शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

लोटेवाडीत प्राथमिक शाळेचे वर्ग मंदिरात

By admin | Updated: July 23, 2014 23:38 IST

ग्रामस्थांच्या आडमुठ्या धोरणामुळे

गारगोटी : गेली सात वर्षे लोटेवाडी (ता. भुदरगड) येथील प्राथमिक शाळेत स्वत:ची इमारत असतानाही ग्रामस्थांच्या आडमुठ्या धोरणामुळे विद्यार्थ्यांचा वर्ग मंदिरात भरवण्यात येत आहे.येथील प्राथमिक शाळेसाठी २००६-०७ साली सर्व शिक्षण अभियानातून पाच लाख ५० हजार रुपये खर्चून तीन खोल्यांचे षटकोणी शाळा बांधण्यात आली. पूर्वीची मध्यवस्तीतील शाळा व नव्याने बांधलेली शाळा या दोन्हीत सुमारे २५० फूट अंतर आहे. या अंतरात काही शेतकऱ्यांची शेती आहे. उन्हाळ्यात ही शेती रिकामी असते, पण पावसाळ्यात या शेतात भात पीक घेतले जाते. जून ते डिसेंबरअखेर शेतात पीक असल्याने रस्ता बंद होतो व विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नाही. त्यामुळे सहा महिने नाईलाजास्तव विद्यार्थ्यांची शाळा मंदिरात भरवावी लागते. याचा त्रास शिक्षक व विद्यार्थ्यांना सहन करावा लागतो.येथे पाचवी ते सातवीपर्यंतचे वर्ग भरवण्यात येतात. सुमारे दीडशे विद्यार्थी व सहा शिक्षक आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप व नवोदयमध्ये प्रवेश मिळवला आहे. अशा नावाजलेल्या शाळेला वर्ग उपलब्ध असतानाही केवळ काही शेतकऱ्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे गेली सात वर्षे त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळा सुरू झाला की त्यांना मंदिर व अंगणवाडीचा आधार घ्यावा लागतो. ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामशिक्षण समिती शिक्षक व पालकांना रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन देतात. मात्र, कार्यवाही शून्य आहे.सभापती वैशाली घोरपडे व उपसभापती विश्वनाथ कुंभार यांच्याशी याबाबत विचारणा केली असता, ते म्हणाले, या शाळेच्या रस्त्याबाबत शेतकरी व पालक यांच्यात चर्चा घडवून सामोपचाराने सर्वमान्य तोडगा काढला जाईल. मात्र, तोडगा न निघाल्यास नाईलाजास्तव कायदेशीर बाबींचा आधार घेऊन शाळेचा मार्ग लवकरात लवकर खुला केला जाईल. त्यावेळी कोणाचीही गय केली जाणार नाही. हा मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न असल्याने तो सर्वांच्या जिव्हाळ्याचा आहे.