शहरं
Join us  
Trending Stories
1
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...
2
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
3
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
4
"तो आनंदी होता, आम्ही ४० मिनिटं व्हिडीओ कॉलवर बोलला..."; लेकाच्या मृत्यूने वडिलांना धक्का
5
विमानातून उतरताच ट्रम्प यांनी धरला ठेका, ठुमके पाहून मलेशियाचे पंतप्रधानही चकित झाले; बघा Video
6
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
7
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
8
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
9
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
10
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
11
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
12
'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
13
किडनी फेल झाल्याने सतीश शाह यांचं निधन; 'या' गोष्टी कारणीभूत, 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
14
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
15
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
16
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
17
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
18
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
19
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
20
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात

धामणी खोऱ्यात भूस्खलन , शेतीचे प्रचंड नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क महेश आठल्ये म्हासुर्ली : जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र अतिवृष्टी झाली. धामणी खोरेही त्याला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

महेश आठल्ये

म्हासुर्ली : जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र अतिवृष्टी झाली. धामणी खोरेही त्याला अपवाद नव्हते. अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने सह्याद्री डोंगररांगांच्या कडेकपारीत वसलेल्या धामणी खोऱ्यातील अनेक डोंगर खचून शेतीचे प्रचंड नुकसान झाले. त्याचबरोबर कोनोली - कुपलेवाडी (ता. राधानगरी) येथील दोन नागरिकांना जीवही गमवावा लागला. मानवाच्या गेल्या कित्येक पिढ्यांपासून या डोंगरांनी अन्न, वस्त्र, निवारा, पाणी आदी मूलभूत गरजा भागवून पोशिंद्याची भूमिका निभावली. मात्र, हेच डोंगर आता मानवी हस्तक्षेपामुळे जणू काळ बनू पाहत आहेत. त्याविषयी दोन भागांची ‘पोशिंदा बनतोय काळ’ या नावाने लेखमाला प्रसिद्ध करत आहोत.

गत महिनाअखेरीस झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसाने धामणी खोऱ्यातील अनेक गावांत मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाल्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून, डोंगरावरील दगड-माती पाण्याबरोबर खाली वाहत येऊन शेकडो एकर जमीन नापीक झाली आहे. सरकारी यंत्रणेबरोबरच खासगी शेत जमीन मालकांनी निसर्गावर मोठ्या प्रमाणावर केलेल्या अत्याचाराचे हे द्योतक असून, शासनाने एखाद्या तज्ञ समितीकडून या परिसराचे परीक्षण करून यामागच्या नेमक्या कारणांचा ‘पोल खोल’ करावा, अशी मागणी पर्यावरणप्रेमींमधून होत आहे.

तीन तालुक्यांत विभागलेला तसेच नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध असणारा सुमारे ४० ते ४५ किलोमीटर लांबीच्या दोन्ही बाजूंनी डोंगररांगा आणि मध्य भागातून वाहणारी धामणी नदी असा धामणी खोऱ्याचा एकंदरीत पसारा आहे. याच डोंगररांगांच्या कडेकपारीत अनेक गावे वसली असून, पाऊसमानही मुबलक आहे. गेल्या कित्येक पिढ्या याच डोंगर कडेकपारीत शेती, फळे, कंदमुळे यावर उदरनिर्वाह करून जगल्या आहेत. भौतिक जगातील सुखसोयींपासून लांब असणाऱ्या, स्वच्छ सुंदर हवा, पाणी आणि अद्भुत निसर्गाच्या सानिध्यामुळे अनेकांना या खोऱ्याने कायमस्वरूपी भुरळ घातली आहे. त्याचाच परिणाम म्हणजे अनेक राजकीय, सामाजिक, सरकारी सेवेतील धनदांडग्यांनी मोठ्या प्रमाणावर अल्प किमतीत जमिनी खरेदी केल्या आहेत. या शेतमालकांनी शेतीच्या विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर अवैध जंगलतोड, जमिनीचे सपाटीकरण, तळी खोदणे, वन्यप्राण्यांच्या प्रतिबंधासाठी चर खोदणे आदी प्रकारे निसर्गावर मनमानी अत्याचार करून त्याला आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे.

याबरोबर सरकारी यंत्रणांमधील वन विभाग, सामाजिक वनीकरण, कृषी विभाग आदी विभागांनी मोठ्या प्रमाणावर या परिसरातील जमिनीचा अभ्यास न करताच वनतळी बांधणे, बंधारे, नालाबांध बांधणे, बेसुमार वृक्षतोडीकडे दुर्लक्ष करणे, विनापरवाना सुरुंग लावून मोठ्या प्रमाणावर दगडाचे उत्खनन करणे, चर खोदाई करणे, समतल चर खोदून जमिनीत पाणी मुरविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेच्या माध्यमातून जमिनीचे सपाटीकरण करणे आदी प्रकारांमुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर डोंगरांना मोठमोठ्या भेगा जाऊन भूस्खलनासारखे प्रकोप झाले आहेत.

..........

कोट....

संपूर्ण धामणी खोरे उंच डोंगररांगेच्या खालच्या बाजूला वसले आहे.

डोंगरमाथ्यावरच्या जमिनी स्थानिकांनी अत्यल्प किमतीत धनवानांना विकल्या आहेत. त्यामुळे विकत घेतलेले संपूर्ण पठार विकासाच्या नावाखाली अक्षरश: पोखरले आहे. सरकारी यंत्रणांनी केलेले अनेक प्रयोगही फसले आहेत.

त्यात वन विभागाने रानतळी निर्माण केली आहेत. प्रचंड अनैसर्गिक वृक्षतोड आणि इतर असंख्य जंगलावर केलेले आघात आदी नानाविध कारणांमुळे नैसर्गिक पावसाच्या पाण्याचा होणारा निचरा थांबला. यामुळे भूस्खलनासारखे प्रकार घडले आणि याला मानवी हस्तक्षेप हेच कारण आहे.

- सुरेश बोरवणकर

ग्रामपंचायत सदस्य, आंबर्डे, ता. पन्हाळा

फोटो ओळी

म्हासुर्ली - बाजारीवाडा येथे कोसळलेला डोंगर आणि भात झालेले नुकसान.