शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
2
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
3
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
4
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
5
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
6
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
7
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
8
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  
9
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
10
युद्धबंदीच्या बातमीनंतर सेन्सेक्स-निफ्टी वधारले, पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
11
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
12
लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!
13
"शूट करुन मग सर्जरी करायची...", अपघातानंतर अलका कुबल यांना निर्मात्यांकडून आला कटू अनुभव
14
"आधार कार्ड अपडेट करून येते"; बहाणा सांगून लग्नाच्या १०व्या दिवशी पत्नी झाली फरार! सोबत नवऱ्याचे पैसेही नेले
15
ENG vs IND : भारतीय क्रिकेटमध्ये दुखवटा! मैदानात दोन्ही संघांतील खेळाडूंनी दिग्गज फिरकीपटूला वाहिली श्रद्धांजली
16
Gold Silver Price 24 June: एका झटक्यात सोनं झालं ₹२ हजारांपेक्षाही स्वस्त; Iran-Israel युद्ध थांबलं तर चांदीचीही चमक झाली कमी
17
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढ ही मतचोरीच- हर्षवर्धन सपकाळ
18
पत्नीच्या हत्येचा आरोपी NSG कमांडो, 'ऑपरेशन सिंदूर'च्या नावाखाली बचाव करत होता, सुप्रीम कोर्ट काय म्हणाले?
19
'गब्बर सिंगला डायलॉग शिकवले', यावरून ट्रोल होतायेत सचिन पिळगावकर; नक्की काय म्हणाले होते? पाहा Video
20
Jyeshtha Amavasya 2025: घरातले आजारपण, भांडणतंटा कमी होत नसेल तर ज्येष्ठ अमावास्येला करा 'हे' उपाय!

धामणी खोऱ्यात भूस्खलन , शेतीचे प्रचंड नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क महेश आठल्ये म्हासुर्ली : जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र अतिवृष्टी झाली. धामणी खोरेही त्याला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

महेश आठल्ये

म्हासुर्ली : जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र अतिवृष्टी झाली. धामणी खोरेही त्याला अपवाद नव्हते. अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने सह्याद्री डोंगररांगांच्या कडेकपारीत वसलेल्या धामणी खोऱ्यातील अनेक डोंगर खचून शेतीचे प्रचंड नुकसान झाले. त्याचबरोबर कोनोली - कुपलेवाडी (ता. राधानगरी) येथील दोन नागरिकांना जीवही गमवावा लागला. मानवाच्या गेल्या कित्येक पिढ्यांपासून या डोंगरांनी अन्न, वस्त्र, निवारा, पाणी आदी मूलभूत गरजा भागवून पोशिंद्याची भूमिका निभावली. मात्र, हेच डोंगर आता मानवी हस्तक्षेपामुळे जणू काळ बनू पाहत आहेत. त्याविषयी दोन भागांची ‘पोशिंदा बनतोय काळ’ या नावाने लेखमाला प्रसिद्ध करत आहोत.

गत महिनाअखेरीस झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसाने धामणी खोऱ्यातील अनेक गावांत मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाल्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून, डोंगरावरील दगड-माती पाण्याबरोबर खाली वाहत येऊन शेकडो एकर जमीन नापीक झाली आहे. सरकारी यंत्रणेबरोबरच खासगी शेत जमीन मालकांनी निसर्गावर मोठ्या प्रमाणावर केलेल्या अत्याचाराचे हे द्योतक असून, शासनाने एखाद्या तज्ञ समितीकडून या परिसराचे परीक्षण करून यामागच्या नेमक्या कारणांचा ‘पोल खोल’ करावा, अशी मागणी पर्यावरणप्रेमींमधून होत आहे.

तीन तालुक्यांत विभागलेला तसेच नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध असणारा सुमारे ४० ते ४५ किलोमीटर लांबीच्या दोन्ही बाजूंनी डोंगररांगा आणि मध्य भागातून वाहणारी धामणी नदी असा धामणी खोऱ्याचा एकंदरीत पसारा आहे. याच डोंगररांगांच्या कडेकपारीत अनेक गावे वसली असून, पाऊसमानही मुबलक आहे. गेल्या कित्येक पिढ्या याच डोंगर कडेकपारीत शेती, फळे, कंदमुळे यावर उदरनिर्वाह करून जगल्या आहेत. भौतिक जगातील सुखसोयींपासून लांब असणाऱ्या, स्वच्छ सुंदर हवा, पाणी आणि अद्भुत निसर्गाच्या सानिध्यामुळे अनेकांना या खोऱ्याने कायमस्वरूपी भुरळ घातली आहे. त्याचाच परिणाम म्हणजे अनेक राजकीय, सामाजिक, सरकारी सेवेतील धनदांडग्यांनी मोठ्या प्रमाणावर अल्प किमतीत जमिनी खरेदी केल्या आहेत. या शेतमालकांनी शेतीच्या विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर अवैध जंगलतोड, जमिनीचे सपाटीकरण, तळी खोदणे, वन्यप्राण्यांच्या प्रतिबंधासाठी चर खोदणे आदी प्रकारे निसर्गावर मनमानी अत्याचार करून त्याला आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे.

याबरोबर सरकारी यंत्रणांमधील वन विभाग, सामाजिक वनीकरण, कृषी विभाग आदी विभागांनी मोठ्या प्रमाणावर या परिसरातील जमिनीचा अभ्यास न करताच वनतळी बांधणे, बंधारे, नालाबांध बांधणे, बेसुमार वृक्षतोडीकडे दुर्लक्ष करणे, विनापरवाना सुरुंग लावून मोठ्या प्रमाणावर दगडाचे उत्खनन करणे, चर खोदाई करणे, समतल चर खोदून जमिनीत पाणी मुरविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेच्या माध्यमातून जमिनीचे सपाटीकरण करणे आदी प्रकारांमुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर डोंगरांना मोठमोठ्या भेगा जाऊन भूस्खलनासारखे प्रकोप झाले आहेत.

..........

कोट....

संपूर्ण धामणी खोरे उंच डोंगररांगेच्या खालच्या बाजूला वसले आहे.

डोंगरमाथ्यावरच्या जमिनी स्थानिकांनी अत्यल्प किमतीत धनवानांना विकल्या आहेत. त्यामुळे विकत घेतलेले संपूर्ण पठार विकासाच्या नावाखाली अक्षरश: पोखरले आहे. सरकारी यंत्रणांनी केलेले अनेक प्रयोगही फसले आहेत.

त्यात वन विभागाने रानतळी निर्माण केली आहेत. प्रचंड अनैसर्गिक वृक्षतोड आणि इतर असंख्य जंगलावर केलेले आघात आदी नानाविध कारणांमुळे नैसर्गिक पावसाच्या पाण्याचा होणारा निचरा थांबला. यामुळे भूस्खलनासारखे प्रकार घडले आणि याला मानवी हस्तक्षेप हेच कारण आहे.

- सुरेश बोरवणकर

ग्रामपंचायत सदस्य, आंबर्डे, ता. पन्हाळा

फोटो ओळी

म्हासुर्ली - बाजारीवाडा येथे कोसळलेला डोंगर आणि भात झालेले नुकसान.