शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

‘शाहू’चा गत हंगामासाठी २७५० रुपये अंतिम दर

By admin | Updated: July 23, 2014 23:50 IST

२०१३-१४ साठीही लवकरच दुसरा हप्ता जाहीर

कागल : कागल येथील छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याने गत २०१२-२०१३ च्या हंगामात गळितास आणखी ५० रुपये प्रतिटन दर जाहीर केला आहे. त्यामुळे गत हंगामाचा अंतिम दर २७५० रुपये झाला आहे.विविध ऊस जातींसाठी दिलेले प्रतिटन ७० आणि १२० रुपये यांचा विचार करता ऊसदर २८२० ते २८७० रुपये झाला आहे. तसेच २०१३-१४ साठीही लवकरच दुसरा हप्ता जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती कारखान्याचे संचालक समरजितसिंह घाटगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपाध्यक्ष एस. के. मगदूम, कार्यकारी संचालक विजय औताडे, संचालक अमरसिंह घोरपडे, बॉबी माने, विजयसिंह जाधव, टी. ए. कांबळे, आदी उपस्थित होते.सन २०१२-१३ साठी आलेल्या उसाला यापूर्वी २७०० रुपये प्रतिटन अदा केलेले आहेत. त्या हंगामात ८६०३२ या ऊस जातीला प्रतिटन ७० रुपये, तर ६७१ या ऊस जातीसाठी १२० रुपये जादा दर दिला आहे. अंतिम हप्त्याची रक्कम प्रतिटन ५० रुपयेमधून भागविकास निधी वजा जाता ३५ रुपयांप्रमाणे होणारी दोन कोटी ५२ लाख ४८ हजार रुपये रक्कम ३० जुलै २०१४ रोजी बॅँकेत वर्ग केली जाणार आहे. २७५० रुपये हा ऊसदर राज्यात सर्वाधिक आहे. याचबरोबर गत गळीत हंगाम २०१३-१४ साठीही ऊस जात अनुदान आणि १०० टक्के ऊसपुरवठा करणाऱ्यांसाठी प्रतिटन ५० रुपये अनुदानाची घोषणा सर्वसाधारण सभेत विक्रमसिंह राजेंनी केली होती. त्यानुसार अनुदानाची रक्कम चार कोटी पाच लाख ८७ हजार रुपये ही ऊस उत्पादकांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. १०० टक्के ऊसपुरवठा करणारे सर्वसाधारण ९२०० इतके शेतकरी असून, त्यापैकी २ लाख ५२ हजार मेट्रिक टन उसासाठी १ कोटी २६ लाख रुपये अदा केलेले असून उर्वरित १ लाख टनासाठी असे अनुदान वाटप करण्यात येणार आहे. या गतसाली झालेल्या ऊस हंगामासाठी पहिला हप्ता २४०० रुपये, ऊस जात अनुदान ७० ते १२० रुपये आणि १०० टक्के ऊसपुरवठा अनुदान ५० रुपये असा २५२० ते २५७० रुपये याप्रमाणे दर दिला असून, लवकरच दुसऱ्या हप्त्याची घोषणा करण्यात येईल, असे समरजितसिंह घाटगे यांनी स्पष्ट केले.नवीन साखर कारखान्यांना शुभेच्छा...नवीन साखर कारखान्यांना शुभेच्छा...मंत्री हसन मुश्रीफ यांचा संताजी घोरपडे कारखाना यावर्षी सुरू होत आहे. संजय घाटगे यांनीही ‘खांडसरी’ची घोषणा केली आहे. या प्रश्नावर समरजितसिंह घाटगे म्हणाले की, त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत; कारण शाहू दूध संघ चालविताना आलेला अनुभव मोठा आहे. उद्योग-व्यवसाय म्हणून पाहिले तर स्पर्धा ही अटळ आहे. छत्रपती शाहू साखर कारखान्यावर आणि राजेंवर विश्वास असणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे आमच्या कारखान्याला स्पर्धेची चिंता नाही.