शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

‘शाहू’चा गत हंगामासाठी २७५० रुपये अंतिम दर

By admin | Updated: July 23, 2014 23:50 IST

२०१३-१४ साठीही लवकरच दुसरा हप्ता जाहीर

कागल : कागल येथील छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याने गत २०१२-२०१३ च्या हंगामात गळितास आणखी ५० रुपये प्रतिटन दर जाहीर केला आहे. त्यामुळे गत हंगामाचा अंतिम दर २७५० रुपये झाला आहे.विविध ऊस जातींसाठी दिलेले प्रतिटन ७० आणि १२० रुपये यांचा विचार करता ऊसदर २८२० ते २८७० रुपये झाला आहे. तसेच २०१३-१४ साठीही लवकरच दुसरा हप्ता जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती कारखान्याचे संचालक समरजितसिंह घाटगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपाध्यक्ष एस. के. मगदूम, कार्यकारी संचालक विजय औताडे, संचालक अमरसिंह घोरपडे, बॉबी माने, विजयसिंह जाधव, टी. ए. कांबळे, आदी उपस्थित होते.सन २०१२-१३ साठी आलेल्या उसाला यापूर्वी २७०० रुपये प्रतिटन अदा केलेले आहेत. त्या हंगामात ८६०३२ या ऊस जातीला प्रतिटन ७० रुपये, तर ६७१ या ऊस जातीसाठी १२० रुपये जादा दर दिला आहे. अंतिम हप्त्याची रक्कम प्रतिटन ५० रुपयेमधून भागविकास निधी वजा जाता ३५ रुपयांप्रमाणे होणारी दोन कोटी ५२ लाख ४८ हजार रुपये रक्कम ३० जुलै २०१४ रोजी बॅँकेत वर्ग केली जाणार आहे. २७५० रुपये हा ऊसदर राज्यात सर्वाधिक आहे. याचबरोबर गत गळीत हंगाम २०१३-१४ साठीही ऊस जात अनुदान आणि १०० टक्के ऊसपुरवठा करणाऱ्यांसाठी प्रतिटन ५० रुपये अनुदानाची घोषणा सर्वसाधारण सभेत विक्रमसिंह राजेंनी केली होती. त्यानुसार अनुदानाची रक्कम चार कोटी पाच लाख ८७ हजार रुपये ही ऊस उत्पादकांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. १०० टक्के ऊसपुरवठा करणारे सर्वसाधारण ९२०० इतके शेतकरी असून, त्यापैकी २ लाख ५२ हजार मेट्रिक टन उसासाठी १ कोटी २६ लाख रुपये अदा केलेले असून उर्वरित १ लाख टनासाठी असे अनुदान वाटप करण्यात येणार आहे. या गतसाली झालेल्या ऊस हंगामासाठी पहिला हप्ता २४०० रुपये, ऊस जात अनुदान ७० ते १२० रुपये आणि १०० टक्के ऊसपुरवठा अनुदान ५० रुपये असा २५२० ते २५७० रुपये याप्रमाणे दर दिला असून, लवकरच दुसऱ्या हप्त्याची घोषणा करण्यात येईल, असे समरजितसिंह घाटगे यांनी स्पष्ट केले.नवीन साखर कारखान्यांना शुभेच्छा...नवीन साखर कारखान्यांना शुभेच्छा...मंत्री हसन मुश्रीफ यांचा संताजी घोरपडे कारखाना यावर्षी सुरू होत आहे. संजय घाटगे यांनीही ‘खांडसरी’ची घोषणा केली आहे. या प्रश्नावर समरजितसिंह घाटगे म्हणाले की, त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत; कारण शाहू दूध संघ चालविताना आलेला अनुभव मोठा आहे. उद्योग-व्यवसाय म्हणून पाहिले तर स्पर्धा ही अटळ आहे. छत्रपती शाहू साखर कारखान्यावर आणि राजेंवर विश्वास असणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे आमच्या कारखान्याला स्पर्धेची चिंता नाही.