शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

शाहूकालीन घाट मोजतोय अखेरच्या घटका

By admin | Updated: August 12, 2016 00:06 IST

कृष्णातीरी संस्थानिक वास्तू : गैरसोयींमुळे भाविकांतून नाराजीचा सूर; लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे प्रश्न प्रलंबित

संतोष बामणे-- जयसिंगपूर -उदगाव (ता. शिरोळ) येथील जागृत श्री रामलिंग देवस्थान हे मंंदिर अकराव्या शतकातील असून, कृष्णा नदीकाठावर शाहूकालीन दगडी प्रशस्त घाट आहे. मात्र, या घाटाला सध्या अवकळा आली आहे. अनेक वर्षांपासून हा सुधारण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. दरम्यान, कन्यागतच्या निधीतून येथील दत्त मंदिर व रामलिंग मंदिराला भेट देण्यासाठी हजारो भाविक येणार आहेत. त्यामुळे येथील गैरसोयींमुळे भाविकांतून नाराजीचा सूर उमटणार आहे. कोल्हापूर जिल्ह्याची हद्द उदगाव येथून सुरू होते. सांगली, सोलापूर, पुणे, सातारा, अहमदनगर, आदी जिल्ह्यांसह अनेक राज्यांतून नृसिंहवाडीला भाविक दाखल होणार आहेत. या भाविकांना प्रथम कृष्णातीरी स्नानाची सोय व्हावी, या अनुषंगाने येथे गैरसोयीचाच विळखा भाविकांना घ्यावा लागणार आहे. येथील पुरातन रामलिंग व दत्त मंदिर पश्चिम महाराष्ट्र देवस्थानच्या अखत्याराखाली असलेली मंदिरे आहेत. मात्र, त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे़ त्यामुळे येथे घाट असून, गैरसोय अशी अवस्था या घाटाची झाली आहे. कन्यागतच्या पार्श्वभूमीवर अकरा घाटांप्रमाणे याही घाटाला निधी उपलब्ध करणे गरजेचे होते़ मात्र, लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे हा प्रश्न प्रलंबित आहे. येथे इंदुमती सरकार यांचे निवासस्थान व राजर्षी शाहू महाराज यांचे हंगामी निवासस्थान आहे. या ठिकाणी घोड्याच्या पागा, बंगला, तालीम, घाट अशा वास्तू आहेत. सध्या त्याची इतिहासात व संस्थांनी काळात नोंद आहे. येथील रामलिंग व दत्त मंदिर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे नमूद असून, घाटाप्रमाणे याही मंदिराकडे समितीचे याकडे दुर्लक्ष आहे. येथील मंदिर हे श्री राम सीतेच्या शोधासाठी जात असताना या ठिकाणी वास्तव्य करून येथे महादेवाची स्थापना केली आहे. त्यामुळे शाहू महाराज यांनी या परिसराची जोपासना केली होती. उदगाव येथे शाहू काळात संस्थानी जकात नाका व धान्य कोठार होते. उदगाव हे सांगली-कोल्हापूर व मिरज-कोल्हापूर लोहमार्गावर असून, रेल्वे मार्गाचे काम चालू असताना रेल्वे मार्गाला वळण देऊन शाहू महाराज यांनी या मंदिराचा बचाव केला. त्या काळात मिरज येथील रानडे बंधूंनी घाट व दत्त मंदिर बांधले होते. मात्र, सध्या घाट व मंदिर दुरवस्थेत आहे.गेल्या काही वर्षांपासून रामलिंग व दत्त मंदिराचा घाट सुधारण्यासाठी ग्रामस्थांची मागणी होत आहे. सध्या लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे उदगावचे तिन्हीही घाट दुरवस्थेत आहेत. त्यामुळे कन्यागतच्या पार्श्वभूमीवर या घाटांचे बांधकाम होणे गरजेचे होते. मात्र, हे होऊ शकले नाही. त्यामुळे आता तरी लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे. - बाळासाहेब कोळी, अध्यक्ष उदगाव सेवा सोसायटीकृष्णा नदीकाठावरील उदगावच्या शाहूकालीन घाटाला सुसज्ज करण्यासाठी प्रस्ताव पाठविला आहे. हा घाट सुधारण्यासाठी वारंवार पाठपुरावा करीत आहे. येत्या काही दिवसांतच यासाठी चांगला निधी उपलब्ध करणार आहे. तसेच लवकरच हा घाट सुसज्ज करून नागरिकांच्या सेवेत देणार आहे. - राजू शेट्टी, खासदार