शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

धामणी खोऱ्यात भूस्खलन , शेतीचे प्रचंड नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क महेश आठल्ये म्हासुर्ली : जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र अतिवृष्टी झाली. धामणी खोरेही त्याला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

महेश आठल्ये

म्हासुर्ली : जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र अतिवृष्टी झाली. धामणी खोरेही त्याला अपवाद नव्हते. अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने सह्याद्री डोंगररांगांच्या कडेकपारीत वसलेल्या धामणी खोऱ्यातील अनेक डोंगर खचून शेतीचे प्रचंड नुकसान झाले. त्याचबरोबर कोनोली - कुपलेवाडी (ता. राधानगरी) येथील दोन नागरिकांना जीवही गमवावा लागला. मानवाच्या गेल्या कित्येक पिढ्यांपासून या डोंगरांनी अन्न, वस्त्र, निवारा, पाणी आदी मूलभूत गरजा भागवून पोशिंद्याची भूमिका निभावली. मात्र, हेच डोंगर आता मानवी हस्तक्षेपामुळे जणू काळ बनू पाहत आहेत. त्याविषयी दोन भागांची ‘पोशिंदा बनतोय काळ’ या नावाने लेखमाला प्रसिद्ध करत आहोत.

गत महिनाअखेरीस झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसाने धामणी खोऱ्यातील अनेक गावांत मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाल्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून, डोंगरावरील दगड-माती पाण्याबरोबर खाली वाहत येऊन शेकडो एकर जमीन नापीक झाली आहे. सरकारी यंत्रणेबरोबरच खासगी शेत जमीन मालकांनी निसर्गावर मोठ्या प्रमाणावर केलेल्या अत्याचाराचे हे द्योतक असून, शासनाने एखाद्या तज्ञ समितीकडून या परिसराचे परीक्षण करून यामागच्या नेमक्या कारणांचा ‘पोल खोल’ करावा, अशी मागणी पर्यावरणप्रेमींमधून होत आहे.

तीन तालुक्यांत विभागलेला तसेच नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध असणारा सुमारे ४० ते ४५ किलोमीटर लांबीच्या दोन्ही बाजूंनी डोंगररांगा आणि मध्य भागातून वाहणारी धामणी नदी असा धामणी खोऱ्याचा एकंदरीत पसारा आहे. याच डोंगररांगांच्या कडेकपारीत अनेक गावे वसली असून, पाऊसमानही मुबलक आहे. गेल्या कित्येक पिढ्या याच डोंगर कडेकपारीत शेती, फळे, कंदमुळे यावर उदरनिर्वाह करून जगल्या आहेत. भौतिक जगातील सुखसोयींपासून लांब असणाऱ्या, स्वच्छ सुंदर हवा, पाणी आणि अद्भुत निसर्गाच्या सानिध्यामुळे अनेकांना या खोऱ्याने कायमस्वरूपी भुरळ घातली आहे. त्याचाच परिणाम म्हणजे अनेक राजकीय, सामाजिक, सरकारी सेवेतील धनदांडग्यांनी मोठ्या प्रमाणावर अल्प किमतीत जमिनी खरेदी केल्या आहेत. या शेतमालकांनी शेतीच्या विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर अवैध जंगलतोड, जमिनीचे सपाटीकरण, तळी खोदणे, वन्यप्राण्यांच्या प्रतिबंधासाठी चर खोदणे आदी प्रकारे निसर्गावर मनमानी अत्याचार करून त्याला आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे.

याबरोबर सरकारी यंत्रणांमधील वन विभाग, सामाजिक वनीकरण, कृषी विभाग आदी विभागांनी मोठ्या प्रमाणावर या परिसरातील जमिनीचा अभ्यास न करताच वनतळी बांधणे, बंधारे, नालाबांध बांधणे, बेसुमार वृक्षतोडीकडे दुर्लक्ष करणे, विनापरवाना सुरुंग लावून मोठ्या प्रमाणावर दगडाचे उत्खनन करणे, चर खोदाई करणे, समतल चर खोदून जमिनीत पाणी मुरविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेच्या माध्यमातून जमिनीचे सपाटीकरण करणे आदी प्रकारांमुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर डोंगरांना मोठमोठ्या भेगा जाऊन भूस्खलनासारखे प्रकोप झाले आहेत.

..........

कोट....

संपूर्ण धामणी खोरे उंच डोंगररांगेच्या खालच्या बाजूला वसले आहे.

डोंगरमाथ्यावरच्या जमिनी स्थानिकांनी अत्यल्प किमतीत धनवानांना विकल्या आहेत. त्यामुळे विकत घेतलेले संपूर्ण पठार विकासाच्या नावाखाली अक्षरश: पोखरले आहे. सरकारी यंत्रणांनी केलेले अनेक प्रयोगही फसले आहेत.

त्यात वन विभागाने रानतळी निर्माण केली आहेत. प्रचंड अनैसर्गिक वृक्षतोड आणि इतर असंख्य जंगलावर केलेले आघात आदी नानाविध कारणांमुळे नैसर्गिक पावसाच्या पाण्याचा होणारा निचरा थांबला. यामुळे भूस्खलनासारखे प्रकार घडले आणि याला मानवी हस्तक्षेप हेच कारण आहे.

- सुरेश बोरवणकर

ग्रामपंचायत सदस्य, आंबर्डे, ता. पन्हाळा

फोटो ओळी

म्हासुर्ली - बाजारीवाडा येथे कोसळलेला डोंगर आणि भात झालेले नुकसान.