शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

अकरावी प्रवेशाचा अखेरचा दिवस

By admin | Updated: July 4, 2015 00:02 IST

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रत्यक्ष प्रवेश सुरू : पॉलिटेक्निकच्या अर्ज विक्री-स्वीकृतीला मुदतवाढ

कोल्हापूर : अकरावीच्या प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेला वेग आला आहे. अर्ज भरलेल्यांपैकी बहुतांश विद्यार्थ्यांनी शुक्रवारी दिवसभरात कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेसाठी आपला प्रवेश निश्चित केला. आज, शनिवारी अकरावीसाठी प्रत्यक्ष प्रवेश घेण्याचा अखेरचा दिवस आहे तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) प्रत्यक्ष प्रवेशाला सुरुवात होणार आहे.केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीने गेल्या चार दिवसांपूर्वी निवड यादी प्रसिद्ध केली. त्याच्या दुसऱ्या दिवसापासून प्रत्यक्ष प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली. तक्रारी नोंदविण्याचा शुक्रवारी अंतिम दिवस होता. शहरातील कॉमर्स कॉलेज (वाणिज्य) आणि गोखले कॉलेज (विज्ञान) या तक्रार निवारण केंद्रांवर गेल्या तीन दिवसांत ३०८ तक्रार अर्ज दाखल झाले. त्यापैकी ४१ मान्य, २६२ अमान्य आणि ५ तक्रारी प्रलंबित ठेवण्यात आल्या आहेत. प्रत्यक्ष प्रवेश घेण्याचा शनिवारी अंतिम दिवस आहे. निवड यादीतील विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केल्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर सोमवारी (दि. ६) दहावीतील ‘एटीकेटी’धारक विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती शिक्षण उपसंचालक एम. के. गोंधळी यांनी सांगितले. ‘आयटीआय’मधील विविध अभ्यासक्रमांच्या १ हजार ३६६ जागांसाठी ३ हजार १८ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन अर्ज भरले आहेत. अभ्यासक्रमांसाठी विकल्प भरण्याची शुक्रवारी दुपारी तीनपर्यंत अंतिम मुदत होती. शनिवारी सकाळी निवड यादी आॅनलाईन प्रसिद्ध होईल. त्यानंतर प्रत्यक्ष प्रवेशाला प्रारंभ होणार आहे. निवड यादीत नाव असलेल्या विद्यार्थ्यांनी अलॉटमेंट लेटर, मूळ कागदपत्रांसाठी उपस्थित रहाणे आवश्यक असल्याचे ‘आयटीआय’चे प्राचार्य दिनेश माने यांनी सांगितले. जिल्ह्यातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांत पहिल्या फेरीतील प्रवेश निश्चितीसाठी विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. या फेरीतील प्रवेश निश्चितीची रविवारी (दि. ५) अंतिम मुदत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील शासकीय तंत्रनिकेतन आणि खासगी पॉलिटेक्निकमधील प्रवेश अर्जांची विक्री आणि स्वीकृतीला रविवारपर्यंत (दि. ५) मुदतवाढ मिळाली आहे. अर्ज विक्री, स्वीकृतीसह हरकती नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. शिवाजी विद्यापीठातील विविध २२ पदव्युतर अभ्यासक्रमांच्या निवड यादीची शुक्रवारी आॅनलाईन प्रसिद्धी झाली. याबाबत हरकती नोंदविण्याची प्रक्रिया झाल्यानंतर अंतिम निवड यादीची प्रसिद्धी होणार आहे. (प्रतिनिधी)शाहू कॉलेजमध्ये बी.लिब. प्रवेश सुरूकदमवाडी येथील राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजमध्ये मुक्त विद्यापीठाचे बी. लिब आणि आय.एससीचे शिक्षणक्रम सुरू केले आहेत. त्याची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती ग्रंथपाल एस. बी. कोरडे यांनी दिली.