शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

मोबाईलने डिसकनेक्ट केली लॅँडलाईन

By admin | Updated: December 9, 2014 23:55 IST

दूरध्वनी कनेक्शन घटले : जिल्ह्यात दर महिन्याला होतात सोळाशे कनेक्शन बंद

संदीप खवळे - कोल्हापूर -दूरसंचार क्षेत्रातील मैलाचा दगड ठरलेल्या दूरध्वनीचे अस्तित्वच आता आता नाममात्र राहण्याची वेळ आली आहे. मोबाईलचा वाढता वापर, त्यातील नवीन तंत्रज्ञान आणि इंटरनेटची सुविधा यामुळे देशातील लँडलाईन कनेक्शनना घरघर लागली आहे़ लॅँडलाईन कनेक्शन बंद होण्याचा वेग इतका आहे की, येत्या काही वर्षांत लॅँडलाईनचा वापर केवळ कार्यालये आणि ब्रॉडबॅँड कनेक्शनची आवश्यकता असलेल्या ठिकाणीच होण्याची चिन्हे आहेत. या बदलाला कोल्हापूर जिल्हाही अपवाद नाही... गेल्या तीस वर्षांत एस़टी़डी़, कॉईन बॉक्स, तसेच घरातील दूरध्वनी या मार्गांनी टेलिफोनचा वापर व्हायचा़ शहर असो वा ग्रामीण दूरध्वनीमुळे तो जोडला गेला होता. जागतिकीकरणानंतर खासगी कंपन्याही या क्षेत्रात उतरल्या आणि दराची स्पर्धा वाढून ग्राहकांचा फायदा झाला़ यामुळे दूरध्वनींची संख्या वाढत गेली़; पण २००५ नंतर मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे ही संख्या कमी होत गेली़ ही बाब दूरसंचार क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या ‘बीएसएनएल’च्या नोव्हेंबर २०१४ च्या कोल्हापूर जिल्ह्याच्या अहवालात दिसून येते़ बीएसएनएल दूरध्वनी कनेक्शनची कोल्हापूर जिल्ह्यातील संख्या नोव्हेंबर २०१४ अखेरीस कमी होऊन १०१५५२ पर्यंत आली आहे़ इतर कंपन्यांच्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी ‘बीएसएनएल’ने दूरध्वनीबरोबरच ब्राँडबॅँड तसेच ‘तरंग’ सेवाही सुरू केली आहे़ यातील ब्राँडबॅँड कनेक्शनमध्ये मार्च २०१४ च्या तुलनेत फारशी घट नाही़ जिथे केबल पोहोचू शकत नाहीत, अशा दुर्गम भागात ‘बीएसएनएल’ने तरंग सेवा सुरू केली होती़ या सेवेला चांगला प्रतिसाद मिळाला होता़; पण मोबाईल टॉवरने ‘तरंग’ सेवेलाही खो दिला आहे़ तरंग कनेक्शनही नऊ हजारांवरून साडेसहा हजारांच्या आसपास आलेली आहेत़ मोबाईलवरील इंटरनेट सेवा, तंत्रज्ञानातील स्पर्धेमुळे दूरध्वनींची संख्या झपाट्याने कमी होत आहे़ दर महिन्याला सरासरी सोळाशे कनेक्शन्स बंद होत आहेत़ त्यामुळे दूरध्वनीचा वापर हा कार्यालये आणि ब्राँडबॅँडपुरताच मर्यादित होऊन दूरध्वनीचा खणखणाट इतिहासजमा होण्याची वेळ आली आहे.गेल्या तीस वर्षांत ‘बीएसएनएल’ने दूरध्वनी सेवा पोहोचविण्यासाठी अब्जावधी रुपयांची गुंतवणूक केली आहे़ दूरध्वनी जोडणीसाठी आवश्यक असलेली आॅप्टिकल फायबर केबल व अन्य साधनसामग्री यांसाठी अब्जावधी रुपये खर्च केले आहेत़ बीएसएनएलची जिल्ह्यात ३०८ एक्स्चेंज आहेत. याच्या माध्यमातून शहर तसेच ग्रामीण भाागातील लोकांना दूरध्वनीची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे; डिसकनेक्ट होणारी संख्या हा चिंतेचा विषय आहे. दरम्यान, केंद्र शासनाने नॅशनल आॅप्टिकल फायबर नेटवर्क या योजनेद्वारे सुमारे अडीच लाख ग्रामपंचायतींना ब्राँडबॅँड कनेक्शन देण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. हेच आशादायी चित्र आहे.दर महिन्याला सरासरी सोळाशे दूरध्वनी कनेक्शन बंद होत आहेत. मोबाईलचा वाढता वापर, बाजारातील स्पर्धा ही यामागची प्रमुख कारणे आहेत. मोबाईलने लॅँडलाईन कनेक्शनला एक मोठे आव्हानच उभे केले आहे. मोबाईलचा वाढता वापर ओळखून दूरध्वनीसाठी लागणाऱ्या आॅप्टिकल केबलची पुरेशी निर्मितीही कंपन्यांकडून होत नाही. - एस. डी. हजारे,सहायक महाप्रबंधक (योजना), बीएसएनएल, कोल्हापूर.