शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य सरकारकडून बिल वेळेत मिळालं नाही; कंत्राटदाराने उचललं टोकाचं पाऊल; विरोधकांचा हल्लाबोल
2
ब्रिटिशांचे एफ-35बी लढाऊ विमान केरळमध्ये अडकलेले; भारतावरही २१ वर्षांपूर्वी अशीच वेळ आलेली...
3
चीनच्या 'मच्छर'नंतर आता 'झुरळ' बनणार युद्धभूमीतलं नवं शस्त्र; 'या' देशानं बनवला खतरनाक प्लॅन
4
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
5
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
6
शिक्षिकेसोबत मुलाचे शारीरिक संबंध आहेत हे आई-वडिलांना माहिती होतं; लेडी टीचरला मिळाला जामीन
7
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
8
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
9
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
10
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
11
मृत्यूच्या दारातून प्रेमाच्या बंधनात! ज्यानं प्राण वाचवले, त्याच ड्रायव्हरशी केलं लग्न
12
उंच गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव बांधणे शक्य आहे का? हायकोर्टाने सरकारकडे मागितली माहिती
13
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल
14
६० टक्के महामंडळांचे वाटप ठरले, ‘मलईदार’ मंडळांबाबत रस्सीखेंच
15
संपादकीय : विरोधकांशी बोलणार कोण? विरोधकांच्या प्रश्नांवर सरकारची चुप्पी आणि संसदीय कोंडी
16
जशी नोटाबंदी, टाळेबंदी.. तशीच नवी ‘व्होटबंदी’! निवडणूक आयोगाच्या नव्या मतदार यादी मोहिमेचे विच्छेदन
17
खासगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आता १०% ईडब्लूएस कोटा; ‘एमबीबीएस’च्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
18
उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक घेण्यासाठी पूर्वतयारी सुरू; निवडणूक आयोग लवकरच जाहीर करणार वेळापत्रक
19
चीन अन् पाकिस्तानमुळे शेतकरी संकटात;  कांद्याची आखातातील निर्यात ४०% घसरली
20
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...

विधानसभा शेवटचीच!..पतंगराव कदम

By admin | Updated: September 7, 2014 23:55 IST

लोकसभा लढविण्याचे संकेत

सांगली : यंदा मी विधानसभेची शेवटचीच निवडणूक लढविणार आहे. पुढील कालावधीत कुठून कोणती निवडणूक लढवायची, याचा निर्णय लवकरच घेऊ, अशी माहिती वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी आज, रविवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. या घोषणेतून त्यांनी लोकसभा निवडणुकीचे स्पष्ट संकेत दिले असले, तरी त्यावर अधिक भाष्य करणे टाळले. ते म्हणाले की, विधानसभेची शेवटची निवडणूक मी यंदा लढवीत आहे. यापुढे विधानसभेच्या रिंगणात उतरणार नाही. पुढील गोष्टी नंतर स्पष्ट करण्यात येतील. ही निवडणूक मला फार अवघड नाही. तरीही आता यापुढे विधानसभा न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात आघाडीलाही कोणती अडचण नाही; मात्र परस्परांच्या खोड्या काढणे आता दोन्ही पक्षांतील नेत्यांनी बंद करावे. एकदा अशा गोष्टीमुळे नुकसान झाले आहे. पुन्हा त्याच गोष्टी करू नयेत. सत्ता गेल्यावर काय स्थिती होईल, याचे भान आघाडीच्या सर्वच नेत्यांनी ठेवावे. खोड्या काढणे बंद झाले नाही, तर सर्वांनाच घरी बसावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. राष्ट्रवादीचे काही नेते महायुतीत चालले असले, तरी काळजी करण्याचे कारण नाही. कॉँग्रेसकडून राष्ट्रवादीला पाठबळ मिळेल. ज्यांनी राष्ट्रवादीचा आजवर फायदा घेतला, ते स्वार्थासाठी अन्य पक्षांत जात आहेत. प्रवेशाच्या उंबरठ्यावर असलेल्या काही लोकांना राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच खतपाणी घालून मोठे केले. त्यामुळे आता ते डोईजड होत आहेत, अशी टीका कदम यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार पृथ्वीराज देशमुख यांच्यावर अप्रत्यक्षरीत्या केली. अशा गोष्टींमुळे राष्ट्रवादी अडचणीत असली, तरी या काळात आम्ही त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. गेल्या १५ वर्षांपासून आम्ही एकत्रित काम करीत आहोत. त्यामुळे या दोन्ही मित्रपक्षांनी एकमेकांना प्रामाणिकपणे साथ दिली, तरच भविष्यकाळ चांगला आहे, अन्यथा दोघेही अडचणीत येतील. जागा बदलाबाबत ते म्हणाले की, सांगली जिल्ह्यातील जत विधानसभा मतदारसंघ पूर्वी आमचाच होता. आमच्याच दुर्लक्षामुळे ती जागा राष्ट्रवादीकडे गेली. आता जागा बदलाबाबत वरिष्ठ नेतेच निर्णय घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)