शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

लमाणवाडातील टाकी कोरडीच

By admin | Updated: May 17, 2017 23:14 IST

चार वर्षांपासून पाण्याची प्रतीक्षा : राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना अर्ध्यावरच

रवींद्र हिडदुगी ।  लोकमत न्यूज नेटवर्कनेसरी : नेसरीपासून सहा कि.मी. अंतरावर असलेल्या मौजे हडलगे (ता. गडहिंग्लज) पैकी लमाणवाडा वसाहतीसाठी शासनाच्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत बांधण्यात आलेली पाण्याची टाकी गेल्या चार वर्षांपासून पाण्याच्या प्रतीक्षेत आहे. या टाकीमध्ये पाणी कधी पडणार, असा प्रश्न लमाणवाडावासीयांत आहे.जेमतेम १०० वस्ती असणाऱ्या लमाणवाडा वसाहतीकरिता मूलभूत सेवा-सुविधा पुरविण्यासाठी गावपुढाऱ्यांकडून पाठपुरावा न झाल्याने ना रस्ता, ना पाणी अशा अवस्थेत इथली जनता जीवन जगत आहे. महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या सीमेवर असलेली ही वसाहत कोळसा तयार करून विकण्याचा व्यवसाय करते; पण जंगलतोडीवर मर्यादा आल्याने त्यांना आता शेती व गुरे, शेळीपालन करून उपजिविका करावी लागत आहे.सुरुवातीस कमी असलेली लोकसंख्या आता मुलाबाळांसह १००वर पोहोचली आहे. या वसाहतीसाठी द्विशिक्षकी शाळा असून १२ विद्यार्थी पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण घेत आहेत. माध्यमिक शिक्षणासाठी चिमुकल्यांना २ ते ३ कि.मी. रस्ता तुडवून जावे लागते. पावसाळ्यात तर त्यांचे खूप हाल होतात.सध्या त्यांना घटप्रभा नदी व वसाहतीशेजारी असलेल्या कूपनलिकांवरच तहान भागवावी लागत आहे. मात्र, नदीपात्रात वरून वाहून येणाऱ्या मृत प्राण्यांच्या (कुत्रे, रेडके) दुर्गंधीमुळे त्यांना कूपनलिकेचाच आधार आहे, परंतु कूपनलिकेचेही पाणी आटल्यास त्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. त्यांची ही गरज ओळखून हडलगे ग्रामपंचायतीने २०१२-१३ मध्ये राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत पाईपलाईन खोदली, तसेच दहा हजार लिटर क्षमतेची आरसीसी टाकी उंचावर बांधली. तसेच गावकऱ्यांच्या दारापर्यंत पाईपलाईन टाकून नळही बसविले; पण त्यामध्ये आतापर्यंत पाण्याने स्पर्श केलेला नाही. लाखो रुपये खर्चून निर्माण केलेल्या योजनेचा नागरिकांना लाभ होत नसेल तर या योजना काय कामाच्या? शासन व ग्रामपंचायतीच्या उदासीनतेमुळे गत चार वर्षांपासून ही टाकी पाण्याअभावी कोरडी आहे. रस्ता, वीज व पाणी या मूलभूत सुविधांपैकी गतवर्षी या वसाहतीमध्ये फक्त वीज पोहोचली आहे. स्वातंत्र्याच्या ६८ वर्षांनंतर या वसाहतीमध्ये प्रकाश पडला. आता पाणी कधी पडणार, असा प्रश्न आहे.दृष्टिक्षेपातलमाणवाडा वसाहत ही महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या सीमेवर महाराष्ट्राच्या हद्दीत आहे. ही वसाहत हडलगे ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट आहे. या वसाहतीकडे जाण्यासाठी कच्चा रस्ता जंगलातून आहे. आरोग्य, शिक्षण व अन्य सोयीसाठी त्यांना नेसरी किंवा कर्नाटकातील दड्डी या गावावरच अवलंबून राहावे लागते.