्याचा निर्णय वकिलांनी घेतला; परंतु मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्किट बेंच स्थापनेसाठी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती शहा व राज्यपालांना पत्र दिल्याचे सांगितल्यामुळे हे आंदोलन स्थगित करण्यात आले. त्यानंतर वकिलांनी ११ एप्रिलच्या राष्ट्रीय लोकअदालतीवर बहिष्कार टाकला. त्यानंतर १७ एप्रिलला मुंबईतील आझाद मैदान येथे एक हजार वकिलांच्या उपस्थितीत लाक्षणिक उपोषण केले. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘सर्किट बेंच’ स्थापन करण्यासाठी मंत्रिमंडळामध्ये ठराव मंजूर करून तो उच्च न्यायालयास सादर केल्याचे कृती समितीला सांगितले; परंतु उच्च न्यायालयाने या प्रकरणी कोणताच ठोस निर्णय आजपर्यंत घेतला नाही. त्यामुळे संतप्त वकिलांनी सहा जिल्ह्यांतील न्यायालयीन कामकाजावर यापूर्वीच बहिष्कार टाकला होता. न्यायसंकुलाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री फडणवीस व मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी मुख्य न्यायमूर्ती ताहिलरमाणी उद्या, रविवारी कोल्हापुरात येत आहेत. ‘सर्किट बेंच’च्या प्रलंबित प्रश्नामुळे या कार्यक्रमापासून अलिप्त राहण्याचा निर्णय खंडपीठ कृती समितीने घेतल्याचे अ‍ॅड. चव्हाण यांनी सांगितले. (प्रतिनिधी)प्रभारी मुख्य न्यायमूर्तींची आज भेट घेणार सर्किट बेंच’प्रश्नी यापूर्वीच्या कोणत्याही न्यायालयीन कार्यक्रमात वकील व पक्षकार सहभागी झालेले नाहीत. त्यामुळे उद्या, रविवारी होणाऱ्या ‘न्यायसंकुला’च्या कार्यक्रमास वकील व पक्षकार उपस्थित राहणार नाहीत. खंडपीठ कृती समितीचे पदाधिकारी आज, शनिवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी मुख्य न्यायमूर्ती विजया ताहिलरमाणी यांची शासकीय विश्रामधामवर भेट घेणार आहेत. त्यानंतर रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ते भेट घेतील, असे अ‍ॅड. चव्हाण यांनी सांगितले.